शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
3
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
4
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
5
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
6
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
7
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
8
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
9
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
10
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
11
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
12
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
13
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
14
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
15
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
16
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
17
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
18
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
19
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
20
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
Daily Top 2Weekly Top 5

नव्या विकास नियोजन आराखड्यामुळे मुंबईतील ना विकास क्षेत्र आले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:35 IST

विकास की विनाश? : विकासकाला दोन ते चार अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा लाभ

मुंबई : नव्या विकास नियोजन आराखड्यात ना विकास क्षेत्राचे द्वार विकासासाठी खुले झाले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आरे वसाहतीतील भूखंड यापैकीच एक आहे. विशेष विकास क्षेत्र (एसडीझेड) म्हणून जाहीर झालेल्या या भूखंडाचा विकास केल्यास नवीन नियमानुसार विकासकाला दोन ते चार अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा लाभ होणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी आग लावण्यात आल्याचा संशय गडद होत चालला आहे.

विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये मुंबईतील ना विकास क्षेत्रातील तीन हजार ३५५ हेक्टर्स जागेपैकी दोन हजार १०० हेक्टर्स जागा एसडीझेड म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे १९९१ मधील विकास आराखड्यात ना विकास क्षेत्र असलेला आरे वसाहतीतील हा भूखंडदेखील विकासासाठी खुला झाला आहे. ३ डिसेंबर रोजी या ठिकाणी भीषण आग लागून जंगल, हिरवळ जळून खाक झाले आहे. यापूर्वीच्या विकास आराखड्यानुसार ना विकास क्षेत्रात केवळ ०.०२ एफएसआय मिळत होता. मात्र नव्या आराखड्यात दोन ते चार एफएसआय एवढा लाभ विकासकाला उठविता येणार आहे. तसेच जमिनीच्या छोट्या भागात तत्सम संस्थेसाठी जागा बांधून दिल्यास पूर्वीसारखे परवडणारी घरं तसेच काही भाग मोकळा सोडण्याची गरज पडणार नाही. अशा पळवाटा असल्याने विकासकांचे फावणार असल्याचे विकास नियोजन खात्यातील सूत्रांनी सांगितले.विकासकांची चांदीसन १९९१ मध्ये विकास आराखड्यात तीन हजार ३५५ हेक्टर्स मोकळी जागा ना विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली होती. २०१४-२०३४ च्या विकास आराखड्यात यापैकी दोन हजार १०० हेक्टर्स जागा विशेष विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विकासासाठी ही जागा खुली होणार आहे.११ वर्षांत २७ आगीखाजगी जमिनीवर जंगल असल्यास राज्य शासन ती जागा आपल्या ताब्यात घेऊ शकते, अशी तरतूद कायद्यात आहे. त्यानंतर शासनाने नोटीस काढल्यास ही जागा ना विकास क्षेत्र म्हणून गणली जाते. मात्र आरे वसाहतीमध्ये विशेषत: या जागेवर गेल्या ११ वर्षांमध्ये २७ वेळा आग लागण्याची घटना घडल्याचे अग्निशमन दलाच्या अहवालावरून दिसून येते. जंगलात सतत हिरवळ उगवत असते, मात्र या ठिकाणी थोडी हिरवळ उगवताच आग लावण्याचा प्रकार घडत आहे, याकडे सामाजिक कार्यकर्ते झोरू बथेना यांनी लक्ष वेधले.असा झाला बदलएसडीझेड अंतर्गत मालकाला जमिनीचा ३४ टक्के वाटा मिळतो. तर ५० टक्के जागा परवडणारी घरं आणि मोकळी जागा म्हणून सोडावी लागते. जागेचा विकास करून महापालिकेच्या ताब्यात दिल्यास विकासकाला मोबदल्यात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळतो. नवीन आराखड्यानुसार जमिनीच्या छोट्या भागात संस्थांसाठी जागा बांधून दिल्यास परवडणारी घरं आणि मोकळी जागा सोडावी लागणार नाही.वनविभाग आणि महापालिकेला आगीबाबत गांभीर्य असते तर जेव्हा जेव्हा आग लागली तेव्हा तेव्हा त्यांनी लक्ष दिले असते. मात्र जंगलातील आगीकडे प्रशासन आतापर्यंत दुर्लक्षच करत आले आहे. दरवर्षी येथे आग लागते, असे वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. जागा साफ करण्यासाठी दरवर्षी आग लावली जाते, यातून प्रशासन आणि विकासकांची मिलीभगत असल्याचे दिसून येते. आग लागलेली जागा ही पूर्वीपासून नो डेव्हलपमेंट झोन म्हणूनच आहे. आग लागलेल्या परिसरात विकासकाची सेक्युरीटी केबिन होती. केबिनला काही झाले नाही. आरे कॉलनी किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बफर झोनमध्ये बांधकामावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे.- रोहित जोशी, पर्यावरणवादीआग लागलेले क्षेत्र हे आरे रि-डेव्हलपमेंट बोर्डच्या नियंत्रणाखालचे नाही, तर खासगी विकासकाने ताबा दाखवल्याने ही जागा खासगी माणसाकडे आहे, असे सांगितले जाते. परंतु ही जागा आरेचीच आहे. मात्र, संबंधिताकडे जागा केव्हा आणि कशी ताब्यात गेली याची चौकशी झाली पाहिजे. आपण जर मागच्या काही वर्षांपूर्वीचे गुगल मॅपवरील फोटो पाहिले तर आपल्याला असे दिसेल की, येथे वृक्ष, झरे, नदी, धबधबा आहे. परंतु वृक्ष वाढू नयेत यासाठी प्रत्येक वर्षी दोन वेळा जंगलाला आग लावली जाते. आता ही जागा स्पेशल डेव्हलपमेंट झोनमध्ये गेल्याचे समजतेय. - डी. स्टॅलिन, संचालक, वनशक्ती प्रकल्प 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईthaneठाणे