शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: क्वारंटाइन केंद्रात घुसमट, पनवेलमधील इंडिया बुल्स सेंटरमध्ये जमावाकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 02:22 IST

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९२ इतकी झाली आहे. तर १०७१ जणांना क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई - शहरातील कोरोनाचा विळखा वाढतच आहे. गेल्या दहा दिवसात रोज ४० ते ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे क्वारंटाइन रुग्णांची संख्या ९०० च्या घरात पोहोचलेली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होण्याचे प्रमाण अल्प असल्याने अनेकांचा क्वारंटाइन कालावधी वाढतच चालला आहे.शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९२ इतकी झाली आहे. तर १०७१ जणांना क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे. वर्गवारीनुसार वाशी व पनवेलच्या इंडिया बुल्स येथे त्यांची स्वंतत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, पॉझिटिव्ह आलेल्या मात्र कसलाही त्रास नसलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची संख्या ६०० च्या घरात होती.गेल्या दहा दिवसांत त्यात सातत्याने वाढ झाली आहे. परिणामी, क्वारंटाइन केंद्रात असलेल्यांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. तर ८,३९९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. आतापर्यंत केवळ ७५ पॉझिटिव्ह रुग्ण दुसऱ्या व तिसºया चाचणीत पूर्णपणे निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत.क्वारंटाइन केंद्रातील बहुतांश व्यक्तींचा कालावधी वाढत चालला आहे. यामुळे अनेक जण एक महिन्याहून अधिक कालावधीपासून बंदिस्त आहेत. १४ दिवसांनी त्यांची टेस्ट घेतली जाते. त्यामध्ये निगेटिव्ह आल्यानंतरही दुसरी टेस्ट घेण्यासाठी पुढील पाच ते सात दिवसांसाठी तिथेच ठेवले जात आहे.दुसºया टप्प्यातील चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी अधिक कालावधी लागत आहे. तर दुसºया चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी ठेवले जात आहे.काही जणांची चौदाव्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यानंतर पाच ते सात दिवसांनी घेतली जाणारी चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने अनेकांचा कालावधी वाढला आहे. कुटुंबातील इतरांना अथवा राहत्या परिसरातील व्यक्तींना टाळण्यासाठी त्यांचे क्वारंटाइन सेंटरमध्ये अलगीकरण होत आहे.महिन्याभराहून अधिक कालावधी उलटल्याने अनेकांना घरचा रस्ताच बंद झाल्याची भीती सतावत आहे. तर आपला रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही तिथे ठेवल्याने पुन्हा कोरोना होईल, अशी भीतीही काहींना वाटत आहे. क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींना त्यांचा कालावधी वाढत असण्यामागची कारणे पटवून देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात तसे होत नसल्याने कुटुंबापासून एकाकी पडलेल्यांची घुसमट होत आहे.शहरातील क्वारंटाइन व्यक्ती व पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा भविष्यात मोठ्या संकटाला निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी शक्यता आहे.च्पनवेलच्या इंडिया बुल्स येथे क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी इमारतीखाली जमाव जमवून संताप व्यक्त करीततत्काळ घरी सोडण्याची मागणी केली.च्अखेर महापालिका अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी त्यांची समजूत काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन दिवसांपूर्वी सीबीडीतील एका व्यक्तीने क्वारंटाइन कालावधी वाढल्याने पळ काढला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई