शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

निसर्गप्रेमींनी राबवली बीजबॉक्स संकल्पना; शहरात लावले पाच हजार वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:27 IST

पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात.

नवी मुंबई : निसर्गमित्र मंडळ नेरुळने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड व संवर्धन मोहीम सुरू केली आहे. पामबीचच्या जोडरस्त्यावर बीजबॉक्सची संकल्पना राबविण्यात आली आहे. येथून उपलब्ध झालेल्या फळांच्या बियांपासून रोपे तयार केली जात असून, ती शहरात विविध ठिकाणी लावण्यात येत आहेत. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात. प्रसारमाध्यमांकडे छायाचित्रे पाठवून प्रसिद्धी मिळविण्याचाही प्रयत्न केला जातो; परंतु शहरातील अनेक पर्यावरणप्रेमी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता वर्षोनुवर्षे वृक्षलागवड व संवर्धनाचे काम करत आहेत. यामध्ये नेरुळमधील निसर्गमित्र मंडळाचाही समावेश आहे. पर्यावरणप्रेमी शेषराव गर्जे हे त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक वर्षांपासून मुंबई व नवी मुंबईमध्ये वृक्षलावगड करण्याचे काम करत आहेत. सद्यस्थितीमध्ये शासकीय यंत्रणेकडून विदेशी झाडे लावली जातात. या झाडांना फळे येत नसल्यामुळे पक्ष्यांना त्याचा फारसा लाभ होत नाही, यामुळे गर्जे व त्यांचे सहकारी आंबा, फणस, चिंच, लिंबू, रवि, कडुलिंब व इतर वृक्षलागवडीला पसंती देत आहेत. आतापर्यंत त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त वृक्ष विविध ठिकाणी लावले आहेत. वृक्षलावगड केल्यानंतर ते किमान पाच ते सहा फूट उंच होईपर्यंत त्यांची निगा राखली जाते.

निसर्गमित्र मंडळ उन्हाळ्यामध्ये बीजबॉक्सची संकल्पना राबवते. पामबीच रोडवर नेरुळमध्ये पदपथाला लागून बॉक्स ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी आंबे, जांभूळ व इतर फळे खाल्यानंतर त्यांच्या बिया या बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांकडून संकलित झालेल्या बियांपासून रोपे तयार करण्यात येतात. ही रोपे पावसाळ्यात पामबीच रोड, रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड व इतर ठिकाणी लागवड केली जाते. पामबीच रोडला लागून चार वर्षांमध्ये १५०० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांची काळजी घेण्यासाठी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून झाडांना खत, पाणी देण्याचे काम केले जात आहे. यासाठी एल. डी. मोदी हे पर्यावरणप्रेमीही मदत करत असून त्यांनी या कामासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले आहे.

पर्यावरण रक्षणासाठी आम्ही वृक्षलागवड व संवर्धनाचे काम करत आहोत. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. बीजबॉक्सच्या माध्यमातून फळांच्या बिया संकलित केल्या जात असून त्यापासून रोपे तयार केली जातात. यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - शेषराव गर्जे, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :environmentवातावरणNavi Mumbaiनवी मुंबई