शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

परिमंडळ दोनसाठी उपायुक्तांमध्ये रस्सीखेच

By admin | Updated: May 30, 2017 06:22 IST

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पदावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे विद्यमान उपायुक्तांना सहा महिन्यांपूर्वी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पदावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे विद्यमान उपायुक्तांना सहा महिन्यांपूर्वी मिळालेली खुर्ची टिकवण्यासाठी कॅटमध्ये धाव घ्यावी लागली आहे. मुख्यालयासाठी बदली होवून आलेल्या उपायुक्तांनी शासनाकडून परिमंडळ दोनसाठी बदलीचे नवे आदेश आणल्यामुळे ही तेढ निर्माण झाली आहे.शासनाने एप्रिल महिन्याच्या अखेरीस केलेल्या उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून दोन अधिकाऱ्यांची मुंबईत बदली झालेली आहे. त्याचवेळी शासनाने कोल्हापूर येथून आर. बनसोडे तर मुंबईतून प्रवीण पवार यांची नवी मुंबई आयुक्तालयात बदली केली आहे. त्यापैकी पवार यांचे बदली आदेश काढतानाच शासनाने त्यांची मुख्यालयाच्या उपायुक्त पदासाठी नियुक्ती केलेली होती. मात्र यानंतर काही दिवसातच पहिल्या आदेशात बदल करून शासनाने त्यांचे परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदासाठी नवे बदली आदेश काढले आहेत. या नव्या बदली आदेशासाठी पवार यांनी जंग पछाडल्याची चर्चा आहे. परंतु पवार यांच्या सुधारित बदली आदेशाला परिमंडळ दोनचे विद्यमान उपायुक्त राजेंद्र माने यांनी कॅटमध्ये आव्हान दिले आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. डिसेंबर २०१६ मध्ये परिमंडळ दोनचे तत्कालीन उपायुक्त विश्वास पांढरे यांची बदली झाल्यानंतर राजेंद्र माने यांची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापूर्वी ते मुख्यालय उपायुक्त पदावरच कार्यरत होते. यामुळे अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा मुख्यालयाचा कार्यभार घेण्यास त्यांनी नकार दर्शवला आहे. शिवाय परिमंडळ दोनचा कार्यभार सांभाळल्यापासून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. उपायुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वी देखील नवी मुंबई आयुक्तालयात परिमंडळ दोनचे उपायुक्त पद भूषवलेले आहे. सन २००५ ते २००८ पर्यंत ते नवी मुंबई आयुक्तालयात कार्यरत होते. त्यानंतर ९ वर्षांनी ते पुन्हा नवी मुंबईत बदली होवून आले आहेत. यामुळे एकदा बदली होवून गेल्यानंतरही पुन्हा त्याच आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांची बदली होतेच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतरही त्यांच्याकडून परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदासाठीच प्रयत्न झाल्याने बदली प्रकरण वादग्रस्त ठरत आहे. वर्षभरापूर्वी काही सहायक आयुक्तांनी देखील परिमंडळ दोनच मिळावे यासाठी मंत्रालयात जोरदार वशिलेबाजी चालवली होती. त्यामुळे परिमंडळ दोनमध्ये नेमकं दडलंय काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.