शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

दुधाची ‘मलई’ खाणाऱ्यांना लागणार सुरुंग

By admin | Updated: July 13, 2016 02:08 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीपाठोपाठ आता दूधमाफियांचे कंबरडे मोडण्याची तयारी सुरू झाली आहे. दुधाची मलई खाणाऱ्या या मध्यस्थांच्या मोठ्या साखळीला रायगड जिल्ह्यातून सुरुंग लागणार आहे

आविष्कार देसाई,  अलिबागकृषी उत्पन्न बाजार समितीपाठोपाठ आता दूधमाफियांचे कंबरडे मोडण्याची तयारी सुरू झाली आहे. दुधाची मलई खाणाऱ्या या मध्यस्थांच्या मोठ्या साखळीला रायगड जिल्ह्यातून सुरुंग लागणार आहे. ‘रायगड दूध’ या नावाने रायगडकरांना कमी दरात घरपोच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे रायगडवासीयांचे लीटरमागे सात रुपये वाचणार आहेत. दूध हा मानवी जीवनाच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. मात्र वाढत्या महागाईच्या जमान्यामध्ये गरिबांना सोडाच, पण सर्वसामान्यांनाही ते परवडेनासे झाले आहे. दिवसेंदिवस दुधामध्ये वाढत जाणारी भेसळ आणि त्याचे वाढणारे दर ही ग्राहकांसाठी समस्या बनत आहे. दुधाच्या भेसळीबाबत संसद, विधिमंडळामध्ये रणकंदन माजले होते. उच्च न्यायालयाने याबाबत चिंता व्यक्त केली होती. दुधातील भेसळ पूर्णत: बंद करण्यात सरकारी यंत्रणांना अद्यापही यश आलेले नाही. दूध उत्पादक शेतकरी प्रचंड मेहनत घेऊन दुधाचे उत्पादन घेतो. ग्रामीण भागामध्ये अत्यंत कमी दरात हे दूध तो विकतो. त्या दुधातील मलई काढून तेच दूध पिशवी बंदरीत्या चढ्या दराने शहरी भागांमध्ये विकले जाते. अशा दुधाचा दर्जा सुमार असतो. भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचे प्रमाण वाढत आहे. मध्यस्थांच्या साखळीमुळे दुधाचे दर वाढत जातात. काहीच दिवसांपूर्वी गायी आणि म्हशीच्या दुधाच्या दरात लीटरमागे प्रत्येकी दोन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गायी, म्हशीचे दूध अनुक्रमे ४२ आणि ५४ रुपयांनी विकले जात आहे. ग्राहकांना असे दूध विकत घेण्यावाचून पर्याय नसतो. आता मात्र ग्राहकांची अशा जाचातून सुटका होणार आहे. अलिबाग येथील रायगड बाजार या सहकारी संस्थेच्या माध्यमातून रायगडकरांना कमी दरात घरपोच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे रायगडवासीयांचे लीटरमागे सात रुपये वाचणार आहेत. गायीचे दूध ३५ रुपये, तर म्हशीचे दूध ४७ रुपये लीटरने ग्राहकांना विकत घेता येणार आहे. रायगड जिल्हा हा पूर्वी दुधाचे आगर समजला जात होता. कालांतराने औद्योगिकीकरण वाढल्याने शेतीचे क्षेत्र कमी झाले. कर्जत, खालापूर, पाली-सुधागड, माणगाव, महाड तालुक्यात दुधाचे उत्पादन घेतले जाते, मात्र तेही जिल्ह्याची गरज भागवू शकत नाही.