शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

वाढत्या बांधकामांमुळे रोडपालीत धुरळा, नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 03:08 IST

रोडपाली नोडमध्ये पाणी, कचरा, अवजड वाहतूक आदी समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. ट्रक, कंटेनर, रासायनिक टँकर रस्त्यावर बेकायदेशीर उभे केले जातात.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : रोडपाली नोडमध्ये पाणी, कचरा, अवजड वाहतूक आदी समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. ट्रक, कंटेनर, रासायनिक टँकर रस्त्यावर बेकायदेशीर उभे केले जातात. त्यामुळे वाहतूककोंडी होतेच; शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या ठिकाणी मोठमोठी बांधकामे सुरू असल्याने रस्त्यावर मातीच माती पसरली आहे. त्यामुळे परिसरात धूळप्रदूषण वाढले असून त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून येत आहेत.कळंबोली वसाहतीच्या वरच्या भागात साडेबारा टक्के जमिनीवर रोडपालीचे सेक्टर विकसित करण्यात आले आहेत. सेक्टर १३, १४, १५, १६, १७ आणि २० येथे नागरी वस्ती आहे. येथे तीन वर्षांपूर्वी केबल टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे बरेच रस्ते उखडले आहेत. सिडकोने त्यावर अद्याप मलमपट्टी केलेली नाही.सध्या रोडपाली तलावालगतच्या भूखंडावर सिडकोचे गृहनिर्माण सुरू आहे. येथे अनेक इमारती उभ्या राहत आहेत. सेक्टर १७ येथे श्री बालाजी इंटरनॅशनल स्कूचे कामही जलद गतीने सुरू आहे. दुसऱ्या बाजूला प्लॅटीनम हे खासगी गृहसंकुल उभे राहत आहे. याशिवाय परिसरात अन्य इमारतींचीही काम सुरू आहेत. मुख्यालय रस्त्यावरील राधेकृष्णा सोसायटीच्या बाजुला मोकळ्या जागेत मातीचा भराव करण्यात आला आहे. याशिवाय या भागात पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या सर्व कामाकरता मोठे खोदकाम केले जात आहे. येथील माती उचलून दुसºया ठिकाणी वाहून येत असताना ती रस्त्यावर पडते. तसेच बांधकाम साहित्य आजूबाजूला पडल्याने रस्त्यावर माती पसरल्याचे दिसून येत आहे.पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय झाला होता. आता तापमानात वाढ झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. एखादे वाहन गेल्यास प्रचंड धूळ उडते, त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला आहे. रोडपाली गावासह सेक्टर १५, १७ आणि २० मधील वातावरण धूरकट झाले आहे. वाहने वेगाने गेल्यावर धूळ उडत असल्याने जिकडेतिकडे धूळच दिसत आहे. याचा त्रास पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही होत आहे.आजूबाजूच्या इमारतीमध्येही धूळ उडत असल्याने दारे-खिडक्या कायम बंद ठेवाव्या लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच परिसरातील दुकानदारही धुलीकणामुळे हैराण झाले आहेत.डंपर आणि हायवामधून बाहेर पडलेली माती त्वरीत बाजूला करणे, हे त्या त्या बांधकाम ठेकेदारांचे काम आहे. तसेच धूळ उडू नये म्हणून त्यावर पाणी मारणे गरजेचे आहे. परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे प्रभाग सात मधील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी महापालिका आणि सिडकोकडे केली आहे. याविषयी त्या त्या ठेकेदार आणि बिल्डरांना सूचना द्यावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.अवजड वाहतुकीचाही त्राससेक्टर १७ आणि २० येथील अंतर्गत रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. तसेच मोकळ्या भूखंडांवरही वसुलीदादांमार्फत बेकायदेशीर पार्र्किं ग सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे. आतमधील माती मोठ्या वाहनांमुळे रस्त्यावर येते. यावरून ट्रक, कंटेनर आणि टँकर गेल्यावर धुरळा उडत असल्याचे रोडपाली येथील स्थानिक रहिवासी अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बांधकाम परवानगीचे नियम धाब्यावरपनवेल महापालिकेने रोडपालीतील गृहप्रकल्पांना बांधकामाची परवानगी दिली आहे. ही परवानगी देत असताना आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होता कामा नये. तसेच बांधकाम साहित्य आणि माती, डबर, ग्रीट पावडर, सळई रस्त्यावर पडता कामा नये, याप्रमाणे अनेक अटी आणि शर्ती घातल्या जातात. परंतु रोडपाली येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी हे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. महापालिकेच्या परवानगी देणाºया विभागाकडून याबाबत कारवाई होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई