शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

कारखानदारांचे पालिकेला असहकार्य; केमिकलसाठ्याची माहिती देण्यासही नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:12 IST

मागील काही वर्षांमध्ये केमिकल कंपन्यांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.

नामदेव मोरे ।नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार सुरक्षा नियमांची पायमल्ली करत असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागालाही सहकार्य केले जात नाही. आपत्कालीन आराखडा बनविण्यासाठी केमिकलसाठ्यांची माहितीही उपलब्ध करून दिली जात नाही. सुरक्षाविषयक निष्काळजीपणामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.एमआयडीसीत खैरणे येथील पाच केमिकल कंपन्यांना २४ एप्रिलला भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये चार कंपन्या जळून खाक झाल्या असून, एका कंपनीची आग वेळेत नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. या घटनेनंतर राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या १०८ पैकी २४.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर एमआयडीसी वसली आहे. दिघा ते नेरुळपर्यंत साडेतीन हजारांपेक्षा जास्त कारखाने या परिसरामध्ये असून, त्यामधील २८५० कारखान्यांमध्ये विविध रसायनांचा साठा केला जात आहे. २८५ केमिकल कंपन्याही या परिसरामध्ये आहेत. या कंपन्यांमध्ये क्लोरीन, इयिलिज, एलपीजी, मोटार स्पिरिट, उच्च प्रतीचे क्लोरोसीन तेल, मेथॅनॉल, आमोनिआ, हेक्झेन, नॅफ्था, प्रापिलिजन, ब्युटीलीन, स्टायरीज, सोडिअम हायडॉक्साइड, सल्फ्युरिक अ‍ॅसिड, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड, क्लोरीन, ब्रोमाईन, नायट्रिक अ‍ॅसिड, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, कॉस्टिक सोडा, फर्नेस आॅइल सारख्या रसायनांचाही समावेश आहे. मागील काही वर्षांमध्ये केमिकल कंपन्यांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी आपत्कालीन आराखडा तयार करते. आपत्कालीन आरखडा बनविण्यासाठी सर्व कारखानदारांकडून त्यांच्याकडील केमिकलसाठ्याची माहिती मागवत असते. केमिकलच्या साठ्याचे प्रमाण, आपत्ती उद्भवल्यास काय उपाययोजना केल्या आहेत, कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी माहिती देण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे; परंतु एमआयडीसी प्रशासन व कारखानदार माहिती उपलब्ध करून देत नाहीत.आपत्कालीन आराखडा बनविण्यासाठी कारखानदार सहकार्य करत नाहीत. वास्तविक प्रत्येक कारखान्यामध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर केमिकलसाठ्याविषयीचा तपशील देणे आवश्यक आहे. रोजच्या साठ्याची माहिती प्रवेशद्वारावर असल्यास आग किंवा इतर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे तत्काळ लक्षात येऊ शकते. एखाद्या कंपनीला आग लागल्यास त्या कंपनीमध्ये कोणते केमिकल व किती प्रमाणात आहे, याची माहिती आपत्कालीन विभागाला पटकन लक्षात येईल व आग विझविण्यासाठी ठोस उपाययोजना करता येऊ शकते; परंतु याविषयी कोणतीच माहिती कारखानदार देत नसल्यामुळे आग विझविण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.महापालिकेचा पाठपुरावानवी मुंबई महानगरपालिकेने एमआयडीसी व कारखानदारांकडे त्यांच्याकडील केमिकल साठ्याचा तपशील देण्याच्या सूचना वारंवार केल्या आहेत. आपत्कालीन आरखडा तयार करण्यासाठी केमिकलसाठ्याचा तपशील आवश्यक आहे, यासाठी वारंवार मिटिंग घेऊन व पत्रे दिली आहेत; परंतु कारखानदारांकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही.नवी मुुंबईमधील रासायनिक कारखान्यांमध्ये नक्की किती केमिकल आहे, याची माहितीच उपलब्ध नाही. साठ्याची माहितीच नसल्याने सुरक्षेसाठी आवश्यक काळजी घेता येत नाही. भविष्यात ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भोपाळसारखी मोठी दुर्घटना या परिसरामध्ये होऊ शकते.रोडवर टँँकरची पार्किंगनवी मुंबईमध्ये जवळपास १५०० टँकरमधून रसायनांची वाहतूक केली जाते. रसायनांनी भरलेले व मोकळे टँकर रोडच्या दोन्ही बाजूंना उभे केले जात आहेत. बोनसरी परिसरामध्ये जवळपास एक किलोमीटरपर्यंत टँकरची रांग लागलेली असते. भविष्यात या टँकरला इतर वाहनांची धडक बसून, स्फोट होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :fireआग