शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे डीपी नादुरुस्त : घारापुरी बेटावरची बत्ती गुल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 21:45 IST

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी मिळालेल्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला ग्रहण लागले आहे.

मधुकर ठाकूर

उरण : महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी मिळालेल्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला ग्रहण लागले आहे. याआधीच पाच पैकी तीन फेज नादुरुस्त झाल्याने बेटवासियांवर अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली होती.तीन फेजच्या वीजपुरवठ्याअभावी पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप बंद पडल्याने तीनही गावातील नागरिकांना होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासूनच ठप्प झाल्याने  बेटवासिय आणि पर्यटकांच्या नशिबी विहिरी, पावसाळ्यातील पागोळीचे पाणी पिण्याची पाळी आली असतानाच बेटावरील वीजपुरवठा करणारा डीपीच शुक्रवारी  नादुरुस्त झाल्याने जागतिक कीर्तीचे बेटावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

 बेटवासियांना कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यासाठी २० कोटी रुपये खर्चून समुद्रातून न्युट्लसह टाकण्यात आलेल्या उच्च दाबाच्या पाचही वीज वाहिन्यांचे काम तांत्रिकदृष्ट्या सदोषच झाले आहे.उद्घाटनासाठी गावागावात घाईघाईत टाकलेल्या अंतर्गत केबल्स जमिनीवर टाकण्यात आल्याने वारंवार दोष निर्माण होत आहे.समुद्रातुन टाकण्यात आलेल्या मोराबंदर गावातील मुख्य केबल वाहिन्यांच्या डीपीमध्ये सुरुवातीपासूनच वारंवार बिघाड उद्भवत असल्याने बेटावरील वीज वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.या ठिकाणी होणाऱ्या वारंवार बिघाडावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास भविष्यात सबमरिन केबललाच फटका बसण्याची भीतीही तत्कालीन सरपंच बळीराम ठाकूर यांनी २०२० मध्येच पत्राद्वारे व्यक्त केली होती.मात्र या गंभीर तक्रारींकडेमहावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र बेटावासियांवर मागील आठवड्यापासूनच अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली होती.बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील उच्च दाबाच्या पाच विद्युत वाहिन्यांपैकी एक केबल २१ मे २०२२ रोजी नादुरुस्त होऊन निकामी झाली आहे.चारपैकी एक विद्युत केबल १५ जुन २०२३ रोजी निकामी, नादुरुस्त झाली आहे.त्यामुळे सध्या बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर,या तीनही गावांना दोन फेजवरुनच वीजपुरवठा केला जात होता.

बेटवासियांना पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपांना थ्रीफेज वीजेचा तुटवडा भासत असल्याने ग्रामपंचायत करीत असलेल्या तीनही गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने  बेटवासियांना आता पिण्यासाठी आणि पर्यटकांच्या नशिबी विहिरी, पावसाळ्यातील पागोळीचे पाणी पिण्याची पाळी आली होती.या संकटांचा सामना करीत असतानाच बेटावरील राजबंदर गावाला वीजपुरवठा करणारा डीपीच शुक्रवारी (३०) संध्याकाळी नादुरुस्त झाल्याने जागतिक कीर्तीचे बेटावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.घारापुरी बेटावर वीज पुरवठा करणाऱ्या समुद्राखालील नादुरुस्त झालेल्या केबल्सचा शोध खासगी ड्रायव्हर्स मार्फत मागील आठ दिवसांपासून घेतला जात आहे.समुद्राखालील तांत्रिक बिघाडाचाही शोध घेण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या केबल्सची दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत.मात्र किती कालावधी लागेल हे निश्चितपणे सांगता येत नाही.शुक्रवारी (३०) बेटावरील डीपी अतिरिक्त लोड आल्याने अचानक नादूरुस्त झाला आहे. जाग्यावरच डीपी दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था : वीज पुरवठा तुर्तास पुर्ववत

राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावातील बेटवासियांना पाणी पुरवठा करण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने इंधनावर चालणाऱ्या जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे बेटवासियांचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.बेटावरील राजबंदर येथील नादुरुस्त डीपीच्या दूरुस्तीचे काम मंगळवारी (४) संध्याकाळी पाचनंतर पुर्ण झाले आहे.त्यामुळे राजबंदरसह तीनही गावातील दोन फेजवरुनच तुर्तास वीजपुरवठा सुरू झाला आहे.मात्र समुद्रातील केबल्स दूरुस्तीखेरीज बेटावरील वीजेची समस्या दूर होणार नसल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.