शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

शहरातील वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर; सिडकोसह महापालिकेचेही दुर्लक्ष, पार्किंगसाठी ठोस नियोजनच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 00:13 IST

राज्यातील सर्वात स्वच्छ व देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये समावेश असलेल्या नवी मुंबईमध्येही वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : राज्यातील सर्वात स्वच्छ व देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये समावेश असलेल्या नवी मुंबईमध्येही वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहनांची संख्या ४ लाख २६ हजार झाली असून प्रत्येक वर्षी ३० ते ४० हजार वाहनांची त्यामध्ये भर पडत आहे. परंतु त्या तुलनेमध्ये वाहनतळ उपलब्ध होत नसल्यामुळे रोडवर व जागा मिळेल तेथे वाहने उभी करावी लागत असून भविष्यात ही समस्या अजून गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मुंबई शहरातील वाढत्या नागरीकरणाला आळा बसविण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली होती. प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर सिडकोने वसविलेल्या या नवी मुंबई शहराची नियोजनबद्ध मांडणी केल्याने नागरिकांनी देखील नवी मुंबई शहराला पसंती दिली आहे. महापालिकेच्या निर्मितीनंतर शहरात राबविण्यात आलेल्या उपक्र मांमुळे नवी मुंबई शहराचा नावलौकिक अखंड देशात झाला आहे. शहराची निर्मिती करताना सिडकोने वाहने पार्किंगसाठी अपुरे भूखंड राखीव ठेवल्याने शहरात वाहने पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरात वाढणारी वाहने, लोकसंख्या, बांधकामे या तुलनेत पार्किंगसाठी अपुऱ्या जागा असल्याने संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग केले जात आहे. सिडकोने अल्प उत्पन्न, मध्यम उत्पन्न गटासाठी लहान वसाहती निर्माण केल्या होत्या या वसाहतींमध्ये तसेच गावगावठाण आणि झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या ठिकाणी पार्किंगची सुविधा नसल्याने शेजारील अरुंद रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग केले जाते. यामुळे वाहतूककोंडीच्या समस्येबरोबर आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहचविणे अशक्य झाले आहे. शहरातील रुग्णालये, कार्यालये, हॉटेल्स, मॉल, रेल्वे स्थानके, सभागृह, नाट्यगृह, सिनेमागृह आदी सर्वच ठिकाणी पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला असून पार्किंगच्या जागेअभावी शहरात वर्दळ असलेल्या रस्त्यांवर देखील वाहने उभी केली जात आहेत.शहरांमध्ये वाहने पार्किंगच्या समस्या उद्भवू नये यासाठी पार्किंग धोरण राबविण्याच्या सूचना न्यायालयाने वेळोवेळी दिल्या आहेत. २0१0 नंतर नवी मुंबई महापालिकेने बांधकाम आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना पार्किंगबाबत काळजीवाहू धोरण राबवित परवानग्या देण्यावर भर दिला आहे. खासगी विकासकांमार्फत बांधकाम करताना पार्किंगचे नियोजन नसल्याने महापालिकेच्या परवानग्या मिळत नाहीत त्यामुळे कोणत्याही परवानग्या न घेता बेकायदा बांधकामे केली आहेत. मुंबई, ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहनतळांच्या उभारणीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नाही. वेळेत या समस्येवर तोडगा काढला नाही तर भविष्यात पार्किंगवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रोडवरील पार्किंगवरून भांडणे : सद्यस्थितीमध्ये गृहनिर्माण सोसायटीमध्ये वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. सोसायटीबाहेर रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत. रोडवरही अनेक जण पार्किंगच्या जागेवर हक्क सांगू लागले आहेत. वाहने उभी करण्यावर भांडणे होण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत.बहुमजली वाहनतळाची गरज : शहरात महत्त्वाच्या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्याची आवश्यकता आहे. वाशी, कोपरखैरणे, एपीएमसी, नेरूळ, सीबीडी, सीवूड या परिसरामध्ये बहुमजली वाहनतळ उभे करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिकेने सीबीडीमध्ये वाहनतळाचे काम सुरू केले आहे.उद्यानाखाली पार्किंगनवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जवळपास २०० उद्याने व हरित क्षेत्र आहेत. यापूर्वी उद्यानाच्या व मैदानाच्या खाली वाहनतळ विकसित करण्याचे धोरण महापालिकेने सभागृहात आणले होते, परंतु त्यावर पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. भविष्यातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी अशाप्रकारच्या योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. वाशीमध्ये यापूर्वी नाल्यावर वाहनतळ विकसित केला असून असे पर्यायही निर्माण करावे लागणार आहेत.नवी मुंबईत नोंदणी झालेली वाहनेवाहन प्रकार २०१३-१४ २०१७-१८दुचाकी १, ४०, ०७२ २,१०, ३०४चारचाकी (कार) १, ०१, ७५३ १,३४,०९९तीनचाकी (रिक्षा) १२,०९१ २२,३२४शालेय बस ६५७ ८६४ट्रक ११,९३३ १६,९७८टँकर ४,४९९ ५,२८५इतर सर्व वाहने ३०,७२६ ३६,९३३एकूण वाहने ३,०१,७३१ ४,२६,७८७

टॅग्स :Parkingपार्किंग