शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 23:39 IST

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.

नामदेव मोरे 

नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी पहिला लॉकडाऊन सुरू होऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीमध्ये नवी मुंबईमधील रुग्णसंख्या तब्बल ६,४२७ झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत करत, ५७ टक्के रुग्ण बरे करण्यात यश मिळविले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे विशेष रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णांचा आलेख वाढत असतानाही मुंबई व नवी मुंबईमधील नागरिकांना धान्यपुरवठा करणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती सुरळीत सुरू ठेवण्यात यश मिळविले आहे.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलिपाइन्सवरून वाशीमध्ये कार्यक्रमास आलेल्या विदेशी नागरिकास सर्वप्रथम कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. पहिल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण नियंत्रणात होते, परंतु मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी गेलेले बेस्ट वाहक, डॉक्टर, नर्स, बँक कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली व त्यांच्यामुळे ते वास्तव्य करत असलेल्या परिसरात रूग्णांचे प्रमाण वाढू लागले. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी, कामगार व वाहतूकदारांमुळेही वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व तुर्भे परिसरात कोरोनाची झपाट्याने वाढ झाली. एपीएमसी व मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यामुळे सुरुवातीला ६० टक्के रुग्ण वाढले. नवी मुंबईमधील परिस्थितीही हाताबाहेर जाऊ लागली. सद्यस्थितीमध्ये शहरात ६,४२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून, ३,६३२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. २,५८८ जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी चारस्तरीय रचना तयार केली आहे. २३ नागरी आरोग्य केंद्रे व बेलापूर, नेरुळ व ऐरोली रुग्णालयात फ्लू क्लिनिक सुरू केली आहेत. १९ ठिकाणी कोविड केअर सेंटर, ११ ठिकाणी कोविड हेल्थ सेंटर व १० ठिकाणी डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू केली. वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये विशेष रुग्णालय सुरू केले.धान्यपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश

  • मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीला ‘मुंबईचे धान्य कोठार’ असे संबोधले जाते. मुंबई, नवी मुंबई परिसरातील दीड कोटी नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा येथून होत असतो.
  • कोरोनामुळे व्यापारी व कामगारांनीही मार्केट बंदचा निर्णय घेतला होता, परंतु शासन व प्रशासनाने एपीएमसीमध्ये विशेष आरोग्य शिबिर राबविले.
  • सर्र्वांना विश्वासात घेऊन मार्केट सुरू करण्यात यश मिळविले. यामुळे सुरुवातीला सुरू झालेला अन्नधान्याचा तुटवडा व कृत्रिम दरवाढ कमी करण्यात यश मिळविले. धान्यपुरवठा सुरळीत राहिल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली.

चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणानवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७ टक्के आहे. काही वेळेत हे प्रमाण ६० टक्क्यांवर जात आहे. मृत्यूचा दर ३ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अजून वाढू शकते. सद्यस्थितीमध्ये कोरोना चाचणीचा अहवाल वेळेत येत नाही. ५ ते १५ दिवस विलंब लागल्यामुळे वेळेत उपचार करता येत नाहीत. चाचणीचा अहवाल २४ तासांत मिळाला, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविणे शक्य होणार आहे. यामुळे शासन व प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेने विशेष मास स्क्रीनिंग मोहीम सुरू केली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरात आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली आहे. शिबिरामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची स्वॅब टेस्ट केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस