शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

स्वच्छ अभियानामुळे स्वच्छतागृहांना झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:19 IST

स्वच्छतेकडे विशेष लक्ष; रंगरंगोटीसह दुरुस्तीच्या कामांना वेग; चालकांची मनमानीही थांबविली

- योगेश पिंगळेनवी मुंबई : केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे स्वच्छ शहर अभियान सुरू असल्याने नवी मुंबई महापालिकेने शहरात सार्वजनिक, सामुदायिक शौचालय, ई-टॉयलेट, शी-टॉयलेट, स्मार्ट टॉयलेट आदी नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने उभारले आहेत. तसेच या अभियानामुळे जुन्या प्रसाधनगृहांची देखील दुरु स्ती करून नवीन झळाळी दिली आहे. चालकांची मनमानी थांबवून जादा पैसे घेणे थांबविले आहे.स्वच्छ सर्वेक्षण २0१७ अभियानामध्ये नवी मुंबई शहराचा स्वच्छतेत देशात आठवा आणि राज्यात पहिला क्र मांक आला होता. गेल्यावर्षी झालेल्या याच सर्वेक्षणामध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर म्हणून बहुमान मिळाला होता. या वर्षी स्वच्छतेत देशात पहिला क्र मांक पटविण्याचे स्वप्न महापालिका प्रशासनाने उराशी बाळगले असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्पर्धा, सुविधा, योजना, राबविल्या जात आहेत. नवी मुंबई शहर १00 टक्के हागणदारीमुक्त करण्याचा संकल्पदेखील पालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी विभाग स्तरावर सर्वेक्षण करून उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालये बांधून देण्यात आली होती. काही ठिकाणी शौचालय उभारण्यास तांत्रिक अडचण असल्याने त्या कुटुंबांकरिता सामुदायिक शौचालयाचे बांधकाम करून त्यामध्ये सीट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. शहर हागणदारी मुक्त करण्याच्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करून देऊनही झोपडपट्टी भागातील नागरिक उडघ्यावर शौचास जात असल्याने उपद्रव पथकांच्या माध्यमातून पालिकेने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून लाखो रु पयांचा दंड देखील वसूल केला आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरातील सर्वच जुन्या शौचालयांची डागडुजी करण्यात आली आहे. तसेच महिला, लहान मुले, अपंग नागरिक यांच्यासाठी स्मार्ट टॉयलेटची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. शौचालयांच्या स्वच्छतेबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वच सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांमध्ये गेल्यावर्षी मशिन बसविण्यात आल्या होत्या; परंतु या सर्वच मशिन बंद पडल्या आहेत.लाखो रुपये खर्च करून डागडुजी केलेल्या काही सामुदायिक शौचालयात स्वच्छ अभियान सुरू असताना देखील काही ठिकाणी स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शौचालयांमध्ये हॅन्ड वॉश लिक्विड, टिशू पेपरच्या मशिन बसविण्यात आल्या आहेत; परंतु या बंद आहेत. काही जुन्या शौचालयांचे दरवाजे तुटलेले, गंजून खराब झालेले असताना फक्त सर्वेक्षणासाठी रंगकाम करून चकाकी देण्यात आली आहे. अभियानानंतर देखील स्वच्छता राखणे महापालिकेपुढे आव्हान असणार आहे.काही ठिकाणी मनमानीप्रसाधनगृहचालकांनी महापालिकेने ठरवून दिलेली रक्कमच नागरिकांकडून घेणे बंधनकारक आहे; परंतु सारसोळे डेपो, वाशी डेपो व इतर काही ठिकाणी नागरिकांकडून चार ते पाच रुपये घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. शुल्क किती घेण्यात यावे, याविषयी फलकही लावण्यात आलेले नाहीत. नागरिकांनी तक्रार करायची असल्यास तक्रार नोंदवहीही ठेवण्यात आलेली नाही.दिव्यांगांच्या शौचालयांना कुलूपस्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने महापालिकेने शहरात दिव्यांग नागरिकांना रॅम्पसह सर्व सोयी-सुविधायुक्त स्मार्ट टॉयलेट बनविले आहेत; परंतु या टॉयलेटच्या दरवाजांना कुलूप लावले असल्याने दिव्यांग नागरिकांना या टॉयलेटचा वापर करता येत नाही.नवीन ठेकेदाराची नियुक्तीमहानगरपालिकेने विभागनिहाय ठेकेदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. ठेकेदाराने २४ तास प्रसाधनगृह सुरू ठेवणे बंधनकारक आहे. याशिवाय जिओ टॅगिंगचा वापर करून प्रत्येक दोन तासाने रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे. नवीन ठेकेदारांना लवकर कार्यादेश देऊन निविदेमधील अटी-शर्तीप्रमाणे काम करून घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका