शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

coronavirus: मुंबई एपीएमसी सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 05:10 IST

नवी मुंबईत साडेतीनशेपेक्षा जास्त रुग्ण एपीएमसीशी संबंधित आहेत. ११ मे पासून एक आठवडा येथील पाचही मार्केट बंद आहेत. या कालावधीत पालिकेच्या दहा पथकांमार्फत आरोग्य तपासणी सुरू आहे. पाचही बाजारपेठांचे विशेष निर्जंंतुकीकरण केले जात आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला शुक्रवारी केंद्रीय पथकाने भेट दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ११ ते १७ मेपर्यंत मार्केट बंद असून सुरक्षेसाठीच्या उपाययोजना करून सोमवारपासून मार्केट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.नवी मुंबईत साडेतीनशेपेक्षा जास्त रुग्ण एपीएमसीशी संबंधित आहेत. ११ मे पासून एक आठवडा येथील पाचही मार्केट बंद आहेत. या कालावधीत पालिकेच्या दहा पथकांमार्फत आरोग्य तपासणी सुरू आहे. पाचही बाजारपेठांचे विशेष निर्जंंतुकीकरण केले जात आहे.मार्केट सोमवारपासून सुरू करण्यासाठी कृषी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोकण आयुक्त शिवाजी दौंड, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस आयुक्त संजय कुमार व एपीएमसी अधिकाऱ्यांची शनिवारी दुपारी एपीएमसीमध्ये बैठक होणार असून यावेळी मार्केट सुरू करण्यासाठी सुधारित नियमावली निश्चित केली जाणार आहे.केंद्रीय पथकाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजार आवारात भेट दिली व कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. कांदा बटाटा बाजार आवारात माथाडी कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असलेल्या जागेवरही पथकाने भेट दिली.- अनुप कुमार, प्रधान सचिव,कृषी पणन विभागआरोग्य तपासणीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ मेपासून आरोग्य तपासणी मोहीम सुरू आहे. शुक्रवारी चार मार्केटमध्ये १७२३ जणांची तपासणी केली आहे. कांदा बटाटा मार्केटमध्ये ४०३, धान्य मार्केटमध्ये १०२५, मसाला मार्केटमध्ये २९५ जणांची तपासणी केली. पाच संशयितांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.महानगरपालिकेने केल्या सूचनाएपीएमसी मार्केटचे कामकाज १८ मे पासून पुन्हा सुरु करताना जास्तीत जास्त व्यवहार आॅनलाईन व्हावेत. शेतमाल निर्मितीच्या ठिकाणाहून उचलून थेट विक्रेत्यापर्यंत पोहचेल व मार्केट आवारात वाहनांची वा माणसांची गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एपीएमसी प्रशासनाला केल्या. मार्केट आवारात प्रवेश करणाºया प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावे. सर्दी, ताप, घशात खवखव अथवा श्वासोच्छवासास त्रास अशी लक्षणे आढळणाºया व्यापारी, कर्मचारी, कामगारांना प्रवेश देण्यात येऊ नये तसेच अशा व्यक्तींची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक पालिकेस कळविण्यात यावेत, सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती