शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

परिमंडळ दोनसाठी उपायुक्तांमध्ये रस्सीखेच

By admin | Updated: May 30, 2017 06:22 IST

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पदावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे विद्यमान उपायुक्तांना सहा महिन्यांपूर्वी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पदावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे विद्यमान उपायुक्तांना सहा महिन्यांपूर्वी मिळालेली खुर्ची टिकवण्यासाठी कॅटमध्ये धाव घ्यावी लागली आहे. मुख्यालयासाठी बदली होवून आलेल्या उपायुक्तांनी शासनाकडून परिमंडळ दोनसाठी बदलीचे नवे आदेश आणल्यामुळे ही तेढ निर्माण झाली आहे.शासनाने एप्रिल महिन्याच्या अखेरीस केलेल्या उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून दोन अधिकाऱ्यांची मुंबईत बदली झालेली आहे. त्याचवेळी शासनाने कोल्हापूर येथून आर. बनसोडे तर मुंबईतून प्रवीण पवार यांची नवी मुंबई आयुक्तालयात बदली केली आहे. त्यापैकी पवार यांचे बदली आदेश काढतानाच शासनाने त्यांची मुख्यालयाच्या उपायुक्त पदासाठी नियुक्ती केलेली होती. मात्र यानंतर काही दिवसातच पहिल्या आदेशात बदल करून शासनाने त्यांचे परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदासाठी नवे बदली आदेश काढले आहेत. या नव्या बदली आदेशासाठी पवार यांनी जंग पछाडल्याची चर्चा आहे. परंतु पवार यांच्या सुधारित बदली आदेशाला परिमंडळ दोनचे विद्यमान उपायुक्त राजेंद्र माने यांनी कॅटमध्ये आव्हान दिले आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. डिसेंबर २०१६ मध्ये परिमंडळ दोनचे तत्कालीन उपायुक्त विश्वास पांढरे यांची बदली झाल्यानंतर राजेंद्र माने यांची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापूर्वी ते मुख्यालय उपायुक्त पदावरच कार्यरत होते. यामुळे अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा मुख्यालयाचा कार्यभार घेण्यास त्यांनी नकार दर्शवला आहे. शिवाय परिमंडळ दोनचा कार्यभार सांभाळल्यापासून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. उपायुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वी देखील नवी मुंबई आयुक्तालयात परिमंडळ दोनचे उपायुक्त पद भूषवलेले आहे. सन २००५ ते २००८ पर्यंत ते नवी मुंबई आयुक्तालयात कार्यरत होते. त्यानंतर ९ वर्षांनी ते पुन्हा नवी मुंबईत बदली होवून आले आहेत. यामुळे एकदा बदली होवून गेल्यानंतरही पुन्हा त्याच आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांची बदली होतेच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतरही त्यांच्याकडून परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदासाठीच प्रयत्न झाल्याने बदली प्रकरण वादग्रस्त ठरत आहे. वर्षभरापूर्वी काही सहायक आयुक्तांनी देखील परिमंडळ दोनच मिळावे यासाठी मंत्रालयात जोरदार वशिलेबाजी चालवली होती. त्यामुळे परिमंडळ दोनमध्ये नेमकं दडलंय काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.