शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

नवी मुंबईत कोरोनाच्या बळींनी गाठले शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:49 IST

मृतांचा आकडा १०१ : तुर्भेमध्ये सर्वाधिक ३० जणांचा मृत्यू : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नामदेव मोरे 

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिदिन मृतांचा आकडा वाढत असून वाढता प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला अपयश येऊ लागले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून योग्य उपचार न मिळाल्यामुळे व मानसिक ताणामुळे हृदयविकाराचा झटका येऊनही अनेकांचा मृत्यू झाला असून, शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी मुंबईमध्ये बुधवारी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तुर्भेमधील दोन, कोपरखैरणेतील दोन व बेलापूरमधील एकाचा समावेश आहे. शहरात १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. वाशीमध्ये आलेल्या फिलीपाईन्सच्या नागरिकास प्रथम कोरोनाची लागण झाली. पहिला रुग्ण सापडल्यानंतर महानगरपालिकेचे अनेक अधिकारी तो शहरातील रहिवासी नसल्याचा दावा खाजगीत करीत होते. या नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. यानंतर महानगरपालिकेच्या रुग्णालयात गोवंडीमधील एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतरही प्रशासनातील काही अधिकारी सदर महिला नेरूळमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. प्रकृती गंभीर झाल्यानंतर मनपा रुग्णालयात दाखल केले होते, असे सांगत होते. सदर महिलेचा समावेश नवी मुंबईमधील मृतांच्या यादीमध्ये करण्यात आलेला नाही. कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर महानगरपालिका प्रशासन कठोर भूमिका घेण्यात अपयशी ठरले. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रुग्णांचे वाढते प्रमाण, मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नवी मुंबईत वाढणारा प्रादुर्भाव व झोपडपट्टीसह बैठ्या चाळींत रुग्णांची झपाट्याने वाढ होऊ लागल्यानंतरही प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत. पालिका प्रशासनाने वेळेत ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ३,२१९ झाली आहे. कोरोना बळींनी शंभरी पूर्ण केली आहे. ९० दिवसांमध्ये १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ प्रतिदिन सरासरी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रतिदिन २ ते ७ जणांचाही मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.घरातील दोघांचा मृत्यू1एपीएमसीमधील एका व्यापाºयाच्या वडिलांचे १२ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सदर व्यापारी व त्याच्या मुलाला काही दिवसांत कोरोनाची लागण झाली. २३ तारखेला २७ वर्षांच्या मुलाचा व २९ मे रोजी व्यापाºयाचाही मृत्यू झाला. एकाच घरात दोघांचा कोरोनामुळे व एकाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.डॉक्टरचाही मृत्यू2सीवूड परिसरामध्ये राहणाºया डॉक्टराचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यानंतर पाच दिवस त्यांचा वैद्यकीय अहवाल आला नव्हता. डॉक्टरच्या मृत्यूच्या दुसºया दिवशी त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महानगरपालिकेत अहवाल येण्यासाठी वेळ लागत असल्याचे शहरवासीयांच्याही निदर्शनास येऊन नागरिकांनी नवी मुंबईत स्वतंत्र तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी केली.नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ३,२१९ झाली आहे.विभागनिहाय मृत्यू झालेल्यांचा तपशीलविभाग मृत्यूबेलापूर १२नेरूळ १४तुर्भे ३०वाशी ८कोपरखैरणे २०घणसोली ९ऐरोली ६दिघा २शेतकºयांचा श्रावणबाळही काळाच्या पडद्याआड : कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयांना बसला आहे. भाजी मार्केटमधील एका प्रथितयश व्यापाºयाचाही मंगळवारी मृत्यू झाला. संबंधित व्यापारी प्रत्येक वर्षी राज्यभरातील जवळपास ५०० शेतकºयांना काशी यात्रेला पाठवत होते. आतापर्यंत हजारो शेतकºयांना काशी व चारधाम यात्रेला घेऊन जाणाºया व्यापाºयाचेही निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई