शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

coronavirus: लॉकडाऊनच्या बंदोबस्ताचा ताप, पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 00:18 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

नवी मुंबई : पालिकेकडून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांना भर पावसात बंदोबस्त करावा लागत असल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. शहरात लॉकडाऊन लावताना त्यामधून एमआयडीसी व एपीएमसी मार्केट वगळण्यात आल्याने त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. तर इतरही व्यावसायिकांवर पालिकेचा अंकुश नसल्याने नागरिक घराबाहेर निघत असल्याने, त्यांना आवर घालताना पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना पुन्हा बंदोबस्तावर उभे राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, या लॉकडाऊनमधून एपीएमसी मार्केट व एमआयडीसी वगळण्यात आली आहे. यामुळे त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. दरम्यान, शहरात लॉकडाऊन यशस्वी कारण्यासाठीच नवी मुंबईत २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी वाहनांची झाडाझडती घेऊन कारवाया केल्या जात आहेत. मात्र, एमआयडीसी व एपीएमसी सुरूच असल्याने, त्या ठिकाणी ये-जा करणाºयांमुळे बंदोबस्तावरील पोलिसांवर ताण वाढतच आहे. परिणामी, पोलिसांकडून सरसकट कारवाया केल्या जात आहेत. यामध्ये अनेकांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत, तर काहींवर गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. मात्र, पालिकेच्या आदेशाला न जुमानता, अनेक विभागांमध्ये अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय चालविले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियोजन फासल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवले जाण्याची गरज होती, असेही तज्ज्ञांचे मत आहे, परंतु तसे न करता एपीएमसी व एमआयडीसी सुरूच ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर निघण्याची संधी मिळत असल्याने लॉकडाऊन अपयशी ठरत असल्याचीही टीका होत आहे. या फसलेल्या लॉकडाऊनचा ताप मात्र पोलिसांना सहन करावा लागत आहे.पावसात उभे राहून बजावत आहेत कर्तव्यएकीकडे पालिकेने नागरिकांना घराबाहेर निघण्यास दिलेली छुपी सूट व पोलिसांना सरसकट कारवाईचे वरिष्ठांकडून मिळालेले आदेश, यामध्ये नागरिक भरडले जात आहेत. पावसात उभे राहून रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने अडवून त्यांच्याकडे चौकशी करावी लागत आहे.अनोळखी व्यक्तींशी संपर्क येत असल्याने त्यांनाही कोरोनाची भीती सतावत आहे. कोरोनापासून बचाव झाला, तरी साथीच्या आजाराचे अथवा सततच्या बंदोबस्तामुळे इतर दुखणी वाढण्याची भीती आहे. कामानिमित्ताने ये-जा करणाºयांची संख्या आटोक्यात येत नसल्यानेही पोलिसांची दमछाक झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस