शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लुटारूंच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू , गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ; दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:04 IST

सातारा येथून सत्संगाला जाण्यासाठी मुंबईत आलेल्या हनुमंत सर्जेराव वरेकर याला १५ नोव्हेंबरला जुईनगर स्टेशनबाहेर लुटारूंनी लुटून मारहाण केली.

नवी मुंबई : सातारा येथून सत्संगाला जाण्यासाठी मुंबईत आलेल्या हनुमंत सर्जेराव वरेकर याला १५ नोव्हेंबरला जुईनगर स्टेशनबाहेर लुटारूंनी लुटून मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या वरेकर यांचा तीन दिवसांनंतर रुग्णालयातच मृत्यू झाला. या घटनेला एक महिना होत आल्यानंतरही अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सातारा जिल्ह्यातील वर्धनगड येथे राहणारे हनुमंत सर्जेराव वरेकर हे दिल्लीमधील संत निरंकारी मिशनच्या सत्संगाला जाण्यासाठी १५ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उतरले. तेथून रेल्वेने ते मानखुर्द येथे राहणारे त्यांचे पुतणे राजेंद्र बबन वरेकर यांच्याकडे जाणार होते. रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्यांना लुटारूंनी अडविले व बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील ८० हजार रुपये रोख रक्कम, दोन अंगठ्या, १ चेन, मोबाइल, घड्याळ, पाकीट व कागदपत्र हिसकावून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या वरेकर यांना अज्ञात व्यक्तीने वाशीतील महापालिका रुग्णालयामध्ये भरती केले. नातेवाइकांनी त्यांना रात्री १ वाजता वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. दुसºया दिवशी सायंकाळी त्यांना केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. १८ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. घटना घडल्यानंतर नातेवाइकांनी याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे, परंतु पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. यामुळे नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा