शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

coronavirus: अफवा पसरविणाऱ्यांवर पालिका आयुक्तांचा ‘वॉच’, कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 03:02 IST

नवी मुंबईत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महापालिकेने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविडमध्ये रूपांतर केले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या एक हजारपेक्षा जास्त झाली आहे. शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, या काळात काही जण मुद्दाम अफवा पसरविण्याचे काम करत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिला आहे. काही ठेकेदार व कामगार महापालिका व शहरास वेठीस धरण्याचे काम करत असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.नवी मुंबईत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महापालिकेने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविडमध्ये रूपांतर केले आहे. तीन खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात आली आहे. वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये ११०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. याशिवाय १७ रुग्णवाहिका उपलब्ध असून आणखी काही खरेदी केल्या जात आहेत.शहरातून काही गैरसोयींविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी वेळेत औषध फवारणी होत नाही. इंडिया बुलमधील क्वारंटाइन केंद्रात सुविधा मिळत नाहीत. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाही. अशाप्रकारच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची तत्काळ शहानिशा केली जात आहे. आयुक्तांनी इंडिया बुल इमारतीमध्ये स्वत: पाहणी केली असून काही त्रुटी असल्यास त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या आहेत.नवी मुंबईमध्ये काही घटक जाणिवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहेत. अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवांसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व दुकाने खुली करण्याचा महापालिकेचा निर्णय झाल्याच्या अफवाही पसरविण्यात आल्या आहेत. महापालिकेने तत्काळ या वृत्तांचे खंडन केले असून, अशाप्रकारे अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.नवी मुंबईकरांच्या आरोग्य रक्षणासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका व इतर अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत; परंतु काही कर्मचारी व ठेकेदार पालिकेला व पर्यायाने शहरास वेठीस धरत आहेत. कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत. अशा कामचुकार ठेकेदार व कामगारांना नोटीस देणार असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.संशयास्पद मृत्यूचा अहवाल २४ तासांत मिळणारनवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात संशयित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. एक हजारपेक्षा जास्त अहवाल प्रलंबित आहेत. अहवाल मिळण्यास तीन ते चार दिवस विलंब होत आहे. संशयास्पद मृत्यू होणाºयांचा अहवालही उशिरा मिळतो.या दिरंगाईमुळे कोरोना वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे यापुढे संशयास्पद मृत्यू होणाºयांची महापालिका स्वखर्चाने खासगी लॅबमधून तपासणी करून घेणार आहे. २४ तासांत अहवाल मिळवून पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. १७ रुग्णवाहिका उपलब्ध असून नवीन रुग्णवाहिका खरेदीकेल्या जात आहेत. प्रशासन सर्व उपाययोजना करत आहे. काही जण अफवा पसरवत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. कामचुकारपणा करणाºया ठेकेदारांवरही कारवाई केली जाणार आहे.- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई