शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

CoronaVirus News: नेरुळ, कोपरखैरणेत कोरोनामुक्त वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 23:58 IST

CoronaVirus Navi Mumbai News: दिघामध्ये नियंत्रण : बेलापूरमध्ये ५,०९४ रुग्ण झाले बरे, शहरवासीयांना दिलासा

- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिकेच्या ब्रेक द चेन मोहिमेस यश येऊ लागले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, कोपरखैरणेत ५,४३९ व बेलापूरमध्ये आतापर्यंत ५,०९४ रुग्ण बरे झाले आहेत. दिघा परिसरात कोरोना नियंत्रणात आणण्यात यश येत असून, तेथे सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण शिल्लक आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी नागरी आरोग्य केंद्र व विभाग कार्यालयनिहाय उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विभागाचा प्रतिदिन आढावा घेतला जात आहे. आयुक्त अभिजीत बांगर स्वत: प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवत असल्यामुळे मनपाचे डॉक्टर्स, विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही गांभीर्याने काम करू लागले आहेत. गुरुवारपर्यंत शहरातील रुग्णसंख्या ३९,४२१ झाली होती, परंतु त्यामधील तब्बल ३४,९८० रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण बरे झाले आहेत. बेलापूर व कोपरखैरणेमध्येही ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. प्रत्येक नोडमध्ये शिल्लक रुग्णांची संख्या ६०० पेक्षा कमी झाली आहे.दिघा झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोना नियंत्रणात सर्वाधिक यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण पहिल्यापासून नियंत्रणात ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण या परिसरात शिल्लक असून, सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल कौतुक होऊ लागले आहे. कोरोनामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले असले, तरी गुरुवारपर्यंत तब्ब्ल ७९८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये ऐरोली व कोपरखैरणेमध्ये प्रत्येकी १२९ जणांचा समावेश आहे. नेरुळ, बेलापूर, तुर्भे, सानपाडा परिसरातही बळींचे शतक पूर्ण झाले आहे. दिघा व घणसोलीमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अनुक्रमे ९१.५४ व ९१.३७ झाले आहे. उर्वरित ठिकाणी हे प्रमाण ८८ ते ८९पर्यंत पोहोचले आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे.निगेटिव्ह अहवाल वाढलेकोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. महानगरपालिकेच्या वतीने अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. आतापर्यंत सव्वादोन लाख नागरिकांच्या चाचण्या करण्यात यश आले आहे. प्रतिदिन २ ते ३ हजार चाचण्या केल्या जात आहेत. एकूण चाचण्यांपैकी १७ ते १८ टक्के अहवालच पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. नवीन रुग्णांची संख्याही कमी होऊ लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. मृत्युदरही साडेतीनवरून २ टक्क्यांवर आला आहे.नवी मुंबईमधील कोरोनामुक्त व शिल्लक रुग्णविभाग कोरोनामुक्त शिल्लक कोरोनामुक्तीचे प्रमाणनेरुळ ६२६२ ५९४ ८९.९३ऐरोली ४७५५ ५९२ ८६.८३बेलापूर ५०९४ ५२३ ८८.९६वाशी ३८४३ ५२१ ८६.५०तुर्भे-सानपाडा ४००३ ५१८ ८६.२७कोपरखैरणे ५४३९ ४९६ ८९.६९घणसोली ४५१३ ३३७ ९१.३७दिघा १०७१ ६२ ९१.५४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या