शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

उरणकरांनो, वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:49 IST

आजपर्यंत शासनाने विविध कर आणि वाहतुकीचे विविध नियम मोडल्याबद्दल हजारो वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला आहे.

उरण : आजपर्यंत शासनाने विविध कर आणि वाहतुकीचे विविध नियम मोडल्याबद्दल हजारो वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून वाहतूककोंडी आणि खड्डेमय रस्त्यांपासून नागरिकांची अद्यापही सुटका झालेली नाही. त्यामुळे आता उरणकर यापुढे वाहतुकीचे कोणतेही नियम पाळणार नाहीत, दंडही भरणार नाहीत. त्यामुळे आता नागरिकांच्या जीवाची पर्वा करणे, ट्रॅफिक पोलिसांनी सोडून द्यावे.त्या शिवाय शासनाला कोणत्याही प्रकारचा करही भरणार नाहीत. जेव्हा उरणमधून पैसे गोळा होणार नाहीत, तेव्हाच आपल्या समस्या सोडवल्या जातील आणि सरकारला जाग येईल. उरणकरांना आवाहन करणाऱ्या समाजमाध्यमांवर पाठविण्यात आलेल्या मेसेजमुळे शासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. उरण-पनवेल, उरण-बेलापूर मार्गावरील आणि उरण-जेएनपीटी परिसरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे.उन्हाळा असो की पावसाळा, उरणकरांना मागील अनेक वर्षांपासून वाढत्या अवजड वाहनांच्या रहदारीमुळे होणाºया प्रचंड वाहतूककोंडीचा समाना करावा लागत आहे, अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विविध छोट्या-मोठ्या अपघातांमुळे मागील सात-आठ वर्षांत सुमारे ८५० हून अधिक निष्पाप नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रस्त्यांवरील विविध अपघातांमुळे हजारो तरुणांचा मृत्यू होत आहे. कुणाचा भाऊ, तर कुणाचा बाप, तर कुणाची आई, तर कुणाच्या आईवडिलांचा एकुलता एक कमावता मुलगा अपघात दगावला. ज्यांचा मुलगा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामुळे दगावला आहे, असे आईबाप कसे जगतात, याचा शासनाने विचार केलाय का कधी? असा प्रश्न समाजमाध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.याला कारणीभूत ठरत आहेत खराब रस्ते, रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्यावरील अतिक्रमण करीत उभी ठेवण्यात येत असलेली अवजड वाहने, रस्त्यांवरील अंधार, रस्त्यांवर पडून साचलेला दगड-मातीचा कचरा, खोदलेले रस्ते वेळीच बनवले नाहीत, खड्ड्यात पाणी साचून राहते.>नागरिकांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्येक उरणकरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.शासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांमध्ये खळबळ माजली आहे.नागरिकांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्येक उरणकरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.