शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

आंबेडकर रोडवर सर्वत्र घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: July 16, 2015 23:46 IST

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील ‘क’ प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत ‘३४ डॉ. आंबेडकर रोड’ या प्रभागातील बऱ्याच भागात पायवाटा, गटारींच्या नावाने बोंबाबोंब आहे.

- अरविंद म्हात्रे,  चिकणघरकल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील ‘क’ प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत ‘३४ डॉ. आंबेडकर रोड’ या प्रभागातील बऱ्याच भागात पायवाटा, गटारींच्या नावाने बोंबाबोंब आहे. ठराविक ठिकाणीच पायवाटा आहेत. कचरा चार-चार दिवस उचलला जात नसल्याने प्रभागात घाणीचे साम्राज्य आहे. याबाबत नगरसेविकेला तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्न्याने समस्या तशाच असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.या प्रभागातील मुर्गी मोहल्ला परिसरात पायवाटा आणि गटारींची कामे झालेली नाहीत. गल्लीसमोरच कचऱ्याचे ढीग असून त्यावर कुत्री वावरतात. यामुळे दुर्गंधीचा सामना रहिवाशांना करावा लागतो. याबाबत नगरसेविका तक्रारी करूनही का लक्ष देत नाही? अशीच अवस्था संत रोहिदास वाड्याची आहे. येथे काही ठिकाणी पायवाटा आहेत. परंतु, मारूती मंदिरजवळ वर्षभरापासून गटारी नादुरूस्त असल्यामुळे घाणपाणी साठते. यामुळे मंदिरात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रभागही अधिकाधिक स्लम आहे. या प्रभागात डॉ. आंबेडकर रोड, पाठारे नर्सरी, रोहिदास वाडा, मदारछल्ला, सुभाष मैदान, शंकरराव चौक, मनपा कर्मचारी वसाहत, वलीपीर रोडच्या जोकर सिनेमाजवळील परिसर, क्रिश्ना नगर, मुर्गी मोहल्ला, शेख बाबूचाळ असा परिसराचा समावेश आहे. नगरसेविकेचे परिसराच्या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष नसल्यामुळे नागरिकांना पायाभूत सुविधांपासूनही वंचित रहावे लागत असल्याचे चित्र या प्रभागात हिंडताना दिसून येते.क्रिश्नानगरमध्ये गटारी तुंबलेल्या आहेत. पायवाटा ठिकठिकाणी निखळलेल्या आहेत. कचऱ्याची उचल नियमित नाही. यामुळे या भागाला बकालवस्था आहे. विशेष म्हणजे मनपा कर्मचारी वसाहतीत सुद्धा सुविधांची वाणवा आहे. मनपाचे ‘क’ प्रभाग अधिकारी आणि या प्रभागाच्या नगरसेविका करतात तरी काय? नागरिकांच्या असुविधांकडे त्यांचे का लक्ष नाही? डॉ. आंबेडकर रोडला मध्येमध्ये पडलेले खड्डे बुजविले आहेत. मात्र दोन्ही बाजूंच्या गटारी आणि साठलेला कचरा याकडे लक्षच नसल्याने या रोडवरून चालताना घ्ाांणीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागते. कचरा साठलेल्या जागी माशा घोंगावत आहेत. कृत्री वावरत आहेत. डासांचा प्रादुर्भाव आहे आणि त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीची भिती आहेच. या प्रभागात दखल घेण्यासारखी विकासकामे झाल्याचे दिसत नाहीत. काही ठिकाणी खाजगी मालकांच्या चाळी आहेत. तेथे काम करण्यास मज्जाव आहे, या भागात ब्रिफची दुकाने असल्याने त्यांची घाण कचरा कुंडीत टाकली जाते. दुर्गंधीमुळे मनपाचे सफाई मुकादम कचरा उचलण्यास चालढकल करतात. मनपा आयुक्तांना याबाबत सांगितले आहे. राहिलेल्या गटारे, पायवाटांना अडचणी आहेत. - उषा रमेश वाळंज, नगरसेविका, प्र्रभाग -३४,