शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

नवी मुंबईत कोरोना चाचण्या वाढविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 00:13 IST

प्रतिदिन दोन हजार चाचण्या : एपीएमसीमध्येही अँटिजेन तपासणी केंद्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महानगरपालिकेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. अँटिजेन व आरटीपीसीआर मिळून प्रतिदिन २ हजार संशयितांची चाचणी केली जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्येही अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यापासून मिशन ब्रेक द चेन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याचा भाग म्हणून जास्तीतजास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यावर व चाचणींचे अहवाल लवकर मिळेल, यावर लक्ष दिले आहे. शहरात १८ ठिकाणी अँटिजेन तपासणी केंद्र सुरू केले आहे. या चाचणीचा अहवाल अर्धा तासात मिळत आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन या केंद्रामधून १,३०० जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. याशिवाय आरटीपीसीआरच्या जवळपास ७०० चाचण्या होत असून, दोन्ही मिळून रोज २ हजार जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील २०पेक्षा जास्त नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्याही तपासण्या केल्या जात आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तेथील परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी तेथेही अँटिजेन चाचणी केंद्र सुरू केले आहे.

चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढलेली निदर्शनास येणार आहे. रुग्णसंख्या कमी भासविण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे धोरण मनपाने स्वीकारले आहे. लवकर रुग्ण शोधून त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. वेळेत चाचण्या झाल्या, तर संबंधित रुग्णाकडून इतरांना लागण होणार नाही. यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसली, तरी त्यामुळे कोणीही काळजी करू नये, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.मृत्युदर कमी करण्यावर भरशहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असणाºया व्यक्तींची विशेष काळजी घेतली जात आहे. याकरिता सर्वेक्षण करताना अशा व्यक्तींची वेगळी नोंद करण्यात येत आहे.लक्षणे दिसल्यास लपवू नकामहानगरपालिकेने नागरी आरोग्य केंद्र व फ्ल्यू क्लिनिक सुरू केली आहे. रॅपिड अँटिजेनची मोफत तपासणी केली जात आहे. यामुळे कोणत्याही नागरिकाला ताप, सर्दी, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात जावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस