शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

नवी मुंबईत कोरोनाच्या बळींनी गाठले शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:49 IST

मृतांचा आकडा १०१ : तुर्भेमध्ये सर्वाधिक ३० जणांचा मृत्यू : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नामदेव मोरे 

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिदिन मृतांचा आकडा वाढत असून वाढता प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला अपयश येऊ लागले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून योग्य उपचार न मिळाल्यामुळे व मानसिक ताणामुळे हृदयविकाराचा झटका येऊनही अनेकांचा मृत्यू झाला असून, शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी मुंबईमध्ये बुधवारी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तुर्भेमधील दोन, कोपरखैरणेतील दोन व बेलापूरमधील एकाचा समावेश आहे. शहरात १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. वाशीमध्ये आलेल्या फिलीपाईन्सच्या नागरिकास प्रथम कोरोनाची लागण झाली. पहिला रुग्ण सापडल्यानंतर महानगरपालिकेचे अनेक अधिकारी तो शहरातील रहिवासी नसल्याचा दावा खाजगीत करीत होते. या नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. यानंतर महानगरपालिकेच्या रुग्णालयात गोवंडीमधील एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतरही प्रशासनातील काही अधिकारी सदर महिला नेरूळमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. प्रकृती गंभीर झाल्यानंतर मनपा रुग्णालयात दाखल केले होते, असे सांगत होते. सदर महिलेचा समावेश नवी मुंबईमधील मृतांच्या यादीमध्ये करण्यात आलेला नाही. कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर महानगरपालिका प्रशासन कठोर भूमिका घेण्यात अपयशी ठरले. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रुग्णांचे वाढते प्रमाण, मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नवी मुंबईत वाढणारा प्रादुर्भाव व झोपडपट्टीसह बैठ्या चाळींत रुग्णांची झपाट्याने वाढ होऊ लागल्यानंतरही प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत. पालिका प्रशासनाने वेळेत ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ३,२१९ झाली आहे. कोरोना बळींनी शंभरी पूर्ण केली आहे. ९० दिवसांमध्ये १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ प्रतिदिन सरासरी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रतिदिन २ ते ७ जणांचाही मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.घरातील दोघांचा मृत्यू1एपीएमसीमधील एका व्यापाºयाच्या वडिलांचे १२ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सदर व्यापारी व त्याच्या मुलाला काही दिवसांत कोरोनाची लागण झाली. २३ तारखेला २७ वर्षांच्या मुलाचा व २९ मे रोजी व्यापाºयाचाही मृत्यू झाला. एकाच घरात दोघांचा कोरोनामुळे व एकाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.डॉक्टरचाही मृत्यू2सीवूड परिसरामध्ये राहणाºया डॉक्टराचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यानंतर पाच दिवस त्यांचा वैद्यकीय अहवाल आला नव्हता. डॉक्टरच्या मृत्यूच्या दुसºया दिवशी त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महानगरपालिकेत अहवाल येण्यासाठी वेळ लागत असल्याचे शहरवासीयांच्याही निदर्शनास येऊन नागरिकांनी नवी मुंबईत स्वतंत्र तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी केली.नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ३,२१९ झाली आहे.विभागनिहाय मृत्यू झालेल्यांचा तपशीलविभाग मृत्यूबेलापूर १२नेरूळ १४तुर्भे ३०वाशी ८कोपरखैरणे २०घणसोली ९ऐरोली ६दिघा २शेतकºयांचा श्रावणबाळही काळाच्या पडद्याआड : कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयांना बसला आहे. भाजी मार्केटमधील एका प्रथितयश व्यापाºयाचाही मंगळवारी मृत्यू झाला. संबंधित व्यापारी प्रत्येक वर्षी राज्यभरातील जवळपास ५०० शेतकºयांना काशी यात्रेला पाठवत होते. आतापर्यंत हजारो शेतकºयांना काशी व चारधाम यात्रेला घेऊन जाणाºया व्यापाºयाचेही निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई