शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, ३० टक्के भाजीपाला पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:34 IST

ग्राहक नसल्यामुळे आवक घटली; भाजीपाल्याचे दरही होऊ लागले कमी

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांनी, ग्राहकांनी बाजार समितीमधील भाजीखरेदीकडे पाठ फिरविली आहे. जवळपास ३० टक्के मालाची विक्री झाली नाही. ग्राहक नसल्यामुळे पालेभाज्यांसह अनेक वस्तूंचे दरही कमी होऊ लागले आहेत. मुंबई, नवी मुंबईमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम बाजार समितीमधील व्यवहारांवरही झाला आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये ६३४ ट्रक टेम्पोमधून २९९७ टन भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये ४ लाख ९० हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. परंतु पावसामुळे जवळपास ४० टक्के मालाची विक्री झाली नव्हती. यामुळे मंगळवारी व्यापाऱ्यांनी कमी माल मागविला होता. दिवसभरात ५१२ वाहनांमधून २४३० टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. दुसऱ्या दिवशीही पावसामुळे विक्रीवर परिणाम झाला होता. जवळपास ३० टक्के माल शिल्लक राहिला आहे.

ग्राहक नसल्यामुळे बीट, दुधी भोपळा, फरसबी, फ्लॉवर,काकडी, ढोबळी मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथी, पुटिना व शेपूच्या दरामध्ये घसरण झाली आहे. गवार, घेवडा, कारली, कोबी व टोमॅटोच्या दरामध्ये मात्र तेजी कायम आहे. पाऊस सुरूच राहिला तर दर कमी होऊ शकतात, पाऊस घडल्यास मागणी वाढून दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईvegetableभाज्या