शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

उरणकरांनो, वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:49 IST

आजपर्यंत शासनाने विविध कर आणि वाहतुकीचे विविध नियम मोडल्याबद्दल हजारो वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला आहे.

उरण : आजपर्यंत शासनाने विविध कर आणि वाहतुकीचे विविध नियम मोडल्याबद्दल हजारो वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून वाहतूककोंडी आणि खड्डेमय रस्त्यांपासून नागरिकांची अद्यापही सुटका झालेली नाही. त्यामुळे आता उरणकर यापुढे वाहतुकीचे कोणतेही नियम पाळणार नाहीत, दंडही भरणार नाहीत. त्यामुळे आता नागरिकांच्या जीवाची पर्वा करणे, ट्रॅफिक पोलिसांनी सोडून द्यावे.त्या शिवाय शासनाला कोणत्याही प्रकारचा करही भरणार नाहीत. जेव्हा उरणमधून पैसे गोळा होणार नाहीत, तेव्हाच आपल्या समस्या सोडवल्या जातील आणि सरकारला जाग येईल. उरणकरांना आवाहन करणाऱ्या समाजमाध्यमांवर पाठविण्यात आलेल्या मेसेजमुळे शासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. उरण-पनवेल, उरण-बेलापूर मार्गावरील आणि उरण-जेएनपीटी परिसरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे.उन्हाळा असो की पावसाळा, उरणकरांना मागील अनेक वर्षांपासून वाढत्या अवजड वाहनांच्या रहदारीमुळे होणाºया प्रचंड वाहतूककोंडीचा समाना करावा लागत आहे, अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विविध छोट्या-मोठ्या अपघातांमुळे मागील सात-आठ वर्षांत सुमारे ८५० हून अधिक निष्पाप नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रस्त्यांवरील विविध अपघातांमुळे हजारो तरुणांचा मृत्यू होत आहे. कुणाचा भाऊ, तर कुणाचा बाप, तर कुणाची आई, तर कुणाच्या आईवडिलांचा एकुलता एक कमावता मुलगा अपघात दगावला. ज्यांचा मुलगा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामुळे दगावला आहे, असे आईबाप कसे जगतात, याचा शासनाने विचार केलाय का कधी? असा प्रश्न समाजमाध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.याला कारणीभूत ठरत आहेत खराब रस्ते, रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्यावरील अतिक्रमण करीत उभी ठेवण्यात येत असलेली अवजड वाहने, रस्त्यांवरील अंधार, रस्त्यांवर पडून साचलेला दगड-मातीचा कचरा, खोदलेले रस्ते वेळीच बनवले नाहीत, खड्ड्यात पाणी साचून राहते.>नागरिकांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्येक उरणकरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.शासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांमध्ये खळबळ माजली आहे.नागरिकांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्येक उरणकरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.