शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

coronavirus: एपीएमसीतील सर्व व्यवहार बंद, आजपासून आरोग्य तपासणी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 01:41 IST

महापालिका व एपीएमसीच्या पथकाने संपूर्ण मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा, गोदाम व इतर परिसर स्वच्छ केला जात आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारपासून प्रत्येक मार्केटमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.बाजार समितीमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे नवी मुंबईमधील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली होती. एपीएमसी बंद करण्याची मागणी व्यापारी संघटना व नवी मुंबईमधील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली होती. याची दखल घेऊन शासनाने ११ ते १७ मे दरम्यान पाचही मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका व एपीएमसीच्या पथकाने संपूर्ण मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा, गोदाम व इतर परिसर स्वच्छ केला जात आहे. मसाला मार्केटपासून स्वच्छतेला सुरुवात केली असून टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्वच्छ केल्या जाणार आहेत.महापालिकेने एपीएमसीतील व्यापारी, माथाडी कामगार व सर्व घटकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पाच विशेष पथके तयार केली आहेत. पथकांच्या माध्यमातून मंगळवारपासून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. सात दिवस कडकडीत बंद पाळून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.मोहीम अशी राबविणारच्बाजार समितीमध्ये सात दिवस विशेष साफसफाई व औषध फवारणी केली जाणार आहे. सोमवारी मसाला मार्केटमधील रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा व परिसराची साफसफाई करण्यात आली.च्१३ मे रोजी धान्य मार्केट, १४ मे रोजी भाजी मार्केट, १६ मे रोजी फळमार्केटचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. महापालिका व बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.बाजार समितीमधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १७ मेपर्यंत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम व आरोग्य तपासणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.- अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसीवाहने मुंबईत थेट रवानामुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सात दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पुरेसे अन्नधान्य यापूर्वीच मुंबईत पाठविले आहे.सोमवारी मार्केट बंद असल्यामुळे ४१४ वाहनांमधून कृषीमाल थेट मुंबईत पाठविला आहे. यामध्ये भाजीपाल्याची २८७, कांदा ४५ व ८२ टेम्पोंमधून फळे मुंबईत रवाना करण्यात आली आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती