शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 23:39 IST

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.

नामदेव मोरे 

नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी पहिला लॉकडाऊन सुरू होऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीमध्ये नवी मुंबईमधील रुग्णसंख्या तब्बल ६,४२७ झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत करत, ५७ टक्के रुग्ण बरे करण्यात यश मिळविले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे विशेष रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णांचा आलेख वाढत असतानाही मुंबई व नवी मुंबईमधील नागरिकांना धान्यपुरवठा करणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती सुरळीत सुरू ठेवण्यात यश मिळविले आहे.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलिपाइन्सवरून वाशीमध्ये कार्यक्रमास आलेल्या विदेशी नागरिकास सर्वप्रथम कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. पहिल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण नियंत्रणात होते, परंतु मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी गेलेले बेस्ट वाहक, डॉक्टर, नर्स, बँक कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली व त्यांच्यामुळे ते वास्तव्य करत असलेल्या परिसरात रूग्णांचे प्रमाण वाढू लागले. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी, कामगार व वाहतूकदारांमुळेही वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व तुर्भे परिसरात कोरोनाची झपाट्याने वाढ झाली. एपीएमसी व मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यामुळे सुरुवातीला ६० टक्के रुग्ण वाढले. नवी मुंबईमधील परिस्थितीही हाताबाहेर जाऊ लागली. सद्यस्थितीमध्ये शहरात ६,४२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून, ३,६३२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. २,५८८ जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी चारस्तरीय रचना तयार केली आहे. २३ नागरी आरोग्य केंद्रे व बेलापूर, नेरुळ व ऐरोली रुग्णालयात फ्लू क्लिनिक सुरू केली आहेत. १९ ठिकाणी कोविड केअर सेंटर, ११ ठिकाणी कोविड हेल्थ सेंटर व १० ठिकाणी डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू केली. वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये विशेष रुग्णालय सुरू केले.धान्यपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश

  • मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीला ‘मुंबईचे धान्य कोठार’ असे संबोधले जाते. मुंबई, नवी मुंबई परिसरातील दीड कोटी नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा येथून होत असतो.
  • कोरोनामुळे व्यापारी व कामगारांनीही मार्केट बंदचा निर्णय घेतला होता, परंतु शासन व प्रशासनाने एपीएमसीमध्ये विशेष आरोग्य शिबिर राबविले.
  • सर्र्वांना विश्वासात घेऊन मार्केट सुरू करण्यात यश मिळविले. यामुळे सुरुवातीला सुरू झालेला अन्नधान्याचा तुटवडा व कृत्रिम दरवाढ कमी करण्यात यश मिळविले. धान्यपुरवठा सुरळीत राहिल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली.

चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणानवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७ टक्के आहे. काही वेळेत हे प्रमाण ६० टक्क्यांवर जात आहे. मृत्यूचा दर ३ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अजून वाढू शकते. सद्यस्थितीमध्ये कोरोना चाचणीचा अहवाल वेळेत येत नाही. ५ ते १५ दिवस विलंब लागल्यामुळे वेळेत उपचार करता येत नाहीत. चाचणीचा अहवाल २४ तासांत मिळाला, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविणे शक्य होणार आहे. यामुळे शासन व प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेने विशेष मास स्क्रीनिंग मोहीम सुरू केली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरात आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली आहे. शिबिरामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची स्वॅब टेस्ट केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस