शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये खतकुंड्यांचे कचरा कुंडीत रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:31 IST

पनवेल महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ठिकठिकाणी खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत.

कळंबोली : पनवेल महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ठिकठिकाणी खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत. परंतु या खतकुंड्यांचे रूपांतर कचरा कुंड्यात झाले आहे. खतनिर्मितीच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या कुंड्यात आता कचरा साठवला जात आहे. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेने फक्त दिखाऊगिरी केली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या ठिकाणी खतकुंड्या बांधल्या आहेत. त्यामध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, छोटा खांदा, मोठा खांदा, कळंबोली, कामोठे तसेच महापालिकेतील समाविष्ट २९ गावांमध्ये ८0 पेक्षा जास्त कुंड्या बांधण्यात आल्या आहेत. या कुंड्यात ओला कचरा तसेच पालापाचोळ्यावर कंपोस्ट खतनिर्मिती करण्यात येणार होते. तयार झालेले खत महापालिका क्षेत्रातील उद्यान, झाडांसाठी उपयोग केला जाणार होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खत तयार झाले तर ते विकण्याचेही प्रयोजन महापालिकेने आखले होते. दोन वर्ष झाले तरी बांधलेल्या खतकुंड्यांत कधीच खत निर्माण झाले नाही. स्वच्छ सर्वेक्षणात फक्त दिखाऊगिरी महापालिकेने केली असल्याची चर्चा पनवेलमध्ये रंगत आहे. महापालिका हद्दीतील बऱ्याच खतकुंड्यांत कचरा टाकल्याचे दिसून येत आहे. नागरिक सर्रासपणे या कुंड्यात प्लॅस्टिक, बाटल्या, घरगुती टाकाऊ कचरा, कपडे इतर कचराही यात टाकला जात आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी आत साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे खांदा वसाहतीतील रहिवासी उमेश मालुसरे यांनी लोकमतला सांगितले. महापालिकेने दिखाऊगिरी करून जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप मालुसरे यांनी केला. तसे पाहता महापालिकेने केलेला प्रयोग फसल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांना संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.>एका खतकुंडीला 20 हजार केलेला खÞर्च पाण्यात : पनवेल महापालिका क्षेत्रात 80 खतकुंड्या बांधण्यात आल्या होत्या . त्या बांधण्यातरिता एका खतकुंडीस 20 हजार रु पये खÞर्च करण्यात आले होते. लाखों रु पये खÞर्च करु न सुध्दा या कुंड्यांचा वापर कचरा साठवण्यासाठी केला जात आहे. लाखों रु पये पाण्यात गेले आहे. घनकचरा व्यवस्थापन तर झाले नाही . परंतू एक शोभेची वस्तू बनून खतकुंड्या कच-यात पडल्या आहेत.>दोन वर्षे खतकुंड्या कचºयात पडूनदोन वर्षाअगोदर पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या संकल्पनेतून या कुंड्या बांधण्याचे काम करण्यात आले होते. शिंदे यांच्या बदलीनंतर महापालिकेने दुर्लक्ष केले. दोन वर्षे झाली तरी या कुंड्यांचा खत बनवण्याकरिता वापर केला नाही. तर कचराकुंडी म्हणूनच वापर केला जात आहे.