शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

Coronavirus: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम; तीन लाखांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:18 AM

१० लाख ५३ हजार नागरिकांची तपासणी

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु वातीपासूनच आघाडी घेत राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या ३ लाख १६ हजार ४४९ कुटुंब सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा जास्त राज्यात सर्वाधिक चांगले काम केलेले आहे. घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये महानगरपालिकेने ३ लाख ३५ हजार ४६९ कुटुंबांमधील १० लाख ५३ हजार ८९६ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही कामगिरी राज्यात सर्वोत्तम आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पथकात दोन ते तीन कोरोनादूतांचा समावेश असलेली ६७० पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन नागरिकांचे शारीरिक तापमान तसेच आॅक्सिजन पातळी तपासून नोंदविण्यासोबतच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारचा त्रास होत आहे काय? याची माहिती नोंदवित आहेत. तसेच कोणत्या व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी आहेत काय? याबाबतचीही माहिती संकलित केली जात आहे.

यासोबतच घरातील सर्व नागरिकांना कोरोनापासून बचावाची तंत्रे सांगितली जात असून, त्यामध्ये प्रामुख्याने नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकता भासल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करणे, एखादा कोरोनाबाधित बरा झाला असल्यास इतरांच्या आरोग्य हितासाठी त्यांना प्लाझ्मा डोनेशनसाठी प्रोत्साहित करणे अशी विविध प्रकारची माहिती देत व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात आहे.मिशन ब्रेक द चेन म्हणजे जलद रुग्णशोधपहिल्या टप्प्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पाही राबविला जाणार असून या पथकांमार्फत पुन्हा सर्व घरांना भेटी देऊन सर्वांचे शारीरिक तापमान आणि आॅक्सिजन सॅच्युरेशन दुसऱ्यांदा मोजले जाणार आहे. तसेच त्या वेळेची आरोग्य स्थिती जाणून घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणातून संकलित होणाºया माहितीच्या आधारे लक्षणे आढळणाºया नागरिकांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार लगेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.याद्वारे ‘मिशन ब्रेक द चेन’ची त्रिसूत्री म्हणजे जलद रूग्णशोध व त्यांची तपासणी होऊन त्वरित उपचार सुरू झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोलाची मदत होत आहे.आयुक्तांचे नागरिकांना आवाहन : नवी मुंबईकर नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेलाही चांगले सहकार्य केले. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक चांगल्या प्रकारची राज्यात सर्वोत्तम कामगिरी आपण करू शकलो त्याबद्दल नवी मुंबईकर नागरिकांचे आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या मोहिमेच्या १४ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया दुसºया टप्प्यातील आरोग्य सर्वेक्षणालाही नागरिकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तसेच मास्क, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे या तीन गोष्टींची नियमित सवय लावून आपल्यामुळे आपल्या प्रिय कुटुंबीयांना व इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका