शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
4
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
5
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
6
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
7
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
8
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
9
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
10
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
11
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
12
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
13
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
14
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
15
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
16
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
17
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
18
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
19
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
20
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?

उरणकरांनो, वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:49 IST

आजपर्यंत शासनाने विविध कर आणि वाहतुकीचे विविध नियम मोडल्याबद्दल हजारो वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला आहे.

उरण : आजपर्यंत शासनाने विविध कर आणि वाहतुकीचे विविध नियम मोडल्याबद्दल हजारो वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून वाहतूककोंडी आणि खड्डेमय रस्त्यांपासून नागरिकांची अद्यापही सुटका झालेली नाही. त्यामुळे आता उरणकर यापुढे वाहतुकीचे कोणतेही नियम पाळणार नाहीत, दंडही भरणार नाहीत. त्यामुळे आता नागरिकांच्या जीवाची पर्वा करणे, ट्रॅफिक पोलिसांनी सोडून द्यावे.त्या शिवाय शासनाला कोणत्याही प्रकारचा करही भरणार नाहीत. जेव्हा उरणमधून पैसे गोळा होणार नाहीत, तेव्हाच आपल्या समस्या सोडवल्या जातील आणि सरकारला जाग येईल. उरणकरांना आवाहन करणाऱ्या समाजमाध्यमांवर पाठविण्यात आलेल्या मेसेजमुळे शासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. उरण-पनवेल, उरण-बेलापूर मार्गावरील आणि उरण-जेएनपीटी परिसरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे.उन्हाळा असो की पावसाळा, उरणकरांना मागील अनेक वर्षांपासून वाढत्या अवजड वाहनांच्या रहदारीमुळे होणाºया प्रचंड वाहतूककोंडीचा समाना करावा लागत आहे, अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विविध छोट्या-मोठ्या अपघातांमुळे मागील सात-आठ वर्षांत सुमारे ८५० हून अधिक निष्पाप नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रस्त्यांवरील विविध अपघातांमुळे हजारो तरुणांचा मृत्यू होत आहे. कुणाचा भाऊ, तर कुणाचा बाप, तर कुणाची आई, तर कुणाच्या आईवडिलांचा एकुलता एक कमावता मुलगा अपघात दगावला. ज्यांचा मुलगा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामुळे दगावला आहे, असे आईबाप कसे जगतात, याचा शासनाने विचार केलाय का कधी? असा प्रश्न समाजमाध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.याला कारणीभूत ठरत आहेत खराब रस्ते, रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्यावरील अतिक्रमण करीत उभी ठेवण्यात येत असलेली अवजड वाहने, रस्त्यांवरील अंधार, रस्त्यांवर पडून साचलेला दगड-मातीचा कचरा, खोदलेले रस्ते वेळीच बनवले नाहीत, खड्ड्यात पाणी साचून राहते.>नागरिकांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्येक उरणकरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.शासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांमध्ये खळबळ माजली आहे.नागरिकांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्येक उरणकरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.