शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

शहरात डेब्रिजमाफिया पुन्हा सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:24 IST

निवडणुकीची रणधुमाळी पथ्यावर : एमआयडीसीमध्ये भराव सुरू; नवी मुंबई महापालिकेसह शासनाकडेही तक्रार

- नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून महापालिका कार्यक्षेत्रामध्ये डेब्रिजमाफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. अडवली-भुतावलीसह विविध ठिकाणी मोकळ्या भूखंडावर बांधकामाचा कचरा टाकला जात आहे. या अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्यामुळे दक्ष नागरिकांनी महापालिका, तहसील कार्यालयासह मंत्रालयामध्येही तक्रारी केल्या आहेत.

स्वच्छता अभियानामध्ये देशात सातव्या व राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला डेब्रिजचे अतिक्रमण रोखण्यात अपयश येऊ लागले आहे. ठाणे, मुंबई व नवी मुंबईमध्येही इमारत दुरुस्ती व जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन बांधकामे केली जात आहेत. यामुळे रोज हजारो टन बांधकामाचा कचरा तयार होत आहे. हा सर्व कचरा नवी मुुंबईच्या हद्दीमध्ये टाकण्यासाठीचे रॅकेट सक्रिय झाले आहे. महापालिकेने डेब्रिजविरोधी भरारी पथक सक्रिय केल्यानंतर काही दिवस अतिक्रमण थांबले होते; परंतु लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होताच डेब्रिज माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. अडवली - भुतावली परिसरामधील शेतजमिनीवर यापूर्वी हजारो टन डेब्रिज टाकले आहे. त्याच परिसरामध्ये ५ एप्रिलपासून पुन्हा भराव सुरू झाला आहे. रोज शेकडो वाहनांमधून बांधकामाचा कचरा याठिकाणी टाकला जात आहे. बिनधास्तपणे सुरू असलेले अतिक्रमण थांबविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याशिवाय इतर मोकळे भूखंड व रोडच्या बाजूलाही कचरा टाकला जात आहे.

महापालिका, एमआयडीसी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे डेब्रिजचा भराव करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात नाही. एमआयडीसीमध्ये नाल्यामध्येही भराव टाकल्याचे निदर्शनास येत आहे. नाल्यामधील भरावामुळे पावसाचे पाणी खाडीत जाण्यास अडथळे निर्माण होणार आहे. परिणामी हे पाणी लोकवस्तीमध्ये जाऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अडवली - भुतावली परिसरामधील शेतकºयांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व महसूल विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र लेखी पत्र देऊनही काहीही कारवाई केली जात नाही. यामुळे शेतकºयांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये जाऊन महसूल विभागाकडेही तक्रार केली आहे. शेतजमिनीवरही भराव सुरू केला आहे. याविषयी वारंवार तक्रारी केल्या आहेत. २०१४ पासून लेखी पाठपुरावा केला आहे. विधानसभेमध्येही या विषयावर लक्ष वेधण्यात आले होते. त्याच ठिकाणी पुन्हा भराव सुरू असून अतिक्रमण थांबविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

किती दिवस लढा द्यायचा?डेब्रिजच्या अतिक्रमणाविषयी बोनकोडे गावामधील नागरिक अमोल विजय नाईक यांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये लेखी तक्रार केली आहे. अडवली - भुतावली परिसरामध्ये सुरू असलेल्या डेब्रिजच्या भरावाविरोधात २०१४ पासून लढा देत आहे. यापूर्वी डेब्रिजचे अतिक्रमण करणाºयांनी कुटुंबीयांवर डम्पर चालविण्याचा प्रयत्न केला होता. अनेक प्रकारे दबाव आणला जात आहे. निवडणुका सुरू झाल्यापासून पुन्हा अतिक्रमण सुरू झाले असून अजून किती दिवस आम्ही लढा द्यायचा असा प्रश्न उपस्थित केला असून माफियांमुळे कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचेही नमूद केले आहे.प्रशासनाचेही अभयअडवली - भुतावलीसह शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव केला जात आहे. याविषयीची लेखी तक्रार देऊन छायाचित्रेही दाखवून हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे; परंतु यानंतरही संबंधित अतिक्रमण थांबविले जात नाही. यामुळे प्रशासनामधील काही कर्मचाºयांचेच त्याला अभय असल्याचा संशय दक्ष नागरिकांनी व्यक्त केला आहे.पर्यावरणाचा ºहासडेब्रिजच्या अतिक्रमणामुळे पर्यावरणाचा ºहास होऊ लागला आहे. एमआयडीसीमधील मोकळे भूखंड व नाल्यांमध्येही भराव सुरू आहे. महामार्गाच्या बाजूला व खारफुटीमध्येही भराव टाकला जात आहे. डेब्रिजचे अतिक्रमण थांबविले नाही तर भविष्यात पर्यावणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.