शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

अतिवृष्टीमुळे नवी मुंबईतील आठ वसाहतींना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 02:35 IST

चार दिवस पावसाने झोडपल्यामुळे नवी मुंबईही जलमय झाली आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत ८०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी प्रमाण दुप्पट झाले असून, तब्बल १६८५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - चार दिवस पावसाने झोडपल्यामुळे नवी मुंबईही जलमय झाली आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत ८०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी प्रमाण दुप्पट झाले असून, तब्बल १६८५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरातील आठ वसाहतींमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असून, ३७८ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मुसळधार पावसामुळे इंदिरानगर परिसरातील गणपती पाडा येथे झोपडी पडली असून, जवळपास १५ घरेही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरात कोणी नसताना ही दुर्घटना घडल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. मंगळवारी चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शहरातील इतर ठिकाणीही भूस्खलन होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपत्कालीन विभागाने यापूर्वीच आठ झोपडपट्ट्यांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असून, रहिवाशांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने ३७८ इमारती धोकादायक घोषित केल्या असून, त्यामधील ५८ इमारती अतिधोकादायक आहेत. या सर्व इमारतींमधील रहिवाशांना घरांचा वापर थांबविण्यात यावा, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या सर्व ठिकाणी प्रशासनाने सूचना दिलेल्या असून, काही ठिकाणी सूचना फलकही लावले आहेत. गणपतीपाडा येथील दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नवी मुंबईमध्ये २६ जुलै २००५च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत मनपाक्षेत्रामध्ये ८०९ मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी पावसाने नवीन विक्रम प्रस्थापित केला असून, १६०५ मि. मी. नोंद झाली आहे. मोरबे धरण परिसरामध्येही १६०१ मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली असून, धरण ८२.७० मीटरपर्यंत भरले आहे. महापालिकेने आठ विभाग कार्यालय, अग्निशमन केंद्र व मुख्यालयामधील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.उरण फाट्यावर टँकरला अपघातसायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे एच.पी. कंपनीचा टँकर रोडच्या कठड्यावरून खाली कोसळला. एकता विहार सोसायटीला लागून असलेल्या पॉवर हाउसवर पडला. टँकर रोडपासून जवळपास १०० फूट खाली कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला व परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.पामबीच रोडवर ट्रेलरचा अपघातपामबीच रोडवर अवजड वाहनांना बंदी घातली आहे; परंतु नियम धाब्यावर बसवून रात्री अवजड वाहने या रोडवरून जात आहेत. सोमवारी मध्यरात्री बेलापूरच्या दिशेने जाणारा ट्रेलर नेरुळ-उरण रेल्वे ब्रिजच्या खाली अडकला, यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. उंची मर्यादेसाठीचे गेट तोडून कंटेनर पुलाला धडकला. या घटनेमुळे पामबीच रोडवर अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.आवक घसरलीमुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावरही झाला आहे. सोमवारी ५ मार्केटमध्ये १८७४ ट्रक व टेंपोची आवक झाली होती. मंगळवारी फक्त १३०१ वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली आहे. पावसामुळे ग्राहकांनीही पाठ फिरविली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस