शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

हयात नसलेल्या युवतीचा शोध आणि संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:14 IST

आक्रमक जमावाच्या दबावापोटी पोलिसांनी पंचाराम यांच्या सुसाइड नोटवरून पाच जणांना बेड्या ठोकल्या.

चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणाऱ्या रिठाडिया कुटुंबातील मुलगी आरती हिने ३० मार्च रोजी घर सोडले ते कायमचेच. वडील पंचाराम यांच्या तक्रारीवरून नेहरुनगर पोलिसांनी आरती हरवल्याची नोंद दाखल करून घेत तपास सुरू केला. ८ महिने उलटले, तरीही मुलीचा काहीच थांगपत्ता न लागल्याने, पंचाराम यांनी टिळकनगर रेल्वे स्थानकात लोकलसमोर उडी घेत आपले आयुष्य संपविले. या घटनेने संतप्त झालेला रेगर समाज रस्त्यावर उतरला. पंचाराम यांच्या अंत्ययात्रेला हिंसक वळण लागले. ५ ते ६ हजारांच्या जमावाने जोरदार निदर्शने करत पोलिसांवर दगडफेक केली. त्यात ६ पोलीस गंभीर जखमी झाले.

आक्रमक जमावाच्या दबावापोटी पोलिसांनी पंचाराम यांच्या सुसाइड नोटवरून पाच जणांना बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही आणि संशयितांच्या चौकशीत गुरफटलेल्या स्थानिक पोलिसांकडून हा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ६कडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांनी विशेष पथक नेमून तपासाला सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, अर्चना कुदळे, सहायक उपनिरीक्षक सुरेश पवार, अंमलदार उज्ज्वल सावंत आणि सुनील पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक यांच्या पथकाने मुंबईसह ठाणे, नवी मुंबईच्या हद्दीपर्यंत तपासाची दिशा निश्चित केली.

या शोधाची सुरुवात आरती राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेज पडताळणीने झाली. त्यातून काहीच हाती न आल्याने आरती आणि तिच्या संपर्कात असलेल्यांचे सीडीआर काढले गेले. त्यात, आरतीने अखेरचा कॉल भागचंद फुलारिया (२३) या तरुणाला केल्याचे समजताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून काही हाती न आल्याने, मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांसह ठाणे, नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाणी आणि रेल्वे पोलिसांकडील रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात झाली.

मुलीचा शोध घेणे आव्हान झाले होते. अखेर, तब्बल दहा महिन्यांनी म्हणजेच ३० जानेवारी, २०२० रोजी पोलीस पोलीस पथक सायन रुग्णालयातील अपघाती, तसेच बेवारस मृतदेहांची माहिती घेत असता, एका २२ वर्षीय बेवारस तरुणीचा तपशील त्यांच्या हाती लागला आणि तपासाची दिशाच बदलली.

३० मार्च, २0१९ रोजी त्या तरुणीने टिळकनगर स्थानकात लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केली होती. गेले दहा महिने हयातच नसलेल्या व्यक्तीचा तिचे कुटुंबीय, पोलीस शोध घेत होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एकमजली घराच्या पोटमाळ्यावरील खिडकीतून समोरच्या घरात राहणाºया भागचंदशी आरतीची नजरानजर झाली. ओढ वाढत गेली. चॅटिंग वाढत जाऊन एकमेकांचे मोबाइल क्रमांकही शेअर झाले. दोघांची गाठभेट होण्यापूर्वीच आरतीच्या लग्नासाठी घरात बोलणी सुरू झाली.

३० मार्चच्या सायंकाळी आरतीने भागचंदला कॉल करून त्याबाबत सांगितले. भागचंदने तिला घरचे सांगत असल्याप्रमाणे लग्न करण्याचा सल्ला दिला. दोघांचे ते संभाषण तिच्या बहिणीच्या कानावर पडले. बहिणीने तिला दटावत याबाबत आईबाबांना सांगण्याची धमकी दिली. तेव्हा ‘जे करायचे ते कर,’ असे म्हणत रागाच्या भरात आरतीने घर सोडले आणि तिने थेट रेल्वेतून उडी घेत आपले आयुष्य संपविले.ज्या मुलासाठी तिने आयुष्य संपविले, तो एका डोळ्याने अंध आहे. तो विवाहित असून त्याला मूलही आहे. मात्र, आरती त्याबाबत अनभिज्ञ होती. तो आरतीसमोर येण्यास घाबरत होता. आपल्या डोळ्याबाबत समजताच ती फेसबुकवर चॅटिंग सोडून देईल, म्हणून तो नेहमी तिच्याशी लांबूनच बोलत असे.

आरतीला पळवून नेल्याचा संशयावरून भागचंद मात्र अजूनही कारागृहातच आहे. रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतदेह सापडला, त्या दिवशी घटनास्थळावरील तिचे फोटो सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले होते. मात्र, कुणाकडून काही प्रतिसाद न आल्याने आणि मुलीबाबत काहीच माहिती मिळाली नसल्याने बेवारसच्या यादीत तिच्या मृतदेहाचा समावेश झाला. तर शहर पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांना कुठलेही फोटो मिळाले नसल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे कोण खरे, कोण खोटे, हेही तितकेच गूढ आहे.मुलीच्या शोधासाठी दिवसरात्र एक केला. संपूर्ण युनिटच तिच्या शोधासाठी रवाना झाले. मात्र, दु:ख याचे आहे की, मुलीला वाचवू शकलो नाही. ती जिवंत सापडली असती, तर तपास सार्थकी लागला असता. मुलीच्या आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.- दीपक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, कक्ष ६

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र