शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

कोरोनामुळे कृषिमालाची निर्यात घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:40 IST

शेतकऱ्यांना फटका; गतवर्षीच्या तुलनेत ४९ लाख टन निर्यात कमी; १५,०६३ कोटींनी उलाढाल मंदावली

- नामदेव मोरेनवी मुंबई : शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा, यासाठी शासन प्रत्येक वर्षी निर्यातीला प्रोत्साहन देत असते; परंतु २०१९-२० या आर्थिक वर्षात निर्यातीमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल ४९ लाख ६ हजार ३५३ टन निर्यात घसरली आहे. १५,०६३ कोटी ९९ लाख रुपयांनी उलाढाल कमी झाली असून, याचा फटका शेतकºयांनाही बसला आहे.कृषिमालाची निर्यात वाढल्यास देशांतर्गत बाजारपेठेमध्ये शेतकºयांच्या मालास चांगला भाव मिळेल, या उद्देशाने शासन निर्यातीला प्रोत्साहन देत असते. कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) माध्यमातून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात येतात. २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल २ कोटी ३० लाख ८४ हजार ६९० टन कृषिमालाची निर्यात करून १ लाख ३० हजार ३८७ कोटी रुपयांची उलाढाल करण्यात यश आले होते; परंतु २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये विविध कारणांनी निर्यातीमध्ये घट झाली आहे. वर्षभरामध्ये १ कोटी ८१ लाख ७८ हजार ३३६ टन कृषिमालाची निर्यात झाली असून, त्या माध्यमातून १ लाख १५ हजार ३२३ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये ४९ लाख टन निर्यात घसरून उलाढालही १५,०६३ कोटी रुपयांनी कमी झाली आहे.सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनामुळे निर्यात कोलमडली आहे. निर्यात पुरेशी होत नसल्याने आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्येही कृषिमालास योग्य भाव नसल्याने वर्षभर शेतकºयांचे नुकसान होत राहण्याची शक्यताआहे.तांदळात मोठी घसरणगत आर्थिक वर्षात कांदा निर्यातीमधून ३,४६८ कोटी उलाढाल झाली. देशांतर्गत कांद्याचे दर वाढल्याने शासनाने निर्यातीवर बंदी घातली. निर्यात घसरून उलाढाल २,३२० कोटींवर आली. आर्थिक वर्षात १,१४८ कोटीने उलाढाल घसरली. सर्वाधिक निर्यात बासमतीसह इतर तांदळाची होते. त्यात मोठी घसरण झाली. बासमतीची उलाढाल ३२,८०४ कोटींवरून ३१,०२५ कोटींवर व इतर तांदळाची उलाढाल २१,१८५ कोटींवरून १४,३६४ कोटींवर आली आहे,.कांद्याचा दर वाढल्याने शासनाने निर्यात कमी केली. फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीमध्ये रासायनिक अंश व इतर अडचणींमुळे अपेक्षित वाढ झाली नसल्याने, २०१९-२० मध्ये निर्यात कमी झाली होती. २०२०-२१च्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाचे संकट आल्यामुळे आंबा, कलिंगडासह इतर फळ, भाजी व कृषिमालाची निर्यात रोडावली असून, पुढील वर्षी याहीपेक्षा निर्यात घसरेल.- संजय पानसरे,संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर्षनिहाय निर्यातीचा तपशीलसन २०१८ - १९ (आकडेवारी संदर्भ अपेडा संकेतस्थळ)उत्पादन निर्यात (टन) उलाढाल (कोटी)भाजीपाला व फळे ३५८८४२३ १०,२३७प्रक्रियायुक्त भाजी, फळे ११९६०३९ ९,१९६अन्नधान्य १३५१७४९१ ५६,८४१फुले ३५८७७ १,४२०दूध व प्राणिजन्य वस्तू १९९९०८४ ३०,६३२इतर प्रक्रियायुक्त पदार्थ २७४७७७३ २२,०५९सन २०१९-२०ची निर्यातउत्पादन निर्यात (टन) उलाढाल (कोटी)भाजीपाला व फळे २६२५५८७ ९,१८२प्रक्रियायुक्त भाजी, फळे ११२४५३२ ९,२०६अन्नधान्य १०२१४२०१ ४७,२८७फुले ३१७४५ १,२६५दूध व प्राणिजन्य वस्तू १६४५३८६ २६,३८३इतर प्रक्रियायुक्त पदार्थ २५०६८८३ २१,९९८