शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: नेरुळ, कोपरखैरणेत कोरोनामुक्त वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 23:58 IST

CoronaVirus Navi Mumbai News: दिघामध्ये नियंत्रण : बेलापूरमध्ये ५,०९४ रुग्ण झाले बरे, शहरवासीयांना दिलासा

- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिकेच्या ब्रेक द चेन मोहिमेस यश येऊ लागले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, कोपरखैरणेत ५,४३९ व बेलापूरमध्ये आतापर्यंत ५,०९४ रुग्ण बरे झाले आहेत. दिघा परिसरात कोरोना नियंत्रणात आणण्यात यश येत असून, तेथे सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण शिल्लक आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी नागरी आरोग्य केंद्र व विभाग कार्यालयनिहाय उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विभागाचा प्रतिदिन आढावा घेतला जात आहे. आयुक्त अभिजीत बांगर स्वत: प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवत असल्यामुळे मनपाचे डॉक्टर्स, विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही गांभीर्याने काम करू लागले आहेत. गुरुवारपर्यंत शहरातील रुग्णसंख्या ३९,४२१ झाली होती, परंतु त्यामधील तब्बल ३४,९८० रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण बरे झाले आहेत. बेलापूर व कोपरखैरणेमध्येही ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. प्रत्येक नोडमध्ये शिल्लक रुग्णांची संख्या ६०० पेक्षा कमी झाली आहे.दिघा झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोना नियंत्रणात सर्वाधिक यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण पहिल्यापासून नियंत्रणात ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण या परिसरात शिल्लक असून, सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल कौतुक होऊ लागले आहे. कोरोनामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले असले, तरी गुरुवारपर्यंत तब्ब्ल ७९८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये ऐरोली व कोपरखैरणेमध्ये प्रत्येकी १२९ जणांचा समावेश आहे. नेरुळ, बेलापूर, तुर्भे, सानपाडा परिसरातही बळींचे शतक पूर्ण झाले आहे. दिघा व घणसोलीमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अनुक्रमे ९१.५४ व ९१.३७ झाले आहे. उर्वरित ठिकाणी हे प्रमाण ८८ ते ८९पर्यंत पोहोचले आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे.निगेटिव्ह अहवाल वाढलेकोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. महानगरपालिकेच्या वतीने अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. आतापर्यंत सव्वादोन लाख नागरिकांच्या चाचण्या करण्यात यश आले आहे. प्रतिदिन २ ते ३ हजार चाचण्या केल्या जात आहेत. एकूण चाचण्यांपैकी १७ ते १८ टक्के अहवालच पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. नवीन रुग्णांची संख्याही कमी होऊ लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. मृत्युदरही साडेतीनवरून २ टक्क्यांवर आला आहे.नवी मुंबईमधील कोरोनामुक्त व शिल्लक रुग्णविभाग कोरोनामुक्त शिल्लक कोरोनामुक्तीचे प्रमाणनेरुळ ६२६२ ५९४ ८९.९३ऐरोली ४७५५ ५९२ ८६.८३बेलापूर ५०९४ ५२३ ८८.९६वाशी ३८४३ ५२१ ८६.५०तुर्भे-सानपाडा ४००३ ५१८ ८६.२७कोपरखैरणे ५४३९ ४९६ ८९.६९घणसोली ४५१३ ३३७ ९१.३७दिघा १०७१ ६२ ९१.५४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या