शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: नेरुळ, कोपरखैरणेत कोरोनामुक्त वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 23:58 IST

CoronaVirus Navi Mumbai News: दिघामध्ये नियंत्रण : बेलापूरमध्ये ५,०९४ रुग्ण झाले बरे, शहरवासीयांना दिलासा

- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिकेच्या ब्रेक द चेन मोहिमेस यश येऊ लागले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, कोपरखैरणेत ५,४३९ व बेलापूरमध्ये आतापर्यंत ५,०९४ रुग्ण बरे झाले आहेत. दिघा परिसरात कोरोना नियंत्रणात आणण्यात यश येत असून, तेथे सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण शिल्लक आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी नागरी आरोग्य केंद्र व विभाग कार्यालयनिहाय उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विभागाचा प्रतिदिन आढावा घेतला जात आहे. आयुक्त अभिजीत बांगर स्वत: प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवत असल्यामुळे मनपाचे डॉक्टर्स, विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही गांभीर्याने काम करू लागले आहेत. गुरुवारपर्यंत शहरातील रुग्णसंख्या ३९,४२१ झाली होती, परंतु त्यामधील तब्बल ३४,९८० रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण बरे झाले आहेत. बेलापूर व कोपरखैरणेमध्येही ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. प्रत्येक नोडमध्ये शिल्लक रुग्णांची संख्या ६०० पेक्षा कमी झाली आहे.दिघा झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोना नियंत्रणात सर्वाधिक यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण पहिल्यापासून नियंत्रणात ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण या परिसरात शिल्लक असून, सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल कौतुक होऊ लागले आहे. कोरोनामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले असले, तरी गुरुवारपर्यंत तब्ब्ल ७९८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये ऐरोली व कोपरखैरणेमध्ये प्रत्येकी १२९ जणांचा समावेश आहे. नेरुळ, बेलापूर, तुर्भे, सानपाडा परिसरातही बळींचे शतक पूर्ण झाले आहे. दिघा व घणसोलीमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अनुक्रमे ९१.५४ व ९१.३७ झाले आहे. उर्वरित ठिकाणी हे प्रमाण ८८ ते ८९पर्यंत पोहोचले आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे.निगेटिव्ह अहवाल वाढलेकोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. महानगरपालिकेच्या वतीने अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. आतापर्यंत सव्वादोन लाख नागरिकांच्या चाचण्या करण्यात यश आले आहे. प्रतिदिन २ ते ३ हजार चाचण्या केल्या जात आहेत. एकूण चाचण्यांपैकी १७ ते १८ टक्के अहवालच पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. नवीन रुग्णांची संख्याही कमी होऊ लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. मृत्युदरही साडेतीनवरून २ टक्क्यांवर आला आहे.नवी मुंबईमधील कोरोनामुक्त व शिल्लक रुग्णविभाग कोरोनामुक्त शिल्लक कोरोनामुक्तीचे प्रमाणनेरुळ ६२६२ ५९४ ८९.९३ऐरोली ४७५५ ५९२ ८६.८३बेलापूर ५०९४ ५२३ ८८.९६वाशी ३८४३ ५२१ ८६.५०तुर्भे-सानपाडा ४००३ ५१८ ८६.२७कोपरखैरणे ५४३९ ४९६ ८९.६९घणसोली ४५१३ ३३७ ९१.३७दिघा १०७१ ६२ ९१.५४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या