शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

coronavirus: ई-पासची अट रद्द होताच महामार्गावर वाहनांची गर्दी, वाशी टोल नाक्यावर वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 00:59 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने मार्चपासून आंतरजिल्हा प्रवासावरही मर्यादा घातल्या होत्या. ई-पासशिवाय मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हते व गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा मुंबईला येता येत नव्हते.

नवी मुंबई : शासनाने अंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची अट रद्द करताच महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाशी टोल नाक्यावर सकाळी वाहतूककोंडी झाली होती. दोन अपघातांमुळे तेथील चक्काजाममध्ये भर पडली होती.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने मार्चपासून आंतरजिल्हा प्रवासावरही मर्यादा घातल्या होत्या. ई-पासशिवाय मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हते व गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा मुंबईला येता येत नव्हते. शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतरही हजारो नागरिक गावीच थांबले होते.गणेशोत्सव करूनच मुंबईला जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. शासनाने ई-पासची अट रद्द करताच, मंगळवारी रात्रीच चाकरमानी मुंबईकडे रवाना झाले. यामुळे मुंबई-पुणे व मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. सकाळी वाशी टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाली होती. टोल नाक्यापासून वाशी प्लाझापर्यंत रांगा आल्या होत्या.अपघातामुळे चक्काजामसकाळी खाली पुलावर दोन अपघात झाले. पुलाच्या सुरुवातीला चार वाहने एकमेकांवर आदळली. दुसऱ्या अपघातामध्ये दोन कारची धडक झाली. अपघातांमुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यावर दुपारी १२ नंबर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई