शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

भंगार माफियांमुळे शहर असुरक्षित, तीन दिवसांत दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 23:38 IST

भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामागे भंगाराच्या व्यवसायात असलेल्या मोठ्या प्रमाणातील ‘अर्थ’कारणाचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.बंद पडलेल्या कंपन्या तसेच बांधकामातून निघणारे टाकाऊ लोखंड यामुळे शहरातील भंगाराचा व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे या व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांकडून भंगार मिळवण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले जातात. त्याकरिता बंद पडत असलेल्या कंपन्यांचे स्क्रॅब उचलण्यासह, जुन्या बांधकामाच्या ठिकाणी निघणारे लोखंड उचलण्याचा ठेका मिळवण्यासाठी चढाओढ लागल्याचेही चित्र शहरात पाहायला मिळत आहे. तर अनेक भंगार व्यावसायिक राजकीय वरदहस्तावर आपला व्यवसाय टिकवून आहेत. त्यांच्याकडून कायदेशीर अथवा बेकायदेशीरपणे भंगार जमवले जाते. हे भंगार साठवण्यासाठी एमआयडीसी परिसरातील वापरात नसलेल्या कंपन्या अथवा मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या गोडाऊन तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार साठवले जात आहे. स्पर्धक इतर भंगार व्यावसायिकांचे ग्राहक स्वत:कडे वळवण्यासाठी दर तोडले जातात, याच्यातून भंगार व्यावसायिकांमध्येही वाद उद्भवत असतात.मागील काही वर्षांपूर्वी पोलिसांनी भंगार माफियांचे कंबरडे मोडून काढले होते; परंतु दरम्यानच्या काळात एमआयडीसी परिसरातील भंगारचोरांवरील कारवाया थंडावल्याने भंगार माफियाराज पुन्हा डोके वर काढू पाहत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच प्रकारातून बोनसरी गावातील तिघा कामगारांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या दोन दिवसअगोदर वाशीत विजय मल्ले या भंगार व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता. तो गोवंडीचा राहणारा असून, भंगाराच्या व्यवसायानिमित्ताने नवी मुंबई परिसरात तो यायचा असेही समजते. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये चौघांची हत्या झाल्याने भंगार व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.विजय मल्ले याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी अश्फाक अली जावेद शेख याला अटक केली असून, तो मानखुर्दचा राहणारा आहे. त्यांच्यात भंगाराच्या धंद्यातील पैशावरून वाद होते असेही समजते. घटनेच्या दिवशी या दोघांमध्ये आर्थिक वाद झाल्याने त्याने हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिल्याचे कक्ष एक चे वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले.