शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

निसर्गप्रेमींनी राबवली बीजबॉक्स संकल्पना; शहरात लावले पाच हजार वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:27 IST

पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात.

नवी मुंबई : निसर्गमित्र मंडळ नेरुळने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड व संवर्धन मोहीम सुरू केली आहे. पामबीचच्या जोडरस्त्यावर बीजबॉक्सची संकल्पना राबविण्यात आली आहे. येथून उपलब्ध झालेल्या फळांच्या बियांपासून रोपे तयार केली जात असून, ती शहरात विविध ठिकाणी लावण्यात येत आहेत. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात. प्रसारमाध्यमांकडे छायाचित्रे पाठवून प्रसिद्धी मिळविण्याचाही प्रयत्न केला जातो; परंतु शहरातील अनेक पर्यावरणप्रेमी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता वर्षोनुवर्षे वृक्षलागवड व संवर्धनाचे काम करत आहेत. यामध्ये नेरुळमधील निसर्गमित्र मंडळाचाही समावेश आहे. पर्यावरणप्रेमी शेषराव गर्जे हे त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक वर्षांपासून मुंबई व नवी मुंबईमध्ये वृक्षलावगड करण्याचे काम करत आहेत. सद्यस्थितीमध्ये शासकीय यंत्रणेकडून विदेशी झाडे लावली जातात. या झाडांना फळे येत नसल्यामुळे पक्ष्यांना त्याचा फारसा लाभ होत नाही, यामुळे गर्जे व त्यांचे सहकारी आंबा, फणस, चिंच, लिंबू, रवि, कडुलिंब व इतर वृक्षलागवडीला पसंती देत आहेत. आतापर्यंत त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त वृक्ष विविध ठिकाणी लावले आहेत. वृक्षलावगड केल्यानंतर ते किमान पाच ते सहा फूट उंच होईपर्यंत त्यांची निगा राखली जाते.

निसर्गमित्र मंडळ उन्हाळ्यामध्ये बीजबॉक्सची संकल्पना राबवते. पामबीच रोडवर नेरुळमध्ये पदपथाला लागून बॉक्स ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी आंबे, जांभूळ व इतर फळे खाल्यानंतर त्यांच्या बिया या बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांकडून संकलित झालेल्या बियांपासून रोपे तयार करण्यात येतात. ही रोपे पावसाळ्यात पामबीच रोड, रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड व इतर ठिकाणी लागवड केली जाते. पामबीच रोडला लागून चार वर्षांमध्ये १५०० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांची काळजी घेण्यासाठी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून झाडांना खत, पाणी देण्याचे काम केले जात आहे. यासाठी एल. डी. मोदी हे पर्यावरणप्रेमीही मदत करत असून त्यांनी या कामासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले आहे.

पर्यावरण रक्षणासाठी आम्ही वृक्षलागवड व संवर्धनाचे काम करत आहोत. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. बीजबॉक्सच्या माध्यमातून फळांच्या बिया संकलित केल्या जात असून त्यापासून रोपे तयार केली जातात. यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - शेषराव गर्जे, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :environmentवातावरणNavi Mumbaiनवी मुंबई