शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

coronavirus: कोरोनामुळे दुरावतायेत नाती, चाकरमान्यांना ‘गावबंदी’चा धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 00:38 IST

लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्यापही मुंबई व पुणेकरांना प्रवेशबंदी केली जात आहे. असाच प्रकार जावळी भागात सुरू असल्याने अनेक जण नवी मुंबईसह मुंबई परिसरात अडकून पडले आहेत. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा कठीण प्रश्न असल्याने गावच्या वेशी खुल्या करण्याची मागणी होत आहे.लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना स्थलांतराची संधी देऊनही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जण गावाकडे पोहोचू शकले नाहीत. अनेक गावांमध्ये मुंबईमधून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या आहेत.गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने अटी व शर्तींसह त्यांना गावाकडे जाण्याची सवलत दिली आहे. त्यानंतरही अनेक ग्रामपंचायतींनी बैठक घेऊन मुंबई पुण्याकडील व्यक्तींना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर या तुघलकी निर्णयाविरुद्ध जाणाऱ्यांना कायमच वाळीत टाकण्याचे धमकावले जात आहे. त्याचा धसका नवी मुंबईसह मुंबई, पुण्याच्या नोकरी-व्यवसाय निमित्ताने वास्तव्याला असलेल्या चाकरमान्यांनी घेतला आहे. त्यांना लॉकडाउनमुळे शहरात जगणे असह्य झाले असून, इच्छा असतानाही गावाकडे जाता येत नाहीये. त्यामुळे एका व्हायरसमुळे माणसा माणसात निर्माण झालेली दरीही दिसून येत आहे.असाच प्रकार जावळी तालुक्यात समोर आला आहे. तिथल्या काही गावांनी अद्यापही मुंबई-पुण्याच्या लोकांसाठी गावच्या वेशी बंद ठेवल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणेत राहणाºया इंजिनीयर तरुणाने घरच्यांपासून दुरावल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा तरुणही जावळी तालुक्यातीलच असल्याने मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांसाठी प्रवेश बंद करणाºया गावांनी या घटनेपासून धडा घेण्याची गरज आहे. शिवाय त्याची पुनरावृत्ती टाळली पाहिजे.गावाची दारे खुली करण्याची मागणीसध्या जावळी परिसरातील हजारो नागरिक नवी मुंबईत स्थायिक असून, केवळ ग्रामपंचायतींच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकून पडले आहेत. त्यांना गावचा दरवाजा खुला करण्याची मागणी करूनदेखील अनेक ग्रामपंचायती नवी मुंबई, मुंबई व पुणेच्या नागरिकांना प्रवेश देत नसल्याचे मूळचे वाईचे सध्या जुईनगरचे रहिवासी अजय मोरे यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी सातारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई