शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

Coronavirus: एपीएमसीत कोरोनाची शंभरी! मार्केट बंद करण्याची मागणी; नवी मुंबईकरांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 02:12 IST

नवी मुंबईमधील नागरिकांनीही बाजार समिती बंद करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरून याविषयी मोहीम राबविली जात आहे

नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. असे असले तरी प्रशासनाने मार्केट सुरूच ठेवण्याचा हट्ट धरल्याने शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. भाजीसह फळमार्केट तत्काळ बंद न केल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये बुधवारी एकाच दिवशी २५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. मार्केटमुळे कोपरखैरणे, वाशी, नेरुळ, घणसोली व तुर्भे परिसरात कोरोनाचा प्रसार झाला आहे. ६ मेपर्यंत थेट मार्केटमध्ये ६५ व रुग्णांच्या संपर्कामुळे ४३ जणांना लागण झाली असून, एपीएमसीशी संबंधित रुग्ण संख्या १०८ वर पोहोचली आहे. लॉकडाउनसह कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सर्व नियमांचे एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. पाच मार्केटमध्ये प्रतिदिन १० ते १२ हजार नागरिक उपस्थित राहतात. काही वेळा ही संख्या २० हजारपर्यंत जाते. भाजीपाला व फळ मार्केटमध्ये सर्वाधिक गर्दी होत असून मार्केटमध्ये वास्तव्यास असलेल्या परराज्यातील कामगारांकडून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचाही योग्य प्रकारे वापर केला जात नाही. या सर्वांमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. माथाडी कामगार व व्यापारी संघटनांनी मार्केट बंद करण्याची मागणी वारंवार केली असूनही शासनाने बाजारपेठा सुरूच ठेवण्याचा अट्टाहास कायम ठेवला आहे. त्याचे गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.

नवी मुंबईमधील नागरिकांनीही बाजार समिती बंद करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरून याविषयी मोहीम राबविली जात आहे. महापौर जयवंत सुतार यांनीही शासनाला पत्र पाठविले आहे. शासनाने तत्काळ मार्केट बंद न केल्यास राज्यपाल व राष्ट्रपतींकडेही पाठपुरावा केला जाणार आहे. अनेक नगरसेवकांनीही मार्केट बंद ठेवण्याची मागणी केली आहे. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीत कोरोना रुग्ण सापडला की संपूर्ण सोसायटी सील केली जाते. मग एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडूनही मार्केट सील का केलेजात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.एपीएमसीत रुग्णांची संख्या वाढत आहे. शासनाने किमान आठ दिवस मार्केट बंद ठेवून सर्वांची आरोग्य तपासणी करावी. मार्केटमध्ये माल न आणता परस्पर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे. प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. - संजय पानसरे,संचालक, फळ मार्केटभाजीपाला मार्केटमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सर्वांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. काही दिवस मार्केट बंद ठेवणे आवश्यक असून, याविषयी शासनाने योग्य निर्णय घ्यावा. - शंकर पिंगळे, संचालक, भाजी मार्केटमार्केटमुळे तुर्भे व इतर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी एपीएमसी बंद करणे आवश्यक आहे.- सी. आर. पाटील, माजी नगरसेवक व माथाडी नेते

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस