शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मुंबई-ठाण्याने वाढवली नवी मुंबईची चिंता, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 01:33 IST

Coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबईत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून कामानिमित्त येणाऱ्या तसेच नवी मुंबईतून या शहरांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबईत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून कामानिमित्त येणाऱ्या तसेच नवी मुंबईतून या शहरांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नवी मुंबई शेजारील शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, नागरिकांना सुरक्षा नियमांचा विसर पडल्याने नवी मुंबईतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, पुन्हा एकदा शहराची चिंता वाढली आहे.नवी मुंबईत गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून, बाधितांची संख्या रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; परंतु नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने विशेष पथकांची निर्मिती केली आहे. परंतु शहरात कामानिमित्त येणारे तसेच शहरातून कामानिमित्त इतर ठिकाणी जाणारे नागरिक, सुरक्षा नियमांचे उल्लंघन, आदी बाबी कोरोना वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ, विविध आयटी कंपन्या, आदी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे कामानिमित्त मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील अनेक ठिकाणचे नागरिक दररोज नवी मुंबई शहरात येतात. तसेच कामानिमित्त शहरातील नागरिक  इतर शहरांमध्ये जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून, या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून, नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. कामानिमित्त ये-जा करण्यासाठी बेस्ट बस, एनएमएमटी, एसटी, रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, आदी प्रवासी वाहनांचा वापर केला जात असून, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून  नागरिकांची होणारी गर्दी, सुरक्षा नियमांचा पडलेला विसर यामुळेच रुग्णसंख्येत भर पडली आहे. बाहेरून आलेल्यांची चाचणी नाही नवी मुंबई शहरात शेजारील इतर शहरांतून तसेच राज्यातील विविध भागांतून दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक ये-जा करतात. शहरातील प्रमुख बस स्टॉपवर कोविड चाचणी करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शहरातील काही रेल्वे स्थानकांवर महापालिकेच्या माध्यमातून कोविड चाचण्यांची सोय करण्यात आली आहे; परंतु या ठिकाणी चाचणी करण्याची प्रवाशांना किंवा नागरिकांना कोणतीही सक्ती करण्यात येत नाही. एपीएमसी बाजरपेठेत दररोज लाखो नागरिक ये-जा करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी कोविड टेस्ट सेंटरदेखील उभारण्यात आले आहे; परंतु या ठिकाणी देखील चाचणी करण्याची सक्ती नसल्याने अनेक नागरिक चाचणी न करताच ये-जा करतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई