शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
4
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
5
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
6
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
9
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
10
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
11
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
12
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
13
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
14
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
15
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
17
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
20
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

Coronavirus : मुंबई-ठाण्याने वाढवली नवी मुंबईची चिंता, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 01:33 IST

Coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबईत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून कामानिमित्त येणाऱ्या तसेच नवी मुंबईतून या शहरांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबईत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून कामानिमित्त येणाऱ्या तसेच नवी मुंबईतून या शहरांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नवी मुंबई शेजारील शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, नागरिकांना सुरक्षा नियमांचा विसर पडल्याने नवी मुंबईतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, पुन्हा एकदा शहराची चिंता वाढली आहे.नवी मुंबईत गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून, बाधितांची संख्या रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; परंतु नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने विशेष पथकांची निर्मिती केली आहे. परंतु शहरात कामानिमित्त येणारे तसेच शहरातून कामानिमित्त इतर ठिकाणी जाणारे नागरिक, सुरक्षा नियमांचे उल्लंघन, आदी बाबी कोरोना वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ, विविध आयटी कंपन्या, आदी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे कामानिमित्त मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील अनेक ठिकाणचे नागरिक दररोज नवी मुंबई शहरात येतात. तसेच कामानिमित्त शहरातील नागरिक  इतर शहरांमध्ये जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून, या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून, नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. कामानिमित्त ये-जा करण्यासाठी बेस्ट बस, एनएमएमटी, एसटी, रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, आदी प्रवासी वाहनांचा वापर केला जात असून, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून  नागरिकांची होणारी गर्दी, सुरक्षा नियमांचा पडलेला विसर यामुळेच रुग्णसंख्येत भर पडली आहे. बाहेरून आलेल्यांची चाचणी नाही नवी मुंबई शहरात शेजारील इतर शहरांतून तसेच राज्यातील विविध भागांतून दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक ये-जा करतात. शहरातील प्रमुख बस स्टॉपवर कोविड चाचणी करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शहरातील काही रेल्वे स्थानकांवर महापालिकेच्या माध्यमातून कोविड चाचण्यांची सोय करण्यात आली आहे; परंतु या ठिकाणी चाचणी करण्याची प्रवाशांना किंवा नागरिकांना कोणतीही सक्ती करण्यात येत नाही. एपीएमसी बाजरपेठेत दररोज लाखो नागरिक ये-जा करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी कोविड टेस्ट सेंटरदेखील उभारण्यात आले आहे; परंतु या ठिकाणी देखील चाचणी करण्याची सक्ती नसल्याने अनेक नागरिक चाचणी न करताच ये-जा करतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई