शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
3
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
4
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
5
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
6
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
7
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
8
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
9
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
10
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
11
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
12
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
13
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
14
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
15
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
16
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
17
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
18
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
19
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
20
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...

CoronaVirus : कोरोनाचे सावट, सवलतीच्या नावाखाली कामगारांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 19:48 IST

CoronaVirus: लॉकडाऊनमुळे कामगारांच्या वाहतुकीची गैरसोय होत असल्याच्या कारणावरून कामगारांनाच कंपन्यांमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे. 

  - सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : उद्योग व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी शासनाकडून मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेत कंपन्यांकडून कामगारांचे जीव धोक्यात घातले जात आहेत. अशाच प्रकारातून महापे येथील एका आयटी कंपनीतील २० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे कामगारांच्या वाहतुकीची गैरसोय होत असल्याच्या कारणावरून कामगारांनाच कंपन्यांमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे. 

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन काही उद्योग सुरु ठेवण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्याचा गैरफायदा घेतला जात असून त्यात आयटी कंपन्यांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. अशा व्यावसायिकांकडून कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी कामगारांचे जीव धोक्यात घातले जात आहेत. घरी गेलेला कामगार पुन्हा कामावर येण्याची शक्यता कमी असल्याने कामगारांना कंपनीतच मुक्कामी ठेवले जात आहे. याकरिता काही कंपन्यांमध्ये कामगारांना कामावरून कमी करण्याची भीती दाखवून मुस्कटदाबी सुरु आहे. परंतु मोठ्या संख्येने कामगारांना एकत्र ठेवले जात असल्याने त्याठिकाणी कोरोना पसरण्याचा सर्वाधिक धोका निर्माण होत आहे.

अशाच प्रकारातून महापे येथील एका आयटी पार्क मध्ये २० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात एका सुरक्षा रक्षकाचा तर १९ कामगारांचा समावेश आहे. त्यापैकी ७ कामगार नवी मुंबईचे रहिवाशी असून उर्वरित ठाणे व इतर परिसरातले आहेत. सदर आयटी कंपनीत सुमारे १०० कामगारांना मागील अनेक दिवसांपासून मुक्कामी ठेवण्यात आले होते. त्या कंपनीत चेंबूर वरून येणाऱ्या एका कोरोना बाधित कामगारामुळे सुरक्षा रक्षकालाही बाधा झाली.

मागील आठवड्यात या सुरक्षा रक्षकाला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर कंपनीत मुक्क्कमी असलेल्या ४० जणांचे नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी १९ जणांना कोरोना झाल्याचे बुधवारी उघड झाले. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरही कामगारांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. मुळात आयटी कंपन्या व इतर कारखान्यांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने कामगारांच्या निवासाची सोय करण्यास प्रशासनाची मंजुरी घेतली होती का असाही प्रश्न निर्माण होत आहे. उद्योग सुरु ठेवताना  प्रत्येक शिप मध्ये ठराविकच कामगार बोलावून सर्वांच्या वाहतुकीची सोय केली जाणेही गरजेचे आहे. परंतु त्या ऐवजी कामगारांनाच कंपनीत डांबून ठेवून काम साध्य करून घेण्याचा प्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. 

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठे औद्योगिक क्षेत्र असून त्यात नामांकित आयटी कंपन्यांचाही समावेश आहे. त्या सर्व ठिकाणी शासन निर्देशांचे पालन होत आहे का हे देखील तपासले जाण्याची गरज निर्माण झालीय आहे. अन्यथा सवलतीच्या नावाखाली कामगारांचे जीव धोक्यात घालून उद्योग सुरु राहिल्यास शहरात बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई