शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात, नियमांचे पालन करण्यात आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:37 IST

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये १३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तुर्भेसह इतर झोपडपट्ट्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर होता.

-  नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला झोपडपट्टीमधील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळेच सुनियोजित वसाहतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात यश आले आहे. चिंचपाडा, कातकरीपाडासह सहा नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, झोपडपट्टी परिसरातील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.नवी मुंबईमध्ये १३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तुर्भेसह इतर झोपडपट्ट्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर होता. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व नंतर आलेले आयुक्त अभिजीत बांगर यांनी ही जबाबदारी नागरी आरेाग्य केंद्रांवर सोपविली. या केंद्रांमधील आरोग्य अधिकारी व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जनजागृती सुरु केली. प्रत्येक घरामध्ये व घरातील प्रत्येक सदस्यापर्यंत जनजागृती केली.  नियमांचे पालन केले, तर कोरोना नियंत्रणात ठेवता येईल, हे प्रत्येक नागरिकाच्या मनावर बिंबविले. आवाहन करून जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरु केली. यामुळे कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या झोपडपट्टीमधील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली.झोपडपट्टी परिसरात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. चिंचपाडामध्ये सर्वात कमी २ रुग्ण आहेत. कातकरीपाडा व इंदिरानगर परिसरात प्रत्येकी ४ रुग्ण शिल्लक आहत. सर्वात दाट लोकसंख्या असलेल्या तुर्भे परिसरातही हा आकडा ११ वर आला आहे. चिंचपाडामध्ये रुग्ण बरे हेण्याचे प्रमाण तब्बल ९७ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. सुरुवातीच्या काळात झोपडपट्टीमुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, असे बोलले जात होते, परंतु नागरी आरोग्य केंद्रांनी केलेल्या उपाययोजना व नागरिकांनी केलेले सहकार्य, यामुळे आता झोपडपट्टीमधील कोरोनामुक्तीचा पॅटर्न सुनियोजित परिसरात राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

डॉक्टरांची भूमिका ठरली आहे महत्त्वाची - झोपडपट्टी परिसरात कोरोना काळात परिश्रम घेणारे डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. कातकरी पाडा येथे सुरुवातीला भावना बनसोडे व अपर्णा मालवणकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम केले.- दिघामधील डॉ.सुरेश कुंभारे, चिंचपाडा येथील डॉ.सुषमा सारुक्ते, तुर्भे येथील डॉ. कैलास गायकवाड, इलठाणपाडा येथील मिलिंद वसावे, इंदिरानगरमधील मैथीली शिंदे व आता कैलास गायकवाड यांची भूमिका महत्वाची होती.

नियमांचे काटेकोर पालननागरी आरोग्य केंद्रांमधील अधिकाऱ्यांनी लोकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. कोणतीही लक्षणे दिसल्यानंतर तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन केले. कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील २० ते २५ जणांशी संपर्क साधून त्यांची तपासणी व मार्गदर्शन करण्यास प्राधान्य देण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस