शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

नवी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट, सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस संस्थेचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:39 IST

‘ओखी’ वादळ सर्वांनाच धडकी भरवणारे होते. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक संकटाने सर्वांचीच धावपळ उडाली. शासकीय यंत्रणेने देखील या संकटाशी दोन हात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या.

वैभव गायकरपनवेल : ‘ओखी’ वादळ सर्वांनाच धडकी भरवणारे होते. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक संकटाने सर्वांचीच धावपळ उडाली. शासकीय यंत्रणेने देखील या संकटाशी दोन हात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. अखेर हे वादळ गुजरातकडे सरकल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या वादळामुळे सकारात्मक बाब पुढे आली आहे. ओखी वादळाच्या आगमनाने नवी मुंबईमधील वायुप्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस या केंद्र शासनाच्या संलग्न असलेल्या संस्थेने केलेल्या हवेतील मोजमापाच्या सर्व्हेनुसार ही माहिती समोर आली आहे.

नवी मुंबई, पनवेल दोन्हीही पालिका क्षेत्र याठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीत स्थिती आणखीनच बिकट आहे. या प्रदूषणाविरोधात अनेक रहिवासी संघटना लढा देत आहेत. खारघर आणि तळोजा येथील रहिवाशांनी एकत्र येऊन वी वॉन्ट क्लीन एअर (आम्हाला स्वच्छ हवा हवी आहे) ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील दोन महिन्यांपासून प्रत्येक दिवसाचे हवेतील प्रदूषण याबाबत माहिती घेतली जात आहे. केंद्र सरकारच्याच नियंत्रणात असलेली सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस ही संस्था संपूर्ण देशभरात प्रदूषणाच्या पातळीबाबत मोजमाप करून, ती माहिती सार्वजनिक करते. इंडियन एअर क्वालिटी सर्व्हिस या अ‍ॅपवर आपल्याला ही माहिती मिळते. ‘ओखी’ वादळापूर्वी म्हणजेच ४ डिसेंबर आधी नवी मुंबईमधील हवेतील प्रदूषणाची पातळी ही खूप वाईट अवस्थेत होती.

या संस्थेने केलेल्या मोजमापानुसार (एअर क्वालिटी इंडेक्स) हे ३१० एवढे होते, तर ५ डिसेंबरला नवी मुंबईत ‘ओखी’मुळे वादळ वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळानंतर दुसºया दिवशी ६ डिसेंबरला प्रदूषणाचा आढावा घेतला असता प्रदूषणाच्या पातळीत प्रचंड घट झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. या संस्थेच्या माहितीनुसार एअर क्वालिटी इंडेक्सवर बुधवारी १९८ एवढी नोंदवली गेली. त्यामुळे आजची प्रदूषणाची पातळी ही येथील रहिवाशांच्या दृष्टीने समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.

खारघरमधील रहिवासी मंगेश रानवडे यांनी यासंदर्भात रोजच्या हवेतील पातळीची माहिती घेतली. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे संपूर्ण नवी मुंबईमधील प्रदूषणाची प्रत्येक दिवसाची माहिती आहे. मात्र, ‘ओखी’नंतर प्रथमच नवी मुंबईत अशा प्रकारची शुद्ध हवा वाहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे वादळात मोठ्या प्रमाणात हवेचा दाब निर्माण होत असतो त्यामुळेच नवी मुंबईत हा फरक जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.