शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
3
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
4
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
5
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
7
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
8
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
9
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
10
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
11
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
12
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
13
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
14
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
15
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
16
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
17
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
18
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
19
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
20
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव

CoronaVirus News : अभिजीत मिळविणार का कोरोनावर जीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 00:21 IST

आता अभिजीत यांच्यासमोर कोरोनावर विजय मिळविण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समवेश झाला आहे. कोरोनाचा आकडा ५,०७२ झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती केली आहे. आता अभिजीत यांच्यासमोर कोरोनावर विजय मिळविण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.नवी मुंबईला कोरोनाचा विळखा पडला असताना, विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे. १३ मार्चपासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. तीन महिन्यांत वाशीमध्ये १,२०० बेडचे नवीन रुग्णालय उभारण्यात आले. चारस्तरीय यंत्रणा उभारण्यात आली. विविध उपाययोजना राबविण्यात आल्या, परंतु दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच राहिली. २३ जूनला १११ रुग्ण वाढले असून, एकूण रुणांनी पाच हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे. एकूण रुग्णसंख्या ५,०७२ झाली असताना, महानगरपालिकेचे तेविसावे आयुक्त म्हणून अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये प्रतिदिन रुग्ण वाढत आहेत. तुर्भे विभागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९५६ झाली असून, लवकरच हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा परिसरामध्येही रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. झोपडपट्टी, अल्प उत्पन्न गटातील चाळी व गावठाण परिसरामध्ये दाट लोकवस्तीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नवीन आयुक्तांना कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहेत. त्याहीपेक्षा कोरोना व्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे आव्हान उभे राहिले आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर केले आहे. येथील रुग्णांना नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. नवी मुंबईमधील गरीब रुग्णांसाठी मनपाचे जनरल रुग्णालय सुरू करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरामध्ये रुग्णांची संख्या कमी करणे तितकेच गरजेचे बनले आहे.>कठोर उपाययोजनांची गरज : शहरात कोरोना बळींची संख्या १७७ झाली आहे. मंगळवारी एका दिवसात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे, आॅक्सिजन बेडचे प्रमाण वाढविणे व तपासणीसाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्त कसे पेलणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.>मनपाच्या स्थापनेपासून आयुक्तांचा तपशीलआर. सी. सिन्हाराजीव आग्रवालशंकर मेननआर. सी. सिन्हाएम. रमेशकुमारजी. बी. पिंगुळकरजी. एस. गिलजे. एम. फाटकएस.एल. कुलकर्णीसुभाषचंद्र भाकरेपी. एस. मीनामुकेश खुल्लरसुनील सोनीरमेश उबाळेमधुकर कोकाटेविजय नाहटाभास्कर वानखेडेए. एल. जºहाडदिनेश वाघमारेतुकाराम मुंढेडॉ. रामस्वामी एन.अण्णासाहेब मिसाळअभिजीत बांगर>नवी मुंबईमधील परिस्थितीएकूण चाचणी १७६०४निगेटिव्ह ११,६४३रुग्ण संख्या ५,०७२कोरोनामुक्त ३,००१उपचार सुरू १,८९४एकूण मृत्यू १७७होम क्वारंटाईन ११,३०४क्वारंटाईन पूण ३९,४३१

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या