शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं; ३ वर्षे दिवसरात्र खुर्चीवर बसून काढणाऱ्या इंजिनिअरची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:23 IST

नवी मुंबईत एका व्यक्तीने तीन वर्षे स्वतःला घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

नवी मुंबईतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत ५५ वर्षीय व्यक्तीने गेल्या ३ वर्षांपासून नैराश्यामुळे स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. ही व्यक्ती पूर्वी कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून काम करत होती. खोलीत कोंडून घेतलेल्या या व्यक्तीच्या आईवडीलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्याच्या मोठ्या भावाने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केली. यामुळे त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. ही व्यक्ती फक्त ऑनलाइन जेवण ऑर्डर करून बाहेरील जगाशी संपर्क साधत होती. मात्र एका सामाजिक संस्थेला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी या व्यक्तीला गाठलं आणि मदत केली.

नवी मुंबईच्या घणसोलीतील सेक्टर २४ मध्ये राहणाऱ्या अनुप नायर यांनी आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून तीन वर्षांपेक्षा जास्त काळ स्वतःला घरात कोंडून ठेवलं होतं. अनुप नायर हे पेशाने इंजिनियर होते. मात्र आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर ते एकटे पडले. जेव्हा एका स्वयंसेवी संस्थेला त्याच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अनुप नायर यांच्या घरी पोहोचून त्यांना कोंडीतून सोडवलं.

अनुप नायर यांच्या कुटुंबात आता कोणीही उरलेलं नाही. त्यांची आई पूनम्मा नायर भारतीय हवाई दलाच्या दूरसंचार विभागात काम करत होती, तर त्यांचे वडील व्हीपी कुट्टी कृष्णन नायर टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत होते. ६ वर्षांपूर्वी दोघांचेही निधन झाले. त्यांच्या मोठ्या भावाने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केली. या दुःखद घटनांनी अनुप हे नैराश्यात ढकलले गेले.

या काळात अनुप नायर कोणालाही भेटले नाहीत. त्यांचा फक्त ऑनलाइन फुड डिलिव्हरी करणाऱ्यांसोबत बाहेर पुरता संबंध होता. ते कधीही घराबाहेर पडले नाही. त्यांनी कधीही घराच्या बाहेर कचरा फेकला नाही. नायर राहत असलेल्या इमारतीमधील लोकांनी सांगितले की ते त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा क्वचितच उघडत असे. ते घरातील कचराही बाहेर काढत नसे, त्यामुळे इमारतीतील सदस्यांना कधीकधी त्याला कचरा बाहेर फेकण्यासाठी सांगावे लागत असे.

माहिती मिळाल्यानंतर एसईएएल नावाच्या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा फ्लॅटची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. रातील बहुतेक फर्निचर गायब झाल्यामुळे नायर फक्त खुर्चीवर झोपत असे. त्यांच्या पायांनाही गंभीर संसर्ग झाला होता. यासाठी त्वरित उपचारांची आवश्यकता होती. त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतर काही नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अनुप कोणावरही विश्वास ठेवत नव्हते.

दरम्यान, नायर यांना पनवेलमधील एका आश्रमात ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. "आता माझे कोणतेही मित्र नाहीत, माझे कुटुंब आधीच निघून गेले आहे. माझी तब्येत इतकी खराब आहे की मला नवीन नोकरीही मिळत नाही," असं नायर म्हणतात. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस