शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

डायल ११२ : मदतीला धावण्यात नवी मुंबई पोलिस दुसरे; मीरा भाईंदरची राज्यात आघाडी

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 14, 2023 16:15 IST

मीरा भाईंदर सर्वसाधारण साडेपाच मिनिटाच्या आत मदतीला धावून जात आहेत.

नवी मुंबई : नागरिकांना मदतीसाठी सुरु करण्यात आलेल्या ११२ या हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारीला रिस्पॉन्स देण्यात नवी मुंबईपोलिस राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. काही महिन्यांपूर्वी १४ मिनिटांवर असलेला त्यांचा रिस्पॉन्स टाइम पाच ते सहा मिनिटांवर पोहचला आहे. तर मीरा भाईंदर सर्वसाधारण साडेपाच मिनिटाच्या आत मदतीला धावून जात आहेत. 

राज्यात सुरु करण्यात आलेली ११२ हेल्पलाईन येत्या काळात संपूर्ण देशासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे हि हेल्पलाईन अधिकाधिक प्रभावी व्हावी व गरजूंना त्याद्वारे मदत मिळावी यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. त्यानुसार हेल्पलाईनवर तक्रार मिळताच कमीत कमी वेळेत पोलिसांची मदत त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे यावर भर दिला जात आहे. त्यानुसार मागील वर्षभराचा आढाव्यात नवी मुंबई पोलिस दुसऱ्या क्रमांकावर मजल मारू शकले आहेत. हेल्पाईन सुरु झाली तेंव्हा १४ मिनिटावर असलेला रिस्पॉन्स कालावधी कमी करून तो ५ ते ६ मिनिटावर पोहचला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. प्रथम क्रमांकावर मीरा भाईंदर पोलिस असून त्यांचा रिस्पॉन्स टाईम हा साडेपाच मिनिटाहून कमी आहे. तर पहिल्या दहामध्ये नवी मुंबई पोलिसांनंतर औरंगाबाद शहर, नाशिक शहर, ठाणे शहर, सोलापूर शहर, नागपूर शहर, अमरावती शहर, पिंपरी चिंचवड व दहाव्या क्रमांकावर पुणे शहर पोलिस आहेत. त्यांचा रिस्पॉन्स कालावधी हा साडेबारा मिनिटाचा आहे. ग्रामीण व शहरी भागात रिस्पॉन्स टाईम मध्ये अंतर असल्याचे कायदा व सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी सांगितले. भौगोलिक दृष्ट्या शहरी भागाचे अंतर कमी असते. त्यामुळे कमीत कमी वेळेत पोलिस एखाद्या ठिकाणी पोहचू शकतात. मात्र ग्रामीण भागातली गावे दूर दूरवर असतात. त्यामुळे तिथपर्यंत पोहचहयला पोलिसांना काहीसा जास्त कालावधी लागतो. त्यानंतर देखील हा रिस्पॉन्स टाईम कमी कसा करता येईल यावर अभ्यास सुरु असल्याचेही त्यांनी वाशी येथे सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर