शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

रायगड बाजारमुळे गोंधळ

By admin | Updated: December 11, 2015 01:25 IST

रायगड बाजार उभारण्याबाबतच्या अडचणीत सातत्याने भर पडत असतानाच आता दस्तुरखद्द या प्रकरणी नगर पालिकेतील सर्व सदस्यांचे सदस्यत्वच अनहर्त करण्याबाबत

अलिबाग : रायगड बाजार उभारण्याबाबतच्या अडचणीत सातत्याने भर पडत असतानाच आता दस्तुरखद्द या प्रकरणी नगर पालिकेतील सर्व सदस्यांचे सदस्यत्वच अनहर्त करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबरला ठेवली आहे. त्यामुळे सत्ताधारी शेकापपुढे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. अलिबाग येथील अ‍ॅड. सागर पाटील आणि किशोर अनुभवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची याचिका ३० नोव्हेंबर २०१५ ला दाखल केली आहे. रायगड बाजारच्या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात भाजपाचे अ‍ॅड.महेश मोहिते यांनी याचिका दाखल केली आहे, तर दुसरीकडे अ‍ॅड. सागर पाटील आणि किशोर अनुभवणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे याचिका दाखल केली आहे. त्यामुळे रायगड बाजारमुळे अलिबागची अख्खी नगरपालिका गोत्यात आल्याचे बोलले जाते. काँग्रेस आणि भाजपाने या प्रश्नी शेकापला चांगलेच कोंडीत पकडले असल्याचे चित्र आहे.अलिबाग नगर पालिकेच्या मालकीची स.नं.७ /२ सि.स.नं.१३२४ मधील १२४० चौ.मी. जागेच्या भाडे मूल्यांकन आणि निविदेबाबत अलिबाग नगर पालिकेने २२ मे २०१५ला सर्वसाधारण सभा घेतली होती. यासाठी ६२० क्रमांकाचा ठरावही घेतला होता. तो चुकीचा असून ठराव रद्द करावा आणि बांधकाम निष्कासित करुन ही जागा पुन्हा अलिबाग नगर पालिकेच्या ताब्यात द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यानंतर १ जून २०१५ ला झालेल्या सर्वसाधरण सभेमध्ये श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळ लि.ला भाडेपट्ट्याने जमीन देण्याचा मुद्दा होता. यासाठी ६२१ ठराव क्रमांकाने नगर पालिकेने ठराव घेत श्रीबाग संस्थेला जमीन दिली. मुळात या जमिनीचे मूल्यांकन बाजार भावाप्रमाणे नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हाही ठराव बेकायदा असल्याने म.न.न.प. औद्योगिक नगर अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अन्वये नगर पालिका तहकूब करणे आणि सर्व सदस्य अनहर्त करावेत, अशीही मागणी केली आहे. (प्रतिनिधी)