शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

coronavirus: एपीएमसीतील सर्व व्यवहार बंद, आजपासून आरोग्य तपासणी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 01:41 IST

महापालिका व एपीएमसीच्या पथकाने संपूर्ण मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा, गोदाम व इतर परिसर स्वच्छ केला जात आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारपासून प्रत्येक मार्केटमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.बाजार समितीमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे नवी मुंबईमधील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली होती. एपीएमसी बंद करण्याची मागणी व्यापारी संघटना व नवी मुंबईमधील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली होती. याची दखल घेऊन शासनाने ११ ते १७ मे दरम्यान पाचही मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका व एपीएमसीच्या पथकाने संपूर्ण मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा, गोदाम व इतर परिसर स्वच्छ केला जात आहे. मसाला मार्केटपासून स्वच्छतेला सुरुवात केली असून टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्वच्छ केल्या जाणार आहेत.महापालिकेने एपीएमसीतील व्यापारी, माथाडी कामगार व सर्व घटकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पाच विशेष पथके तयार केली आहेत. पथकांच्या माध्यमातून मंगळवारपासून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. सात दिवस कडकडीत बंद पाळून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.मोहीम अशी राबविणारच्बाजार समितीमध्ये सात दिवस विशेष साफसफाई व औषध फवारणी केली जाणार आहे. सोमवारी मसाला मार्केटमधील रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा व परिसराची साफसफाई करण्यात आली.च्१३ मे रोजी धान्य मार्केट, १४ मे रोजी भाजी मार्केट, १६ मे रोजी फळमार्केटचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. महापालिका व बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.बाजार समितीमधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १७ मेपर्यंत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम व आरोग्य तपासणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.- अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसीवाहने मुंबईत थेट रवानामुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सात दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पुरेसे अन्नधान्य यापूर्वीच मुंबईत पाठविले आहे.सोमवारी मार्केट बंद असल्यामुळे ४१४ वाहनांमधून कृषीमाल थेट मुंबईत पाठविला आहे. यामध्ये भाजीपाल्याची २८७, कांदा ४५ व ८२ टेम्पोंमधून फळे मुंबईत रवाना करण्यात आली आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती