शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ब्रेकिंग न्यूजच्या मागे धावू नका, गणेश नाईक यांचे पत्रकारांना आवाहन

By कमलाकर कांबळे | Updated: September 6, 2023 19:56 IST

हल्लीची पत्रकारिता आवाहनात्मक बनली आहे. समाज माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याख्या बदलू लागली आहे.

नवी मुंबई : हल्लीची पत्रकारिता आवाहनात्मक बनली आहे. समाज माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याख्या बदलू लागली आहे. त्यामुळे पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजच्या मागे न धावता बातमीच्या मुळाशी जाण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी केले आहे.

नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत अशोक जालनावाला यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त जालनावला फाउंडेशनने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पत्रकारिता आजची आणि उद्याची, या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अशोक जालनावाला यांची पत्रकारिता समाजाभिमुख होती. समाजाला दिशा दाखविण्याचे काम त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे आजच्या पत्रकारांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही नाईक यांनी याप्रसंगी दिला. तर आमदार मंदा म्हात्रे यांनी स्व. अशोक जालनावाला यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले.

आपल्या लेखनीतून त्यांनी अनेकांना न्याय दिला. अनेकांची राजकीय कारकीर्द घडविली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जालनावाला यांनी पत्रकरिता केली, असे गौरवोद्गार त्यांनी वेळी काढले. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विजय कुवळेकर, पराग करंदीकर आणि राजकीय विश्लेषक राजू परूळेकर या वक्त्यांनी पत्रकारिता आजची आणि उद्याची या विषयावर मार्गिक विश्लेषण केले.

या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक, कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेनेचे शहरप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विठ्ठल मोरे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय मोहिते उपस्थित होते. महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी सूत्रसंचालन तर जालनावाला फाउंडेशचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी आभार मानले.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकJournalistपत्रकारNavi Mumbaiनवी मुंबई