शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, ३० टक्के भाजीपाला पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:34 IST

ग्राहक नसल्यामुळे आवक घटली; भाजीपाल्याचे दरही होऊ लागले कमी

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांनी, ग्राहकांनी बाजार समितीमधील भाजीखरेदीकडे पाठ फिरविली आहे. जवळपास ३० टक्के मालाची विक्री झाली नाही. ग्राहक नसल्यामुळे पालेभाज्यांसह अनेक वस्तूंचे दरही कमी होऊ लागले आहेत. मुंबई, नवी मुंबईमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम बाजार समितीमधील व्यवहारांवरही झाला आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये ६३४ ट्रक टेम्पोमधून २९९७ टन भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये ४ लाख ९० हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. परंतु पावसामुळे जवळपास ४० टक्के मालाची विक्री झाली नव्हती. यामुळे मंगळवारी व्यापाऱ्यांनी कमी माल मागविला होता. दिवसभरात ५१२ वाहनांमधून २४३० टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. दुसऱ्या दिवशीही पावसामुळे विक्रीवर परिणाम झाला होता. जवळपास ३० टक्के माल शिल्लक राहिला आहे.

ग्राहक नसल्यामुळे बीट, दुधी भोपळा, फरसबी, फ्लॉवर,काकडी, ढोबळी मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथी, पुटिना व शेपूच्या दरामध्ये घसरण झाली आहे. गवार, घेवडा, कारली, कोबी व टोमॅटोच्या दरामध्ये मात्र तेजी कायम आहे. पाऊस सुरूच राहिला तर दर कमी होऊ शकतात, पाऊस घडल्यास मागणी वाढून दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईvegetableभाज्या