शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

ब्रेकिंग न्यूजच्या मागे धावू नका, गणेश नाईक यांचे पत्रकारांना आवाहन

By कमलाकर कांबळे | Updated: September 6, 2023 19:56 IST

हल्लीची पत्रकारिता आवाहनात्मक बनली आहे. समाज माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याख्या बदलू लागली आहे.

नवी मुंबई : हल्लीची पत्रकारिता आवाहनात्मक बनली आहे. समाज माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याख्या बदलू लागली आहे. त्यामुळे पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजच्या मागे न धावता बातमीच्या मुळाशी जाण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी केले आहे.

नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत अशोक जालनावाला यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त जालनावला फाउंडेशनने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पत्रकारिता आजची आणि उद्याची, या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अशोक जालनावाला यांची पत्रकारिता समाजाभिमुख होती. समाजाला दिशा दाखविण्याचे काम त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे आजच्या पत्रकारांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही नाईक यांनी याप्रसंगी दिला. तर आमदार मंदा म्हात्रे यांनी स्व. अशोक जालनावाला यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले.

आपल्या लेखनीतून त्यांनी अनेकांना न्याय दिला. अनेकांची राजकीय कारकीर्द घडविली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जालनावाला यांनी पत्रकरिता केली, असे गौरवोद्गार त्यांनी वेळी काढले. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विजय कुवळेकर, पराग करंदीकर आणि राजकीय विश्लेषक राजू परूळेकर या वक्त्यांनी पत्रकारिता आजची आणि उद्याची या विषयावर मार्गिक विश्लेषण केले.

या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक, कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेनेचे शहरप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विठ्ठल मोरे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय मोहिते उपस्थित होते. महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी सूत्रसंचालन तर जालनावाला फाउंडेशचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी आभार मानले.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकJournalistपत्रकारNavi Mumbaiनवी मुंबई