शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

निसर्गप्रेमींनी राबवली बीजबॉक्स संकल्पना; शहरात लावले पाच हजार वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:27 IST

पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात.

नवी मुंबई : निसर्गमित्र मंडळ नेरुळने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड व संवर्धन मोहीम सुरू केली आहे. पामबीचच्या जोडरस्त्यावर बीजबॉक्सची संकल्पना राबविण्यात आली आहे. येथून उपलब्ध झालेल्या फळांच्या बियांपासून रोपे तयार केली जात असून, ती शहरात विविध ठिकाणी लावण्यात येत आहेत. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात. प्रसारमाध्यमांकडे छायाचित्रे पाठवून प्रसिद्धी मिळविण्याचाही प्रयत्न केला जातो; परंतु शहरातील अनेक पर्यावरणप्रेमी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता वर्षोनुवर्षे वृक्षलागवड व संवर्धनाचे काम करत आहेत. यामध्ये नेरुळमधील निसर्गमित्र मंडळाचाही समावेश आहे. पर्यावरणप्रेमी शेषराव गर्जे हे त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक वर्षांपासून मुंबई व नवी मुंबईमध्ये वृक्षलावगड करण्याचे काम करत आहेत. सद्यस्थितीमध्ये शासकीय यंत्रणेकडून विदेशी झाडे लावली जातात. या झाडांना फळे येत नसल्यामुळे पक्ष्यांना त्याचा फारसा लाभ होत नाही, यामुळे गर्जे व त्यांचे सहकारी आंबा, फणस, चिंच, लिंबू, रवि, कडुलिंब व इतर वृक्षलागवडीला पसंती देत आहेत. आतापर्यंत त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त वृक्ष विविध ठिकाणी लावले आहेत. वृक्षलावगड केल्यानंतर ते किमान पाच ते सहा फूट उंच होईपर्यंत त्यांची निगा राखली जाते.

निसर्गमित्र मंडळ उन्हाळ्यामध्ये बीजबॉक्सची संकल्पना राबवते. पामबीच रोडवर नेरुळमध्ये पदपथाला लागून बॉक्स ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी आंबे, जांभूळ व इतर फळे खाल्यानंतर त्यांच्या बिया या बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांकडून संकलित झालेल्या बियांपासून रोपे तयार करण्यात येतात. ही रोपे पावसाळ्यात पामबीच रोड, रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड व इतर ठिकाणी लागवड केली जाते. पामबीच रोडला लागून चार वर्षांमध्ये १५०० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांची काळजी घेण्यासाठी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून झाडांना खत, पाणी देण्याचे काम केले जात आहे. यासाठी एल. डी. मोदी हे पर्यावरणप्रेमीही मदत करत असून त्यांनी या कामासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले आहे.

पर्यावरण रक्षणासाठी आम्ही वृक्षलागवड व संवर्धनाचे काम करत आहोत. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. बीजबॉक्सच्या माध्यमातून फळांच्या बिया संकलित केल्या जात असून त्यापासून रोपे तयार केली जातात. यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - शेषराव गर्जे, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :environmentवातावरणNavi Mumbaiनवी मुंबई