शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

घंटागाडीमुळे अरुंद रस्त्यावर कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 01:46 IST

दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या मोठ्या घंटागाडीमुळे अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे

नवी मुंबई : दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या मोठ्या घंटागाडीमुळे अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी, गाव- गावठाणातील रस्ते अरुंद असल्याने त्याठिकाणसाठी छोट्या गाड्यातून कचरा गोळा केला जातो. परंतु अनेक ठिकाणी या नियमाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले आहे.दैनंदिन कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील गल्लीबोळात घंटागाड्या फिरतात. दिवसभरात नियोजित वेळेत या घंटागाड्या विविध सोसायटी व वसाहतीतून कचरा संकलित करतात. त्यासाठी संपूर्ण शहरासाठी एकाच ठेकेदारामार्फत शहरातील कचरा उचलण्याचे काम केले जाते. त्यासाठी सोयीनुसार लहान आणि मोठ्या स्वरूपाच्या घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु अनेकदा वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यावर मोठ्या आकाराच्या घंटागाड्यातून कचरा गोळा केला जात असल्याचे दिसून आले आहे. कोपरखैरणे विभागात मोठ्या प्रमाणात माथाडींच्या बैठ्या चाळी आहेत. या चाळीतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. येथील बहुतांशी घरांचे वाढीव बांधकाम झाल्याने समोरील रस्त्यावर रिक्षा, खासगी वाहने व मोटरसायकल पार्क केल्या जातात. त्यामुळे हे रस्ते आणखीनच अरुंद झाले आहेत. या रस्त्यांच्या दुसºया बाजूला खासगी इमारती आहेत. या इमारतीतील कचरा मोठ्या आकाराच्या घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. येथील निमुळत्या रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. असे प्रकार नेहमीचेच झाल्याने स्कूल बस व रिक्षांचा खोळंबा होत आहे. यासंदर्भात महापालिकेने संबंधित ठेकेदाराला समज द्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई