शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

सीआरझेडचा साडेबारा टक्केच्या भूखंडांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 07:18 IST

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात भूखंडांचे वाटप केले आहे. परंतु यापैकी अनेक भूखंडांना केंद्र शासनाच्या सुधारित सीआरझेड कायद्याचा विळखा पडला आहे. सीआरझेड कायद्याचा बाऊ करून या भूखंडधारकांना बांधकाम परवानगी नाकारली जात आहे. विशेष म्हणजे याबाबत सुधारित धोरण तयार करण्याचे संकेत सिडकोने दिले होते, ...

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात भूखंडांचे वाटप केले आहे. परंतु यापैकी अनेक भूखंडांना केंद्र शासनाच्या सुधारित सीआरझेड कायद्याचा विळखा पडला आहे. सीआरझेड कायद्याचा बाऊ करून या भूखंडधारकांना बांधकाम परवानगी नाकारली जात आहे. विशेष म्हणजे याबाबत सुधारित धोरण तयार करण्याचे संकेत सिडकोने दिले होते, परंतु एक वर्ष झाले तरी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शेकडो भूखंड विकासाअभावी ओसाड पडून आहेत.महापालिकेची स्वत:ची विकास नियंत्रण नियमावली नाही. त्यामुळे महापालिकेला आतापर्यंत सिडकोने तयार केलेल्या सर्वसाधारण विकास नियंत्रण नियमावलीचा अवलंब करावा लागतो आहे. महत्त्वाचे म्हणजे सिडकोने साडेबारा टक्के आणि इतर खासगी भूखंडांचे वाटप केले आहे. हे करीत असताना सागरी किनारा नियंत्रण कायदा १९९१ चा आधार घेत ५0 मीटरचे अंतर गृहीत धरून सिडकोने या भूखंडाचे वाटप केले आहे. परंतु केंद्र सरकारच्या २0११ रोजीच्या सुधारित सीआरझेड कायद्यानुसार ही मर्यादा समुद्र किंवा खाडी किनाºयापासून १५0 मीटर इतकी करण्यात आली आहे. त्याचा फटका सिडकोने केलेल्या भूखंड वाटपाला बसला आहे. कारण नव्या नियमानुसार या भूखंडांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीकडून (एमसीझेडएम) परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी ही परवानगी कोणी घ्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने सिडकोने वाटप केलेले शेकडो भूखंड बांधकाम परवानगीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. गोठीवलीत अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उरण, पनवेल परिसरातही अशा भूखंडांचे वाटप झालेले आहे. विशेष म्हणजे काही भूखंडांवर बांधकामही करण्यात आले आहे. परंतु केंद्र सरकारचा सीआरझेडचा सुधारित कायदा आल्यानंतर या बांधकामांना दिलेली परवानगी स्थगित करण्यात आली आहे, तर अनेकांचे भूखंड वाटप रद्द करण्यात आले आहे. सीआरझेडच्या कचाट्यात अडकलेल्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंड वाटपाबाबत सकारात्मक धोरण तयार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. त्यामुळे शेकडो भूखंडधारकांनी समाधान व्यक्त केले होते, परंतु वर्ष उलटले तरी अद्याप असे कोणतेही धोरण तयार नाही. त्यामुळे भूखंडधारकांनी नाराजी प्रकट केली आहे.ठाणे तालुक्यात साडेबारा टक्केअ योजना अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या केवळ ८ टक्के प्रकरणे शिल्लक आहेत. यापैकी पात्र प्रकरणांचा पुढील दोन महिन्यात निपटारा करून ही योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. परंतु साडेबारा टक्के योजनेअंतर्गत पूर्वी वाटप झालेल्या मात्र सध्या सीआरझेडच्या कचाट्यात अडकलेल्या भूखंडांचे काय, याबाबत सिडकोकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे सीआरझेड क्षेत्रात वाटप झालेले अनेक भूखंड रद्द करण्यात आले आहेत. यासंदर्भात सुध्दा सिडकोने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.सीआरझेडच्या कचाट्यात सापडलेल्या भूखंडावरील बांधकाम परवानगीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा फायदा भूमाफियांनी उचलत खाडी किनाºयावर भराव टाकून मोठ्याप्रमाणात बेकायदा इमारती उभारल्या आहेत. गोठीवलीच्या सागरी किनाºयावर आजही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे यासंदर्भात वेळीच तोडगा काढला गेला नाही तर त्याचा मोठा फटका संबंधित प्रकल्पग्रस्तांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Homeघर