शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

coronavirus: एपीएमसीत उपाययोजनांवर पाणी , मार्केटबाहेर अनधिकृत व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 02:54 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली आहे; परंतु मार्केटबाहेर रस्त्यावर अनधिकृतपणे व्यापार सुरू झाला आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या व्यवसायामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. तसे न झाल्यास एपीएमसीत प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांवर पाणी फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे. व्यापारी, माथाडी कामगार, एपीएमसी कर्मचारी, वाहतूकदारांनाही लागण झाली आहे. यामुळे शासनाने ११ ते १७ मे दरम्यान एपीएमसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येक मार्केटची साफसफाई व निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू असताना मार्केटच्या बाहेर रस्त्यावर अनधिकृत व्यापार जोमाने सुरू झाला आहे.कांदा-बटाटा मार्केटच्या बाहेर अन्नपूर्णा चौक ते अरेंजा सर्कलजवळील पेट्रोल पंपापर्यंत कांदा, बटाटाचे टेम्पो उभे केले जात आहेत. खरेदीसाठी ग्राहकही गर्दी करू लागले आहेत. अनेक विक्रेते व ग्राहक मास्कचा वापर करत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होताना दिसत नाही. यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.एपीएमसीच्या गेटबाहेरील भाजी व फळ विक्रेत्यांना लागण झाली आहे. यामुळे तुर्भे विभाग अधिकारी व पोलिसांनी फळविक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्यामुळे काही दिवस अनधिकृत व्यवसाय थांबला होता. मात्र, आता मार्केट बंद असल्याने कांदा, बटाटासह फळांचाही अनधिकृत व्यापार सुरू झाला आहे.स्मशानभूमी ते एनएमएमटी डेपोकडील रस्त्यापर्यंत फळांचे टेम्पो उभे केले जात असून तेथेच व्यापार केला जात आहे. एपीएमसीच्या बाहेरील व्यापारावर कारवाई करण्याचा अधिकार एपीएमसी प्रशासनास नाही. यामुळे नवी मुंबई महापालिका व पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारवाई केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील रस्त्यावर अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. कारवाईनंतरही व्यापार सुरू असेल तर पुन्हा कारवाई केली जाईल.- दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ-१सर्व उपाययोजनांवर पाणी : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी महापालिका व एपीएमसी प्रशासन प्रयत्न करत आहेत. पाचही मार्केटमधील १०० टक्के व्यवहार बंद केले आहेत. आरोग्य शिबिर सुरू आहे. औषध फवारणी सुरू आहे; परंतु दुसरीकडे मार्केटच्या गेटबाहेरील अनागोंदी कारभार सुरू आहे. रस्त्यावरील अतिक्रमण थांबविले नाही तर कोरोना रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई