शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

coronavirus: लॉकडाऊनच्या बंदोबस्ताचा ताप, पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 00:18 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

नवी मुंबई : पालिकेकडून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांना भर पावसात बंदोबस्त करावा लागत असल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. शहरात लॉकडाऊन लावताना त्यामधून एमआयडीसी व एपीएमसी मार्केट वगळण्यात आल्याने त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. तर इतरही व्यावसायिकांवर पालिकेचा अंकुश नसल्याने नागरिक घराबाहेर निघत असल्याने, त्यांना आवर घालताना पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना पुन्हा बंदोबस्तावर उभे राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, या लॉकडाऊनमधून एपीएमसी मार्केट व एमआयडीसी वगळण्यात आली आहे. यामुळे त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. दरम्यान, शहरात लॉकडाऊन यशस्वी कारण्यासाठीच नवी मुंबईत २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी वाहनांची झाडाझडती घेऊन कारवाया केल्या जात आहेत. मात्र, एमआयडीसी व एपीएमसी सुरूच असल्याने, त्या ठिकाणी ये-जा करणाºयांमुळे बंदोबस्तावरील पोलिसांवर ताण वाढतच आहे. परिणामी, पोलिसांकडून सरसकट कारवाया केल्या जात आहेत. यामध्ये अनेकांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत, तर काहींवर गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. मात्र, पालिकेच्या आदेशाला न जुमानता, अनेक विभागांमध्ये अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय चालविले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियोजन फासल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवले जाण्याची गरज होती, असेही तज्ज्ञांचे मत आहे, परंतु तसे न करता एपीएमसी व एमआयडीसी सुरूच ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर निघण्याची संधी मिळत असल्याने लॉकडाऊन अपयशी ठरत असल्याचीही टीका होत आहे. या फसलेल्या लॉकडाऊनचा ताप मात्र पोलिसांना सहन करावा लागत आहे.पावसात उभे राहून बजावत आहेत कर्तव्यएकीकडे पालिकेने नागरिकांना घराबाहेर निघण्यास दिलेली छुपी सूट व पोलिसांना सरसकट कारवाईचे वरिष्ठांकडून मिळालेले आदेश, यामध्ये नागरिक भरडले जात आहेत. पावसात उभे राहून रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने अडवून त्यांच्याकडे चौकशी करावी लागत आहे.अनोळखी व्यक्तींशी संपर्क येत असल्याने त्यांनाही कोरोनाची भीती सतावत आहे. कोरोनापासून बचाव झाला, तरी साथीच्या आजाराचे अथवा सततच्या बंदोबस्तामुळे इतर दुखणी वाढण्याची भीती आहे. कामानिमित्ताने ये-जा करणाºयांची संख्या आटोक्यात येत नसल्यानेही पोलिसांची दमछाक झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस