शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

केंद्रीय अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:28 IST

व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीयांना गोंजारण्याचे प्रयत्न केले असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.

केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी नवी मुंबईकरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीयांना गोंजारण्याचे प्रयत्न केले असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले असून शहरवासीयांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया .....पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला जी सूट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे त्यामध्ये नक्की काय तरतूद केली आहे हे स्पष्ट झाले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही किंवा शेतमजुरांसाठी देखील या बजेटमध्ये काहीही नाही. मध्यमवर्गीय नागरिकच मोठ्या प्रमाणावर मतदार असतात त्यांना थोड्या प्रमाणावर गोंजारण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात आला असून निवडणुकांपूर्वी ज्याप्रमाणे बजेट असतो त्याअनुषंगाने बजेट आहे.- नीलेश पाटील, सी.एसर्वसामान्य नागरिकांचा विचार करून बजेट मांडण्यात आले आहे. बाजारात देखील बजेट चांगले असल्याची भावना व्यापारी वर्गात आहे. शेतकरी वर्गाला देखील बजेटच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला आहे. बजेटबाबत व्यापारी वर्गात आनंद आहे.- शरद मारू, अध्यक्ष,ग्रेन राईस अ‍ॅण्ड आॅइल सीड्स मर्चंट असोसिएशनआयकर पाच लाखांपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, हे दिलासादायक आहे. जीएसटी प्रत्येक महिन्याऐवजी तिमाही कर भरावे लागणार आहेत, ही बाबदेखील महत्त्वाची आहे. हौसिंग लोनमध्ये लागणारी जीएसटी कमी करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली आहे, ती समिती याबाबत निर्णय घेणार आहे. विशेष म्हणजे, शेतकरी वर्गाला दिलासादायक हा अर्थसंकल्प आहे. दोन हेक्टर पेक्षा कमी असलेल्या शेतकºयांना वर्षभरात सहा हजार रुपये सरकार देणार आहे.- विश्वास भंडारी, सनदी लेखापालसरकारने अर्थसंकल्पात आज काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, त्यामध्ये संरक्षण खात्याच्या निधीमध्ये केलेली वाढ ही उल्लेखनीय आहे. रेरा कायदा आणल्यामुळे रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता येऊन ग्राहकांना फायदेशीर ठरेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीवेतन आणि बोनसची घोषणा केल्याने त्यांनादेखील दिलासा मिळाला आहे.- के. डी. राठोड, बांधकाम व्यावसायिकबांधकाम व्यवसायात जीएसटीमध्ये सवलत मिळाल्यास नक्कीच अर्थसंकल्पातील या निर्णयाचे स्वागत आहे. सर्वसामान्यांना परवडणाºया घरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ लाख ६७ हजार रु पये मिळत होते; परंतु त्यामध्ये दोन ते सव्वा दोन लाख रु पये जीएसटीच जात होता. जीएसटीमध्ये सवलत दिल्यास खरा आवास योजनेचा फायदा नागरिकांना होऊ शकेल.- प्रकाश बाविस्कर,बांधकाम व्यावसायिकदेशातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी या सर्व घटकांचा विचार करून बजेट मांडण्यात आले आहे. या बजेटबाबत मी आनंदी आहे.- मोहन गुरनानी, अध्यक्ष,फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्रगरीबवर्ग, शेतकरी, कामगारवर्ग, ज्येष्ठ नागरिक, सैनिक थोडक्यात समाजातील सर्वच घटकांना सामावून घेणारा ‘न भूतो’ असा हा अर्थसंकल्प आहे. अर्थात आगामी निवडणूक समोर ठेवून सर्वांना खूश करणारा हा अर्थसंकल्प आहे.- दीपक शिंदे, नागरिक, खारघरव्यापारी व व्यावसायिक यांच्या दृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. लघुउद्योग व मध्यम उद्योगाला कर्जामध्ये दोन टक्के सूट देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. टीडीएस लिमीट दहा हजारांवरून ४० हजारांपर्यंत केले आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे.- श्यामसुंदर कारकून, सदस्य, तळोजा मॅनिफॅक्चरिंग असोसिएशन,व्यापारी वर्गासाठी सर्वात चांगला अर्थसंकल्प आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, या अर्थसंकल्पात व्यापारी वर्गाला नाराजदेखील करण्यात आलेले नाही. सरकारी नोकरदार वर्गाच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक अर्थसंकल्प आहे.- जयेश गोगरी, व्यापारी, खारघर

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Navi Mumbaiनवी मुंबई