शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट, सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस संस्थेचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:39 IST

‘ओखी’ वादळ सर्वांनाच धडकी भरवणारे होते. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक संकटाने सर्वांचीच धावपळ उडाली. शासकीय यंत्रणेने देखील या संकटाशी दोन हात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या.

वैभव गायकरपनवेल : ‘ओखी’ वादळ सर्वांनाच धडकी भरवणारे होते. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक संकटाने सर्वांचीच धावपळ उडाली. शासकीय यंत्रणेने देखील या संकटाशी दोन हात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. अखेर हे वादळ गुजरातकडे सरकल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या वादळामुळे सकारात्मक बाब पुढे आली आहे. ओखी वादळाच्या आगमनाने नवी मुंबईमधील वायुप्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस या केंद्र शासनाच्या संलग्न असलेल्या संस्थेने केलेल्या हवेतील मोजमापाच्या सर्व्हेनुसार ही माहिती समोर आली आहे.

नवी मुंबई, पनवेल दोन्हीही पालिका क्षेत्र याठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीत स्थिती आणखीनच बिकट आहे. या प्रदूषणाविरोधात अनेक रहिवासी संघटना लढा देत आहेत. खारघर आणि तळोजा येथील रहिवाशांनी एकत्र येऊन वी वॉन्ट क्लीन एअर (आम्हाला स्वच्छ हवा हवी आहे) ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील दोन महिन्यांपासून प्रत्येक दिवसाचे हवेतील प्रदूषण याबाबत माहिती घेतली जात आहे. केंद्र सरकारच्याच नियंत्रणात असलेली सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस ही संस्था संपूर्ण देशभरात प्रदूषणाच्या पातळीबाबत मोजमाप करून, ती माहिती सार्वजनिक करते. इंडियन एअर क्वालिटी सर्व्हिस या अ‍ॅपवर आपल्याला ही माहिती मिळते. ‘ओखी’ वादळापूर्वी म्हणजेच ४ डिसेंबर आधी नवी मुंबईमधील हवेतील प्रदूषणाची पातळी ही खूप वाईट अवस्थेत होती.

या संस्थेने केलेल्या मोजमापानुसार (एअर क्वालिटी इंडेक्स) हे ३१० एवढे होते, तर ५ डिसेंबरला नवी मुंबईत ‘ओखी’मुळे वादळ वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळानंतर दुसºया दिवशी ६ डिसेंबरला प्रदूषणाचा आढावा घेतला असता प्रदूषणाच्या पातळीत प्रचंड घट झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. या संस्थेच्या माहितीनुसार एअर क्वालिटी इंडेक्सवर बुधवारी १९८ एवढी नोंदवली गेली. त्यामुळे आजची प्रदूषणाची पातळी ही येथील रहिवाशांच्या दृष्टीने समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.

खारघरमधील रहिवासी मंगेश रानवडे यांनी यासंदर्भात रोजच्या हवेतील पातळीची माहिती घेतली. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे संपूर्ण नवी मुंबईमधील प्रदूषणाची प्रत्येक दिवसाची माहिती आहे. मात्र, ‘ओखी’नंतर प्रथमच नवी मुंबईत अशा प्रकारची शुद्ध हवा वाहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे वादळात मोठ्या प्रमाणात हवेचा दाब निर्माण होत असतो त्यामुळेच नवी मुंबईत हा फरक जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.