शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पनवेल परिसराच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:51 IST

नवीन पनवेल, कळंबोलीत पाणीटंचाई : एमजेपीच्या ढिसाळ कारभाराचा फटका

कळंबोली : कडक ऊन आणि त्यामध्ये कमालीच्या पाणीटंचाईला पनवेलकरांना सामोरे जावे लागत आहे. एमजेपीच्या ढिसाळ नियोजनामुळे कळंबोली, नवीन पनवेलमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाण्याची कमतरता भासत आहे. रहिवाशांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यामुळे सिडको अधिकाऱ्यांना स्थानिक रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.भोकरपाडा ते पनवेल या दरम्यानच्या जलवाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने वारंवार शटडाउन घेतला जात आहे. त्याचबरोबर पाताळगंगा नदीत टाटा पॉवर कंपनी पाणी सोडते. तेच पाणी पनवेलकरांना पिण्यासाठी दिले जाते. मात्र, सुटीच्या दिवशी वीजनिर्मिती केंद्र बंद ठेवण्यात येत असल्याने पाणी नदीच्या पात्रात येत नाही. रविवारी त्यामुळे पाताळगंगा नदीत पाणी नसल्याने एमजेपीकडून पाणी मिळाले नाही. शनिवारी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकरिता शटडाउन घेण्यात आला होता. त्याचा परिणाम सोमवारी जाणवला. अतिशय कमी दाबाने पाणी सोडण्यात आले. मात्र, मंगळवारी भोकरपाडा येथे महावितरण कंपनीने मान्सनपूर्व कामाकरिता शटडाउन घेतल्याने दिवसभर वीज बंद होती. या कारणाने पनवेल आणि सिडको वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. या कारणाने पनवेलसह कळंबोली, नवीन पनवेलमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली.रहिवासी पाण्यासाठी बादल्या आणि हंडे घेऊन फिरताना दिसले. काहींनी पिण्याकरिता दुकानातून मिनरल वॉटर घेतले. कार्यकारी अभियंता दिलीप बोकाडे, चंद्रहास सोनकुसरे यांनी टंचाईच्या ठिकाणी तात्पुरता उपाय म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. मात्र, पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दोनही अधिकाºयांनी मोबाइल बंद करून ठेवले त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.सिडकोच्या घरातील रहिवाशांचे हालनवीन पनवेल, खांदा वसाहतीत सिडकोने उभारलेल्या इमारतीत पाण्याच्या टाक्यांची सोय नाही. त्यामुळे पाणी साठवणूक करता येत नाही, त्यामुळे रहिवाशांचे टंचाईच्या काळात हाल होत आहेत. नवीन पनवेल सेक्टर-१७मध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे. वरच्या मजल्यांना पाणीच जात नसल्याने अनेक ठिकाणी ज्येष्ठांना पाणी घरी घेऊन जावे लागत आहे. हीच स्मार्ट सिटी आहे का? असा सवाल माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत पाणी येत नाही, त्यामुळे सर्व नित्यक्र म बिघडला आहे, स्वयंपाक करण्यापासून ते कपडे व इतर कामे करता येत नाहीत. पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत आहे. नियमित कर भरूनही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. आम्हाला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न पडत आहे.- मंगला भैरू पवार, गृहिणी, कळंबोलीएमजेपी, टाटा पॉवर आणि महावितरण यांच्यात समन्वय नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडून कोणतीच माहिती मिळत नाही, त्यामुळे नियोजन करता येत नाही. त्यामुळे सिडकोला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.- दिलीप बोकाडे, कार्यकारी अभियंता, सिडकोनवीन पनवेलमधील पीएल-६मध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाण्याची अडचण आहे. अनेकांनी दोन ते तीन दिवस अंघोळ केलेली नाही. पाणी नसल्याने सर्वच कामे खोळंबली आहेत, मुलांना शाळेत सुट्ट्या आहेत म्हणून तरी ठीक आहे, नाही तर मोठी अडचण झाली असती.- संतोष सुतार, रहिवासी, नवीन पनवेल

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई