शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

CoronaVirus News : अभिजीत मिळविणार का कोरोनावर जीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 00:21 IST

आता अभिजीत यांच्यासमोर कोरोनावर विजय मिळविण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समवेश झाला आहे. कोरोनाचा आकडा ५,०७२ झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती केली आहे. आता अभिजीत यांच्यासमोर कोरोनावर विजय मिळविण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.नवी मुंबईला कोरोनाचा विळखा पडला असताना, विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे. १३ मार्चपासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. तीन महिन्यांत वाशीमध्ये १,२०० बेडचे नवीन रुग्णालय उभारण्यात आले. चारस्तरीय यंत्रणा उभारण्यात आली. विविध उपाययोजना राबविण्यात आल्या, परंतु दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच राहिली. २३ जूनला १११ रुग्ण वाढले असून, एकूण रुणांनी पाच हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे. एकूण रुग्णसंख्या ५,०७२ झाली असताना, महानगरपालिकेचे तेविसावे आयुक्त म्हणून अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये प्रतिदिन रुग्ण वाढत आहेत. तुर्भे विभागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९५६ झाली असून, लवकरच हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा परिसरामध्येही रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. झोपडपट्टी, अल्प उत्पन्न गटातील चाळी व गावठाण परिसरामध्ये दाट लोकवस्तीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नवीन आयुक्तांना कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहेत. त्याहीपेक्षा कोरोना व्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे आव्हान उभे राहिले आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर केले आहे. येथील रुग्णांना नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. नवी मुंबईमधील गरीब रुग्णांसाठी मनपाचे जनरल रुग्णालय सुरू करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरामध्ये रुग्णांची संख्या कमी करणे तितकेच गरजेचे बनले आहे.>कठोर उपाययोजनांची गरज : शहरात कोरोना बळींची संख्या १७७ झाली आहे. मंगळवारी एका दिवसात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे, आॅक्सिजन बेडचे प्रमाण वाढविणे व तपासणीसाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्त कसे पेलणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.>मनपाच्या स्थापनेपासून आयुक्तांचा तपशीलआर. सी. सिन्हाराजीव आग्रवालशंकर मेननआर. सी. सिन्हाएम. रमेशकुमारजी. बी. पिंगुळकरजी. एस. गिलजे. एम. फाटकएस.एल. कुलकर्णीसुभाषचंद्र भाकरेपी. एस. मीनामुकेश खुल्लरसुनील सोनीरमेश उबाळेमधुकर कोकाटेविजय नाहटाभास्कर वानखेडेए. एल. जºहाडदिनेश वाघमारेतुकाराम मुंढेडॉ. रामस्वामी एन.अण्णासाहेब मिसाळअभिजीत बांगर>नवी मुंबईमधील परिस्थितीएकूण चाचणी १७६०४निगेटिव्ह ११,६४३रुग्ण संख्या ५,०७२कोरोनामुक्त ३,००१उपचार सुरू १,८९४एकूण मृत्यू १७७होम क्वारंटाईन ११,३०४क्वारंटाईन पूण ३९,४३१

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या