शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

coronavirus: एपीएमसीतील सर्व व्यवहार बंद, आजपासून आरोग्य तपासणी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 01:41 IST

महापालिका व एपीएमसीच्या पथकाने संपूर्ण मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा, गोदाम व इतर परिसर स्वच्छ केला जात आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारपासून प्रत्येक मार्केटमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.बाजार समितीमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे नवी मुंबईमधील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली होती. एपीएमसी बंद करण्याची मागणी व्यापारी संघटना व नवी मुंबईमधील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली होती. याची दखल घेऊन शासनाने ११ ते १७ मे दरम्यान पाचही मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका व एपीएमसीच्या पथकाने संपूर्ण मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा, गोदाम व इतर परिसर स्वच्छ केला जात आहे. मसाला मार्केटपासून स्वच्छतेला सुरुवात केली असून टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्वच्छ केल्या जाणार आहेत.महापालिकेने एपीएमसीतील व्यापारी, माथाडी कामगार व सर्व घटकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पाच विशेष पथके तयार केली आहेत. पथकांच्या माध्यमातून मंगळवारपासून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. सात दिवस कडकडीत बंद पाळून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.मोहीम अशी राबविणारच्बाजार समितीमध्ये सात दिवस विशेष साफसफाई व औषध फवारणी केली जाणार आहे. सोमवारी मसाला मार्केटमधील रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा व परिसराची साफसफाई करण्यात आली.च्१३ मे रोजी धान्य मार्केट, १४ मे रोजी भाजी मार्केट, १६ मे रोजी फळमार्केटचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. महापालिका व बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.बाजार समितीमधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १७ मेपर्यंत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम व आरोग्य तपासणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.- अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसीवाहने मुंबईत थेट रवानामुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सात दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पुरेसे अन्नधान्य यापूर्वीच मुंबईत पाठविले आहे.सोमवारी मार्केट बंद असल्यामुळे ४१४ वाहनांमधून कृषीमाल थेट मुंबईत पाठविला आहे. यामध्ये भाजीपाल्याची २८७, कांदा ४५ व ८२ टेम्पोंमधून फळे मुंबईत रवाना करण्यात आली आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती