शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

Coronavirus: एपीएमसीत कोरोनाची शंभरी! मार्केट बंद करण्याची मागणी; नवी मुंबईकरांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 02:12 IST

नवी मुंबईमधील नागरिकांनीही बाजार समिती बंद करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरून याविषयी मोहीम राबविली जात आहे

नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. असे असले तरी प्रशासनाने मार्केट सुरूच ठेवण्याचा हट्ट धरल्याने शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. भाजीसह फळमार्केट तत्काळ बंद न केल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये बुधवारी एकाच दिवशी २५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. मार्केटमुळे कोपरखैरणे, वाशी, नेरुळ, घणसोली व तुर्भे परिसरात कोरोनाचा प्रसार झाला आहे. ६ मेपर्यंत थेट मार्केटमध्ये ६५ व रुग्णांच्या संपर्कामुळे ४३ जणांना लागण झाली असून, एपीएमसीशी संबंधित रुग्ण संख्या १०८ वर पोहोचली आहे. लॉकडाउनसह कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सर्व नियमांचे एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. पाच मार्केटमध्ये प्रतिदिन १० ते १२ हजार नागरिक उपस्थित राहतात. काही वेळा ही संख्या २० हजारपर्यंत जाते. भाजीपाला व फळ मार्केटमध्ये सर्वाधिक गर्दी होत असून मार्केटमध्ये वास्तव्यास असलेल्या परराज्यातील कामगारांकडून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचाही योग्य प्रकारे वापर केला जात नाही. या सर्वांमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. माथाडी कामगार व व्यापारी संघटनांनी मार्केट बंद करण्याची मागणी वारंवार केली असूनही शासनाने बाजारपेठा सुरूच ठेवण्याचा अट्टाहास कायम ठेवला आहे. त्याचे गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.

नवी मुंबईमधील नागरिकांनीही बाजार समिती बंद करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरून याविषयी मोहीम राबविली जात आहे. महापौर जयवंत सुतार यांनीही शासनाला पत्र पाठविले आहे. शासनाने तत्काळ मार्केट बंद न केल्यास राज्यपाल व राष्ट्रपतींकडेही पाठपुरावा केला जाणार आहे. अनेक नगरसेवकांनीही मार्केट बंद ठेवण्याची मागणी केली आहे. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीत कोरोना रुग्ण सापडला की संपूर्ण सोसायटी सील केली जाते. मग एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडूनही मार्केट सील का केलेजात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.एपीएमसीत रुग्णांची संख्या वाढत आहे. शासनाने किमान आठ दिवस मार्केट बंद ठेवून सर्वांची आरोग्य तपासणी करावी. मार्केटमध्ये माल न आणता परस्पर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे. प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. - संजय पानसरे,संचालक, फळ मार्केटभाजीपाला मार्केटमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सर्वांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. काही दिवस मार्केट बंद ठेवणे आवश्यक असून, याविषयी शासनाने योग्य निर्णय घ्यावा. - शंकर पिंगळे, संचालक, भाजी मार्केटमार्केटमुळे तुर्भे व इतर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी एपीएमसी बंद करणे आवश्यक आहे.- सी. आर. पाटील, माजी नगरसेवक व माथाडी नेते

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस