शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भंगार माफियांमुळे शहर असुरक्षित, तीन दिवसांत दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 23:38 IST

भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामागे भंगाराच्या व्यवसायात असलेल्या मोठ्या प्रमाणातील ‘अर्थ’कारणाचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.बंद पडलेल्या कंपन्या तसेच बांधकामातून निघणारे टाकाऊ लोखंड यामुळे शहरातील भंगाराचा व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे या व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांकडून भंगार मिळवण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले जातात. त्याकरिता बंद पडत असलेल्या कंपन्यांचे स्क्रॅब उचलण्यासह, जुन्या बांधकामाच्या ठिकाणी निघणारे लोखंड उचलण्याचा ठेका मिळवण्यासाठी चढाओढ लागल्याचेही चित्र शहरात पाहायला मिळत आहे. तर अनेक भंगार व्यावसायिक राजकीय वरदहस्तावर आपला व्यवसाय टिकवून आहेत. त्यांच्याकडून कायदेशीर अथवा बेकायदेशीरपणे भंगार जमवले जाते. हे भंगार साठवण्यासाठी एमआयडीसी परिसरातील वापरात नसलेल्या कंपन्या अथवा मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या गोडाऊन तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार साठवले जात आहे. स्पर्धक इतर भंगार व्यावसायिकांचे ग्राहक स्वत:कडे वळवण्यासाठी दर तोडले जातात, याच्यातून भंगार व्यावसायिकांमध्येही वाद उद्भवत असतात.मागील काही वर्षांपूर्वी पोलिसांनी भंगार माफियांचे कंबरडे मोडून काढले होते; परंतु दरम्यानच्या काळात एमआयडीसी परिसरातील भंगारचोरांवरील कारवाया थंडावल्याने भंगार माफियाराज पुन्हा डोके वर काढू पाहत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच प्रकारातून बोनसरी गावातील तिघा कामगारांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या दोन दिवसअगोदर वाशीत विजय मल्ले या भंगार व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता. तो गोवंडीचा राहणारा असून, भंगाराच्या व्यवसायानिमित्ताने नवी मुंबई परिसरात तो यायचा असेही समजते. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये चौघांची हत्या झाल्याने भंगार व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.विजय मल्ले याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी अश्फाक अली जावेद शेख याला अटक केली असून, तो मानखुर्दचा राहणारा आहे. त्यांच्यात भंगाराच्या धंद्यातील पैशावरून वाद होते असेही समजते. घटनेच्या दिवशी या दोघांमध्ये आर्थिक वाद झाल्याने त्याने हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिल्याचे कक्ष एक चे वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले.