शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

कारखानदारांचे पालिकेला असहकार्य; केमिकलसाठ्याची माहिती देण्यासही नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:12 IST

मागील काही वर्षांमध्ये केमिकल कंपन्यांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.

नामदेव मोरे ।नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार सुरक्षा नियमांची पायमल्ली करत असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागालाही सहकार्य केले जात नाही. आपत्कालीन आराखडा बनविण्यासाठी केमिकलसाठ्यांची माहितीही उपलब्ध करून दिली जात नाही. सुरक्षाविषयक निष्काळजीपणामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.एमआयडीसीत खैरणे येथील पाच केमिकल कंपन्यांना २४ एप्रिलला भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये चार कंपन्या जळून खाक झाल्या असून, एका कंपनीची आग वेळेत नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. या घटनेनंतर राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या १०८ पैकी २४.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर एमआयडीसी वसली आहे. दिघा ते नेरुळपर्यंत साडेतीन हजारांपेक्षा जास्त कारखाने या परिसरामध्ये असून, त्यामधील २८५० कारखान्यांमध्ये विविध रसायनांचा साठा केला जात आहे. २८५ केमिकल कंपन्याही या परिसरामध्ये आहेत. या कंपन्यांमध्ये क्लोरीन, इयिलिज, एलपीजी, मोटार स्पिरिट, उच्च प्रतीचे क्लोरोसीन तेल, मेथॅनॉल, आमोनिआ, हेक्झेन, नॅफ्था, प्रापिलिजन, ब्युटीलीन, स्टायरीज, सोडिअम हायडॉक्साइड, सल्फ्युरिक अ‍ॅसिड, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड, क्लोरीन, ब्रोमाईन, नायट्रिक अ‍ॅसिड, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, कॉस्टिक सोडा, फर्नेस आॅइल सारख्या रसायनांचाही समावेश आहे. मागील काही वर्षांमध्ये केमिकल कंपन्यांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी आपत्कालीन आराखडा तयार करते. आपत्कालीन आरखडा बनविण्यासाठी सर्व कारखानदारांकडून त्यांच्याकडील केमिकलसाठ्याची माहिती मागवत असते. केमिकलच्या साठ्याचे प्रमाण, आपत्ती उद्भवल्यास काय उपाययोजना केल्या आहेत, कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी माहिती देण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे; परंतु एमआयडीसी प्रशासन व कारखानदार माहिती उपलब्ध करून देत नाहीत.आपत्कालीन आराखडा बनविण्यासाठी कारखानदार सहकार्य करत नाहीत. वास्तविक प्रत्येक कारखान्यामध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर केमिकलसाठ्याविषयीचा तपशील देणे आवश्यक आहे. रोजच्या साठ्याची माहिती प्रवेशद्वारावर असल्यास आग किंवा इतर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे तत्काळ लक्षात येऊ शकते. एखाद्या कंपनीला आग लागल्यास त्या कंपनीमध्ये कोणते केमिकल व किती प्रमाणात आहे, याची माहिती आपत्कालीन विभागाला पटकन लक्षात येईल व आग विझविण्यासाठी ठोस उपाययोजना करता येऊ शकते; परंतु याविषयी कोणतीच माहिती कारखानदार देत नसल्यामुळे आग विझविण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.महापालिकेचा पाठपुरावानवी मुंबई महानगरपालिकेने एमआयडीसी व कारखानदारांकडे त्यांच्याकडील केमिकल साठ्याचा तपशील देण्याच्या सूचना वारंवार केल्या आहेत. आपत्कालीन आरखडा तयार करण्यासाठी केमिकलसाठ्याचा तपशील आवश्यक आहे, यासाठी वारंवार मिटिंग घेऊन व पत्रे दिली आहेत; परंतु कारखानदारांकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही.नवी मुुंबईमधील रासायनिक कारखान्यांमध्ये नक्की किती केमिकल आहे, याची माहितीच उपलब्ध नाही. साठ्याची माहितीच नसल्याने सुरक्षेसाठी आवश्यक काळजी घेता येत नाही. भविष्यात ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भोपाळसारखी मोठी दुर्घटना या परिसरामध्ये होऊ शकते.रोडवर टँँकरची पार्किंगनवी मुंबईमध्ये जवळपास १५०० टँकरमधून रसायनांची वाहतूक केली जाते. रसायनांनी भरलेले व मोकळे टँकर रोडच्या दोन्ही बाजूंना उभे केले जात आहेत. बोनसरी परिसरामध्ये जवळपास एक किलोमीटरपर्यंत टँकरची रांग लागलेली असते. भविष्यात या टँकरला इतर वाहनांची धडक बसून, स्फोट होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :fireआग