शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 23:39 IST

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.

नामदेव मोरे 

नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी पहिला लॉकडाऊन सुरू होऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीमध्ये नवी मुंबईमधील रुग्णसंख्या तब्बल ६,४२७ झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत करत, ५७ टक्के रुग्ण बरे करण्यात यश मिळविले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे विशेष रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णांचा आलेख वाढत असतानाही मुंबई व नवी मुंबईमधील नागरिकांना धान्यपुरवठा करणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती सुरळीत सुरू ठेवण्यात यश मिळविले आहे.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलिपाइन्सवरून वाशीमध्ये कार्यक्रमास आलेल्या विदेशी नागरिकास सर्वप्रथम कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. पहिल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण नियंत्रणात होते, परंतु मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी गेलेले बेस्ट वाहक, डॉक्टर, नर्स, बँक कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली व त्यांच्यामुळे ते वास्तव्य करत असलेल्या परिसरात रूग्णांचे प्रमाण वाढू लागले. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी, कामगार व वाहतूकदारांमुळेही वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व तुर्भे परिसरात कोरोनाची झपाट्याने वाढ झाली. एपीएमसी व मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यामुळे सुरुवातीला ६० टक्के रुग्ण वाढले. नवी मुंबईमधील परिस्थितीही हाताबाहेर जाऊ लागली. सद्यस्थितीमध्ये शहरात ६,४२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून, ३,६३२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. २,५८८ जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी चारस्तरीय रचना तयार केली आहे. २३ नागरी आरोग्य केंद्रे व बेलापूर, नेरुळ व ऐरोली रुग्णालयात फ्लू क्लिनिक सुरू केली आहेत. १९ ठिकाणी कोविड केअर सेंटर, ११ ठिकाणी कोविड हेल्थ सेंटर व १० ठिकाणी डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू केली. वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये विशेष रुग्णालय सुरू केले.धान्यपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश

  • मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीला ‘मुंबईचे धान्य कोठार’ असे संबोधले जाते. मुंबई, नवी मुंबई परिसरातील दीड कोटी नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा येथून होत असतो.
  • कोरोनामुळे व्यापारी व कामगारांनीही मार्केट बंदचा निर्णय घेतला होता, परंतु शासन व प्रशासनाने एपीएमसीमध्ये विशेष आरोग्य शिबिर राबविले.
  • सर्र्वांना विश्वासात घेऊन मार्केट सुरू करण्यात यश मिळविले. यामुळे सुरुवातीला सुरू झालेला अन्नधान्याचा तुटवडा व कृत्रिम दरवाढ कमी करण्यात यश मिळविले. धान्यपुरवठा सुरळीत राहिल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली.

चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणानवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७ टक्के आहे. काही वेळेत हे प्रमाण ६० टक्क्यांवर जात आहे. मृत्यूचा दर ३ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अजून वाढू शकते. सद्यस्थितीमध्ये कोरोना चाचणीचा अहवाल वेळेत येत नाही. ५ ते १५ दिवस विलंब लागल्यामुळे वेळेत उपचार करता येत नाहीत. चाचणीचा अहवाल २४ तासांत मिळाला, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविणे शक्य होणार आहे. यामुळे शासन व प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेने विशेष मास स्क्रीनिंग मोहीम सुरू केली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरात आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली आहे. शिबिरामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची स्वॅब टेस्ट केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस