शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

भंगार माफियांमुळे शहर असुरक्षित, तीन दिवसांत दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 23:38 IST

भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामागे भंगाराच्या व्यवसायात असलेल्या मोठ्या प्रमाणातील ‘अर्थ’कारणाचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.बंद पडलेल्या कंपन्या तसेच बांधकामातून निघणारे टाकाऊ लोखंड यामुळे शहरातील भंगाराचा व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे या व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांकडून भंगार मिळवण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले जातात. त्याकरिता बंद पडत असलेल्या कंपन्यांचे स्क्रॅब उचलण्यासह, जुन्या बांधकामाच्या ठिकाणी निघणारे लोखंड उचलण्याचा ठेका मिळवण्यासाठी चढाओढ लागल्याचेही चित्र शहरात पाहायला मिळत आहे. तर अनेक भंगार व्यावसायिक राजकीय वरदहस्तावर आपला व्यवसाय टिकवून आहेत. त्यांच्याकडून कायदेशीर अथवा बेकायदेशीरपणे भंगार जमवले जाते. हे भंगार साठवण्यासाठी एमआयडीसी परिसरातील वापरात नसलेल्या कंपन्या अथवा मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या गोडाऊन तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार साठवले जात आहे. स्पर्धक इतर भंगार व्यावसायिकांचे ग्राहक स्वत:कडे वळवण्यासाठी दर तोडले जातात, याच्यातून भंगार व्यावसायिकांमध्येही वाद उद्भवत असतात.मागील काही वर्षांपूर्वी पोलिसांनी भंगार माफियांचे कंबरडे मोडून काढले होते; परंतु दरम्यानच्या काळात एमआयडीसी परिसरातील भंगारचोरांवरील कारवाया थंडावल्याने भंगार माफियाराज पुन्हा डोके वर काढू पाहत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच प्रकारातून बोनसरी गावातील तिघा कामगारांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या दोन दिवसअगोदर वाशीत विजय मल्ले या भंगार व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता. तो गोवंडीचा राहणारा असून, भंगाराच्या व्यवसायानिमित्ताने नवी मुंबई परिसरात तो यायचा असेही समजते. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये चौघांची हत्या झाल्याने भंगार व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.विजय मल्ले याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी अश्फाक अली जावेद शेख याला अटक केली असून, तो मानखुर्दचा राहणारा आहे. त्यांच्यात भंगाराच्या धंद्यातील पैशावरून वाद होते असेही समजते. घटनेच्या दिवशी या दोघांमध्ये आर्थिक वाद झाल्याने त्याने हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिल्याचे कक्ष एक चे वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले.