शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: साडेचार लाख टन धान्य एपीएमसीमध्ये उपलब्ध, आजही मार्केट सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 03:29 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान येथील पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहेत. सात दिवस मार्केट बंद राहणार असले तरी मुंबई व नवी मुंबईमध्ये धान्यटंचाई जाणवणार नाही

- नामदेव मोरे नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ५० दिवसांत एपीएमसीमधून एक लाख टन धान्य मुंबईत पाठविण्यात आले आहे. अद्याप ४५ हजार टन धान्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ११ मेपासून सात दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे मुंबईकरांना पुरेसे धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रविवारीही मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान येथील पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहेत. सात दिवस मार्केट बंद राहणार असले तरी मुंबई व नवी मुंबईमध्ये धान्यटंचाई जाणवणार नाही, असा दावा प्रशासन व व्यापाऱ्यांनी केला आहे. कारण गेल्या ५० दिवसांमध्ये पुरेसे धान्य मुंबई व नवी मुंबईमध्ये पाठविण्यात आले आहे. बाजार समितीने घेतलेल्या आढाव्यात आतापर्यंत मार्केटमधून ९० हजार टन व थेट पणनच्या माध्यमातून १० हजार टन असे एकूण एक लाख टन धान्य वितरीत झाले आहे. ८ मेपर्यंत धान्य मार्केटमध्ये ४५ हजार टन धान्यसाठा उपलब्ध होता. शनिवारी रात्रीपर्यंत ४५० वाहनांमधून जास्तीत जास्त माल किरकोळ दुकानांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून उरलेला मालही ग्राहकांपर्यंत पोहोचविता यावा, यासाठी रविवारी १० मे रोजीही मार्केट सुरू ठेवले जाणार आहे.एपीएमसी मार्केट व थेट पणन व्यतिरिक्त ठाणे परिसरातूनही मुंबईत काही प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा झाला आहे. बाजार समिती प्रशासनाने ठाणे परिसरातून वितरीत झालेल्या मालाची सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनीही अन्नधान्याचा साठा करून ठेवला असल्यामुळे एक आठवडा मार्केट बंद झाल्यानंतरही मुंबईकरांना तुटवडा भासणार नाही.धान्य मार्केटमध्ये८ मेपर्यंत ४५ हजार टन धान्यसाठा उपलब्ध होता. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ४५० वाहनांमधून माल किरकोळ दुकानांपर्यंत पोहोचवला जाईल.एपीएमसीमधून लॉकडाउन सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त अन्नधान्य मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ८ मेपर्यंत ४५ हजार टन धान्य उपलब्ध होते. शनिवारी रात्रीपर्यंत व रविवारी दिवसभरात जास्तीत जास्त धान्य मुंबईकरांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.- अनिल चव्हाण,सचिव, एपीएमसीएपीएमसीमधील पाचही मार्केट सोमवारपासून एक आठवडा बंद राहणार आहेत. सर्व गाळे, गोदाम मोकळे करून साफसफाई केली जाणार आहे. संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. सर्वांची आरोग्य तपासणी करून आठ दिवसांत कोरोनाची साखळी तोडून नंतरच मार्केट सुरू केली जाणार आहेत. बाजार समिती प्रशासनाने ठाणे परिसरातून आतापर्यंत वितरित झालेल्या मालाची सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह शहरात कुठेही अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई