शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं; ३ वर्षे दिवसरात्र खुर्चीवर बसून काढणाऱ्या इंजिनिअरची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:23 IST

नवी मुंबईत एका व्यक्तीने तीन वर्षे स्वतःला घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

नवी मुंबईतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत ५५ वर्षीय व्यक्तीने गेल्या ३ वर्षांपासून नैराश्यामुळे स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. ही व्यक्ती पूर्वी कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून काम करत होती. खोलीत कोंडून घेतलेल्या या व्यक्तीच्या आईवडीलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्याच्या मोठ्या भावाने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केली. यामुळे त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. ही व्यक्ती फक्त ऑनलाइन जेवण ऑर्डर करून बाहेरील जगाशी संपर्क साधत होती. मात्र एका सामाजिक संस्थेला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी या व्यक्तीला गाठलं आणि मदत केली.

नवी मुंबईच्या घणसोलीतील सेक्टर २४ मध्ये राहणाऱ्या अनुप नायर यांनी आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून तीन वर्षांपेक्षा जास्त काळ स्वतःला घरात कोंडून ठेवलं होतं. अनुप नायर हे पेशाने इंजिनियर होते. मात्र आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर ते एकटे पडले. जेव्हा एका स्वयंसेवी संस्थेला त्याच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अनुप नायर यांच्या घरी पोहोचून त्यांना कोंडीतून सोडवलं.

अनुप नायर यांच्या कुटुंबात आता कोणीही उरलेलं नाही. त्यांची आई पूनम्मा नायर भारतीय हवाई दलाच्या दूरसंचार विभागात काम करत होती, तर त्यांचे वडील व्हीपी कुट्टी कृष्णन नायर टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत होते. ६ वर्षांपूर्वी दोघांचेही निधन झाले. त्यांच्या मोठ्या भावाने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केली. या दुःखद घटनांनी अनुप हे नैराश्यात ढकलले गेले.

या काळात अनुप नायर कोणालाही भेटले नाहीत. त्यांचा फक्त ऑनलाइन फुड डिलिव्हरी करणाऱ्यांसोबत बाहेर पुरता संबंध होता. ते कधीही घराबाहेर पडले नाही. त्यांनी कधीही घराच्या बाहेर कचरा फेकला नाही. नायर राहत असलेल्या इमारतीमधील लोकांनी सांगितले की ते त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा क्वचितच उघडत असे. ते घरातील कचराही बाहेर काढत नसे, त्यामुळे इमारतीतील सदस्यांना कधीकधी त्याला कचरा बाहेर फेकण्यासाठी सांगावे लागत असे.

माहिती मिळाल्यानंतर एसईएएल नावाच्या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा फ्लॅटची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. रातील बहुतेक फर्निचर गायब झाल्यामुळे नायर फक्त खुर्चीवर झोपत असे. त्यांच्या पायांनाही गंभीर संसर्ग झाला होता. यासाठी त्वरित उपचारांची आवश्यकता होती. त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतर काही नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अनुप कोणावरही विश्वास ठेवत नव्हते.

दरम्यान, नायर यांना पनवेलमधील एका आश्रमात ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. "आता माझे कोणतेही मित्र नाहीत, माझे कुटुंब आधीच निघून गेले आहे. माझी तब्येत इतकी खराब आहे की मला नवीन नोकरीही मिळत नाही," असं नायर म्हणतात. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस