शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

एपीएमसीत पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात; भाजीमार्केटमधील किरकोळ विक्री बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 01:01 IST

आवक नियंत्रणात आल्याने व्यवहार सुरळीत

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवक नियंत्रणात आल्यामुळे पाचही मार्केट सोमवारी सुरळीत सुरू होती. भाजी मार्केटमधील किरकोळ विक्री बंद केल्यामुळे गर्दी आटोक्यात आली असून ग्राहकांनी शिस्तबद्धपणे रांग लावून खरेदी केली.

बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल ३० हजार नागरिकांनी गर्दी केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे शासन व बाजार समिती प्रशासनाने तत्काळ बैठका घेऊन गर्दी नियंत्रणासाठी सुधारीत नियमावली तयार केली. परिणामी सोमवारी गर्दी कमी करण्यात यश आले.

भाजी मार्केटमध्ये ५३ वाहनांचीच आवक झाली. प्रशासनाने किरकोळ विक्री पूर्णपणे बंद केल्यामुळे अनावश्यक गर्दी थांबली. मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ विक्रेत्यांनी ही शिस्तबद्ध पणे रांग लावून भाजी खरेदी केली. सोशल डिस्टटिंगचे काटेकोर पालन होत असल्याचे सोमवारी पहावयास मिळाले. त्यापुढेही अशाचप्रकारे मार्केट सुरू ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

धान्य मार्केटमध्ये बाहेरून आलेला माल न घेता फक्त मार्केटमधील मालाची विक्री केली जात होती. यामुळे तेथील व्यवहारही सुरळीत सुरू होते. मसाला मार्केटमध्ये आवक कमी असून ग्राहक नसल्याने शुकशुकाट होता. फळ व कांदा मार्केट मध्ये आवक चांगली झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भाजीपालाची घाऊक विक्री

शनिवारी भाजी मार्केटमध्ये जवळपास एक हजार वाहनांची आवक झाली. किरकोळ मार्केट ही सुरू असल्याने ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. पुन्हा तशी गर्दी होऊ नये यासाठी किरकोळ विक्री पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. यापुढे एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये फक्त घाऊक विक्रीच सुरू राहणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गर्दी कमी करण्यासाठी सुधारीत नियमावली तयार केली आहे. काटेकोर अंमलबजावणीमुळे सोमवारी गर्दी नियंत्रणात आणणे शक्य झाले. यापुढेही मार्केट सुरळीत सुरू राहतील.- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई