शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुळे दुरावतायेत नाती, चाकरमान्यांना ‘गावबंदी’चा धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 00:38 IST

लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्यापही मुंबई व पुणेकरांना प्रवेशबंदी केली जात आहे. असाच प्रकार जावळी भागात सुरू असल्याने अनेक जण नवी मुंबईसह मुंबई परिसरात अडकून पडले आहेत. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा कठीण प्रश्न असल्याने गावच्या वेशी खुल्या करण्याची मागणी होत आहे.लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना स्थलांतराची संधी देऊनही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जण गावाकडे पोहोचू शकले नाहीत. अनेक गावांमध्ये मुंबईमधून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या आहेत.गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने अटी व शर्तींसह त्यांना गावाकडे जाण्याची सवलत दिली आहे. त्यानंतरही अनेक ग्रामपंचायतींनी बैठक घेऊन मुंबई पुण्याकडील व्यक्तींना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर या तुघलकी निर्णयाविरुद्ध जाणाऱ्यांना कायमच वाळीत टाकण्याचे धमकावले जात आहे. त्याचा धसका नवी मुंबईसह मुंबई, पुण्याच्या नोकरी-व्यवसाय निमित्ताने वास्तव्याला असलेल्या चाकरमान्यांनी घेतला आहे. त्यांना लॉकडाउनमुळे शहरात जगणे असह्य झाले असून, इच्छा असतानाही गावाकडे जाता येत नाहीये. त्यामुळे एका व्हायरसमुळे माणसा माणसात निर्माण झालेली दरीही दिसून येत आहे.असाच प्रकार जावळी तालुक्यात समोर आला आहे. तिथल्या काही गावांनी अद्यापही मुंबई-पुण्याच्या लोकांसाठी गावच्या वेशी बंद ठेवल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणेत राहणाºया इंजिनीयर तरुणाने घरच्यांपासून दुरावल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा तरुणही जावळी तालुक्यातीलच असल्याने मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांसाठी प्रवेश बंद करणाºया गावांनी या घटनेपासून धडा घेण्याची गरज आहे. शिवाय त्याची पुनरावृत्ती टाळली पाहिजे.गावाची दारे खुली करण्याची मागणीसध्या जावळी परिसरातील हजारो नागरिक नवी मुंबईत स्थायिक असून, केवळ ग्रामपंचायतींच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकून पडले आहेत. त्यांना गावचा दरवाजा खुला करण्याची मागणी करूनदेखील अनेक ग्रामपंचायती नवी मुंबई, मुंबई व पुणेच्या नागरिकांना प्रवेश देत नसल्याचे मूळचे वाईचे सध्या जुईनगरचे रहिवासी अजय मोरे यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी सातारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई