शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

प्रदूषणामुळे उरणकरांचा जीव गुदमरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 23:51 IST

वाढते औद्योगिकीकरण, प्रचंड प्रमाणात होत असलेले मातीचे भराव, मॅन्ग्रोव्हजची कत्तल आणि रासायनिक घातक प्रकल्पांमुळे उरण तालुक्यातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास झाला आहे.

मधुकर ठाकूरउरण : वाढते औद्योगिकीकरण, प्रचंड प्रमाणात होत असलेले मातीचे भराव, मॅन्ग्रोव्हजची कत्तल आणि रासायनिक घातक प्रकल्पांमुळे उरण तालुक्यातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास झाला आहे. मात्र याबाबत उपाययोजना करण्याकडे, संबंधितांवर कारवाई करण्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणाची समस्या गंभीर होत असून आरोग्याच्या व्याधी बळावत आहेत.जेएनपीटीसह इतर खासगी बंदरांमुळे विविध कंपन्या, रासायनिक प्रकल्प, अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी, अपघाचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय माल साठवणुकीची शेकडो गोदामे उरण तालुक्यात उभी राहत आहेत. विकासकामांच्या नावाखाली समुद्र, खाडीकिनारी आणि मोकळ्या परिसरात दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. समुद्रातील भरावामुळे पाणी पातळी वाढल्याने किनाऱ्यालगतच्या गावांतील बांध-बंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी गावागावांत शिरू लागले आहे.नवी मुंबई सेझ, जेएनपीटी सेझ प्रकल्पांसाठी झालेल्या भरावामुळे तर गावांपासून समुद्र, खाड्यांपर्यंत असलेले पावसाळी पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाले बुजले गेले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय दगड-मातीच्या भरावामुळे स्थलांतरित आणि विविध स्थानिक जलचर पक्ष्यांची वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. भरावासाठी डोंगर, टेकड्या भुईसपाट करण्यात आल्याने परिसरातील पशू-पक्ष्यांचे स्थलांतरही होऊ लागले आहे.उरण तालुक्यात उभारण्यात आलेल्या धोकादायक तसेच अत्यंत ज्वालाग्राही रासायनिक प्रकल्पांमुळे दूषित पाणी समुद्रात आणि खाड्यांत मिसळत आहेत. त्यामुळे जल, वायुप्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या जलप्रदूषणामुळे परिसरातील पारंपरिक मासेमारी पुरती धोक्यात आली आहे. विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी खारफुटीची बेसुमार कत्तल करण्यात येत असल्याने जैवविविधता नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात होणारा ºहास आणि वाढत्या प्रदूषणाविरोधात अनेक तक्रारी केंद्रीय पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्याने करण्यात येत आहेत. काही पर्यावरणवाद्यांनी प्रदूषणाच्या समस्येबाबत न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. मात्र तरीही संबंधित विभागाकडून दिरंगाई होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.>कारवाईबाबत उरण परिसरातील औद्योगिक कंपन्या, प्रकल्प आमच्याच अखत्यारीत येतात. मात्र वाढत्या प्रदूषणाविरोधात कोणत्या प्रकारची आणि कशी कारवाई केली केली जाते, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राहुल मोटे यांच्याकडे विचारणा केली असता, माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.>उरण तालुक्यातील प्रदूषणाच्या समस्येबाबत आलेल्या तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे खातरजमा करून घेण्यासाठी पाठविण्यात येतात. मात्र त्यांनी केलेल्या कारवाईचा तपशील तहसील कार्यालयाला दिला जात नाही.- भाऊसाहेब अंधारे,तहसीलदार, उरण