शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

coronavirus: साडेचार लाख टन धान्य एपीएमसीमध्ये उपलब्ध, आजही मार्केट सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 03:29 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान येथील पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहेत. सात दिवस मार्केट बंद राहणार असले तरी मुंबई व नवी मुंबईमध्ये धान्यटंचाई जाणवणार नाही

- नामदेव मोरे नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ५० दिवसांत एपीएमसीमधून एक लाख टन धान्य मुंबईत पाठविण्यात आले आहे. अद्याप ४५ हजार टन धान्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ११ मेपासून सात दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे मुंबईकरांना पुरेसे धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रविवारीही मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान येथील पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहेत. सात दिवस मार्केट बंद राहणार असले तरी मुंबई व नवी मुंबईमध्ये धान्यटंचाई जाणवणार नाही, असा दावा प्रशासन व व्यापाऱ्यांनी केला आहे. कारण गेल्या ५० दिवसांमध्ये पुरेसे धान्य मुंबई व नवी मुंबईमध्ये पाठविण्यात आले आहे. बाजार समितीने घेतलेल्या आढाव्यात आतापर्यंत मार्केटमधून ९० हजार टन व थेट पणनच्या माध्यमातून १० हजार टन असे एकूण एक लाख टन धान्य वितरीत झाले आहे. ८ मेपर्यंत धान्य मार्केटमध्ये ४५ हजार टन धान्यसाठा उपलब्ध होता. शनिवारी रात्रीपर्यंत ४५० वाहनांमधून जास्तीत जास्त माल किरकोळ दुकानांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून उरलेला मालही ग्राहकांपर्यंत पोहोचविता यावा, यासाठी रविवारी १० मे रोजीही मार्केट सुरू ठेवले जाणार आहे.एपीएमसी मार्केट व थेट पणन व्यतिरिक्त ठाणे परिसरातूनही मुंबईत काही प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा झाला आहे. बाजार समिती प्रशासनाने ठाणे परिसरातून वितरीत झालेल्या मालाची सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनीही अन्नधान्याचा साठा करून ठेवला असल्यामुळे एक आठवडा मार्केट बंद झाल्यानंतरही मुंबईकरांना तुटवडा भासणार नाही.धान्य मार्केटमध्ये८ मेपर्यंत ४५ हजार टन धान्यसाठा उपलब्ध होता. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ४५० वाहनांमधून माल किरकोळ दुकानांपर्यंत पोहोचवला जाईल.एपीएमसीमधून लॉकडाउन सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त अन्नधान्य मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ८ मेपर्यंत ४५ हजार टन धान्य उपलब्ध होते. शनिवारी रात्रीपर्यंत व रविवारी दिवसभरात जास्तीत जास्त धान्य मुंबईकरांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.- अनिल चव्हाण,सचिव, एपीएमसीएपीएमसीमधील पाचही मार्केट सोमवारपासून एक आठवडा बंद राहणार आहेत. सर्व गाळे, गोदाम मोकळे करून साफसफाई केली जाणार आहे. संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. सर्वांची आरोग्य तपासणी करून आठ दिवसांत कोरोनाची साखळी तोडून नंतरच मार्केट सुरू केली जाणार आहेत. बाजार समिती प्रशासनाने ठाणे परिसरातून आतापर्यंत वितरित झालेल्या मालाची सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह शहरात कुठेही अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई