शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

केंबुर्ली वळणाचे रुंदीकरण होऊनही धोका कायम

By admin | Updated: November 29, 2014 22:24 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले असले तरी अवघड वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघातांचा धोका कायम आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा एक कार या वळणाचे कठडे तोडून नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. 
मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गाव आणि महाड शहरादरम्यान महामार्गाला एक धोकादायक वळण आहे. या ठिकाणी नदीला लागूनच रस्ता पुढे गेला आहे. महाड शहराला जोडणारा जोडरस्तादेखील याच  ठिकाणी आहे. यामुळे येथे कायम अपघात होत असतात. गेल्या अनेक वर्षात या वळणावर अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. कायम अपघात होत असल्याने महामार्ग बांधकाम  विभागाने या ठिकाणी असलेला एका बाजूचा डोंगर फोडून रस्ता रुंद करण्याचे काम केले होते. मात्र रुंदीकरणामुळे हे वळण अधिकच धोकादायक बनले आहे. यामुळे या वळणावर आजही अपघातांचे प्रमाण कायम राहिले आहे. 
या वळणावर असलेले हे सिमेंट काँक्रीटचे संरक्षक कठडे रात्रीच्या वेळेस चालकांना स्पष्ट दिसत नाहीत. कठडय़ांना रेडीयम पट्टे बसवण्यात आलेले नाहीत. या वळणावर असलेली डोंगराकडच्या साइडपट्टीला खड्डे पडले आहेत. तर महाड शहराला जोडणा:या जोड रस्त्यासमोर खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या प्रय}ातही अनेक अपघात होत आहेत. 
केंबुर्ली  वळणावर जानेवारी 2क्क्9 पासून आतार्पयत जवळपास 35 अपघात झाले आहेत. काही अपघात किरकोळ असल्याने याची नोंद करण्यात आलेली नाही. या किरकोळ अपघातांचा आकडादेखील किमान 25 पेक्षा अधिक आहे. (वार्ताहर)